शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

आपल्या आत्म्याच्या तीन शक्ती आहेत, त्या मन, बुद्धी आणि संस्कार या होत. पैकी मन हे चंचल आहे, अश्वासारखे ...

आपल्या आत्म्याच्या तीन शक्ती आहेत, त्या मन, बुद्धी आणि संस्कार या होत. पैकी मन हे चंचल आहे, अश्वासारखे आहे, पाण्यासारखे आहे वगैरे उपमा आपणास माहिती आहेतच. पण याच मनात अगाध शक्ती दडलेल्या आहेत. त्यायोगे अनेक म्हणी, सुविचार तयार झालेले आहेत जसे - मन जीते जगत जीत, मन चंगा तो कठोत्ती में गंगा, मन ही हारे हार- मन ही जीते जीत वगैरे.

परंतु , एक महत्त्वाची बाब आपणा सर्वांना माहिती असेलच की, एखादी घटना घडणार असेल तर प्रथम मनात नको त्या गोष्टी सर्वप्रथम गर्दी करतात, अर्थात नकारात्मतेकडे मन प्रथम ओढले जाते. जसे शाळेतून येण्यासाठी मुलाला जरासा उशीर झाला तर त्याच्या आईची चलबिचल वाढते, उशीर का झाला याची कारणे शोधताना नकळत नकारात्मक बाबी अगोदर तिच्या मनात येतात, रिक्षा/गाडी पंक्चर झाली असेल का? येथून सुरुवात होऊन नको त्या नकारात्मक बाबीकडे तिचे मन ओढले जाते... दुसरे मन तिला समजविण्याचा प्रयत्न करते असे काही झाले नसणार, येईलच तो एवढ्यात वगैरे. अशाच काही घटना असतील, ज्यात नकारात्मक बाबीकडे एक मन जास्त प्रमाणात आपणास ओढते.

अशीच परिस्थिती आपली वर्तमानसमयी झाली आहे. कोरोना विषाणू विध्वसंक आहे, परंतु त्यापेक्षाही जास्त विध्वंसक आपण त्याला नकारात्मकतेच्या रूपाने आपल्या मनात आणून ठेवले आहे. त्यापासून वाचण्यासाठी शासन, प्रशासनाने दिलेले सर्व नियम आपण पाळतोच. परंतु ,छोट्या छोट्या नकारात्मक बाजूकडे आपण जास्त प्रमाणात ओढले जातो. साधी सर्दी, छोटा खोकला झाला की, लगेच मनात अनेक नकारात्मक बाबी घर करण्यास सुरुवात करतात.

आपण सकारात्मकता दृढ केल्यास निश्चितपणे जे दुसरे मन नकारात्मक चिंतन करते, त्यास बंद करून सशक्त मन करू शकतो. संशोधनाअंती सकारात्मक चिंतनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते असे सिद्ध झाले आहे. तेव्हा मनाच्या अगाध शक्तीला ओळखा, उच्च सकारात्मक विचारासाठी योगासने, प्राणायाम, राजयोग अभ्यास, व्यायाम आदी केल्यास निश्चित मन सदृढ होईल.

निरुपण : ब्रह्माकुमारी मीनाक्षीदीदी, उपक्षेत्र संचालिका,

ब्रह्माकुमारीज,जळगाव