शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

आपल्या आत्म्याच्या तीन शक्ती आहेत, त्या मन, बुद्धी आणि संस्कार या होत. पैकी मन हे चंचल आहे, अश्वासारखे ...

आपल्या आत्म्याच्या तीन शक्ती आहेत, त्या मन, बुद्धी आणि संस्कार या होत. पैकी मन हे चंचल आहे, अश्वासारखे आहे, पाण्यासारखे आहे वगैरे उपमा आपणास माहिती आहेतच. पण याच मनात अगाध शक्ती दडलेल्या आहेत. त्यायोगे अनेक म्हणी, सुविचार तयार झालेले आहेत जसे - मन जीते जगत जीत, मन चंगा तो कठोत्ती में गंगा, मन ही हारे हार- मन ही जीते जीत वगैरे.

परंतु , एक महत्त्वाची बाब आपणा सर्वांना माहिती असेलच की, एखादी घटना घडणार असेल तर प्रथम मनात नको त्या गोष्टी सर्वप्रथम गर्दी करतात, अर्थात नकारात्मतेकडे मन प्रथम ओढले जाते. जसे शाळेतून येण्यासाठी मुलाला जरासा उशीर झाला तर त्याच्या आईची चलबिचल वाढते, उशीर का झाला याची कारणे शोधताना नकळत नकारात्मक बाबी अगोदर तिच्या मनात येतात, रिक्षा/गाडी पंक्चर झाली असेल का? येथून सुरुवात होऊन नको त्या नकारात्मक बाबीकडे तिचे मन ओढले जाते... दुसरे मन तिला समजविण्याचा प्रयत्न करते असे काही झाले नसणार, येईलच तो एवढ्यात वगैरे. अशाच काही घटना असतील, ज्यात नकारात्मक बाबीकडे एक मन जास्त प्रमाणात आपणास ओढते.

अशीच परिस्थिती आपली वर्तमानसमयी झाली आहे. कोरोना विषाणू विध्वसंक आहे, परंतु त्यापेक्षाही जास्त विध्वंसक आपण त्याला नकारात्मकतेच्या रूपाने आपल्या मनात आणून ठेवले आहे. त्यापासून वाचण्यासाठी शासन, प्रशासनाने दिलेले सर्व नियम आपण पाळतोच. परंतु ,छोट्या छोट्या नकारात्मक बाजूकडे आपण जास्त प्रमाणात ओढले जातो. साधी सर्दी, छोटा खोकला झाला की, लगेच मनात अनेक नकारात्मक बाबी घर करण्यास सुरुवात करतात.

आपण सकारात्मकता दृढ केल्यास निश्चितपणे जे दुसरे मन नकारात्मक चिंतन करते, त्यास बंद करून सशक्त मन करू शकतो. संशोधनाअंती सकारात्मक चिंतनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते असे सिद्ध झाले आहे. तेव्हा मनाच्या अगाध शक्तीला ओळखा, उच्च सकारात्मक विचारासाठी योगासने, प्राणायाम, राजयोग अभ्यास, व्यायाम आदी केल्यास निश्चित मन सदृढ होईल.

निरुपण : ब्रह्माकुमारी मीनाक्षीदीदी, उपक्षेत्र संचालिका,

ब्रह्माकुमारीज,जळगाव