शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
2
Short Term Investment: केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
3
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
4
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
5
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
6
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
7
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
8
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
9
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
10
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
11
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
12
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
13
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
14
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
15
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
16
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
17
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
18
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
19
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
20
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:14 IST

शरीर वज्रा ऐसे। कवळी ब्रह्माण्ड जो पुच्छे ।। रामाच्या सेवका। शरण आलो म्हणे तुका।। शक्ती आणि भक्तीचे आचार्य ज्यांनी ...

शरीर वज्रा ऐसे। कवळी ब्रह्माण्ड जो पुच्छे ।। रामाच्या सेवका।

शरण आलो म्हणे तुका।।

शक्ती आणि भक्तीचे आचार्य ज्यांनी कामाला जिंकुन बंदीत ठेवले आणि काळाला तोडरी म्हणजे बेडी घातली, असे सकळ भक्तांचे भुषण असणारे

श्री हनुमंतरायांना माझा नमस्कार असो.

श्री मारुतीरायांचे सामर्थ्य फार अफाट, दिव्य होते. प्रभू रामचंद्र व रावण युध्दामध्ये कितीही बाण अंगावर आले, तरी त्याचा परिणाम होते? नव्हता. उलट त्या बाणांचे तुकडे व्हायचे असे सामर्थ्यवान श्री हनुमंतराय कोण होते? तुकोबाराय वर्णन करतात..

रामाच्या सेवका ,शरण आलो म्हणे तुका, प्रभू श्रीरामचंद्रांचे निष्ठावान सेवक . सेवा म्हणजे काय असते? ती कशी करायची असते? हे जर मनुष्य जीवाला शिकायचं असेल तर श्री हनुमंतरायांचे चरित्र आपल्याला शिकवत, मारुतीरायांनी जी सेवा केली. ती आपल्यासारखी नाही तर श्रीहनुमंतरायांनी जी सेवा केली ती म्हणजे हजारो राक्षसांचा संहार, वध करून आपल्या शेपटीत बांधून समुद्रात फेकून दिले. तरीही श्रीरामचंद्रांच्या पुढे श्रीरामनामाचा जप करीत हात जोडून सेवेसाठी उभे आहेतच... सेवेचे आचार्य म्हणजे श्री मारुतीराया आहेत

दास्यत्व निकट हनुमंत केले। म्हणुनी देखिले रामचरण।।

याचा अर्थ मनुष्याने भगवंताचे दास्यत्व हनुमंतासारखं करावं जेणे करून प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणाशी आपल्याला स्थान प्राप्त होईल. एकदा प्रभू श्रीरामचंद्र हे सर्वांना काहींना काहीं प्रसाद म्हणून देत होते. तेव्हा सीतामाई प्रभूंना म्हणतेय प्रभू तुम्ही सगळ्यांना दिल. पण मारुतीरायांना अजून का प्रसाद दिला नाही. तेव्हा प्रभू म्हणतात, माझ्याकडे काय त्याला देण्यासारखं आहे. तेव्हा सीतामाई मारुतीरायांना आपली सुंदर अशी बहुमूल्य असणारी हिऱ्याची माळ देते. मारुतीराय झाडावर बसतात, ती माईंनी दिलेली हिऱ्याची माळेतून एक एक मणी फोडतात आणि पाहतात की माझे प्रभू ह्या मण्यांमध्ये आहेत का? त्यात प्रभू दिसत नाही, ते बहुमूल्य मणी श्री मारुतीराया फेकून देत, कारण ज्यात भगवंताचा वास आहे. तेच मनुष्याने आपल्याकडे ठेवले पाहिजे. भगवंताचा वास नामामध्ये आहे. तेच भगवंताचे नाम मनुष्याने आपल्यात धारण केल पाहिजे. भगवंतांची निष्ठेने सेवा केली पाहिजे. मनुष्याचा सेवकभाव कसा असावा, ज्यांच्या चरित्रातून आपल्याला ज्ञात होत. मनापेक्षा ही ज्यांच्या वेग खूप गतीशील आहे. सामर्थ्यवान,शक्तीशाली चिरंजीव असे श्रीमारुतीरायांचे स्मरण केल्याने मनुष्याला आठ प्रकारच्या फळांची प्राप्ती होते.