शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

आपल्या आत्म्याच्या तीन शक्ती आहेत, त्या मन, बुद्धी आणि संस्कार या होत. पैकी मन हे चंचल आहे, अश्वासारखे ...

आपल्या आत्म्याच्या तीन शक्ती आहेत, त्या मन, बुद्धी आणि संस्कार या होत. पैकी मन हे चंचल आहे, अश्वासारखे आहे, पाण्यासारखे आहे वगैरे उपमा आपणास माहिती आहेतच. पण याच मनात अगाध शक्ती दडलेल्या आहेत. त्यायोगे अनेक म्हणी, सुविचार तयार झालेले आहेत जसे - मन जीते जगत जीत, मन चंगा तो कठोत्ती में गंगा, मन ही हारे हार- मन ही जीते जीत वगैरे.

परंतु , एक महत्त्वाची बाब आपणा सर्वांना माहिती असेलच की, एखादी घटना घडणार असेल तर प्रथम मनात नको त्या गोष्टी सर्वप्रथम गर्दी करतात, अर्थात नकारात्मतेकडे मन प्रथम ओढले जाते. जसे शाळेतून येण्यासाठी मुलाला जरासा उशीर झाला तर त्याच्या आईची चलबिचल वाढते, उशीर का झाला याची कारणे शोधताना नकळत नकारात्मक बाबी अगोदर तिच्या मनात येतात, रिक्षा/गाडी पंक्चर झाली असेल का? येथून सुरुवात होऊन नको त्या नकारात्मक बाबीकडे तिचे मन ओढले जाते... दुसरे मन तिला समजविण्याचा प्रयत्न करते असे काही झाले नसणार, येईलच तो एवढ्यात वगैरे. अशाच काही घटना असतील, ज्यात नकारात्मक बाबीकडे एक मन जास्त प्रमाणात आपणास ओढते.

अशीच परिस्थिती आपली वर्तमानसमयी झाली आहे. कोरोना विषाणू विध्वसंक आहे, परंतु त्यापेक्षाही जास्त विध्वंसक आपण त्याला नकारात्मकतेच्या रूपाने आपल्या मनात आणून ठेवले आहे. त्यापासून वाचण्यासाठी शासन, प्रशासनाने दिलेले सर्व नियम आपण पाळतोच. परंतु ,छोट्या छोट्या नकारात्मक बाजूकडे आपण जास्त प्रमाणात ओढले जातो. साधी सर्दी, छोटा खोकला झाला की, लगेच मनात अनेक नकारात्मक बाबी घर करण्यास सुरुवात करतात.

आपण सकारात्मकता दृढ केल्यास निश्चितपणे जे दुसरे मन नकारात्मक चिंतन करते, त्यास बंद करून सशक्त मन करू शकतो. संशोधनाअंती सकारात्मक चिंतनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते असे सिद्ध झाले आहे. तेव्हा मनाच्या अगाध शक्तीला ओळखा, उच्च सकारात्मक विचारासाठी योगासने, प्राणायाम, राजयोग अभ्यास, व्यायाम आदी केल्यास निश्चित मन सदृढ होईल.

निरुपण : ब्रह्माकुमारी मीनाक्षीदीदी, उपक्षेत्र संचालिका,

ब्रह्माकुमारीज,जळगाव