शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

मिरचीचा ‘तिखट’पणा उत्पादकांच्याच नशिबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST

जळगाव : हिरव्या मिरचीची आवक प्रचंड वाढल्याने, ती मातीमोल भावात विकण्यासह फेकून देण्याची वेळ आली आहे. जळगाव कृषी उत्पन्न ...

जळगाव : हिरव्या मिरचीची आवक प्रचंड वाढल्याने, ती मातीमोल भावात विकण्यासह फेकून देण्याची वेळ आली आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन रुपये प्रति किलोने हिरवी मिरची खरेदी केली जात असून, उठाव नसल्याने दररोज चार ते पाच ट्रॅक्टरभर मिरची फेकून दिली जात आहे.

गेल्या महिन्याभरापासून हिरव्या मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. त्यात आता तर दररोज १० टन हिरवी मिरची येत असल्याने आलेल्या सर्व मिरच्या खरेदी होत नाही. त्यामुळे त्यांना भाव मिळणे कठीण होत आहे.

उर्वरित मालाचे करायचे काय?

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागासह सटाणा, मालेगाव, सिल्लोड, अजिंठा इत्यादी भागांतून मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरचीची आवक सुरू आहे. पहाटे लिलावाच्या वेळी उत्पादकांकडून दोन रुपये प्रति किलोने मिरचीची खरेदी केली जात आहे. विशेष म्हणजे, ५० रुपयांना पिशवीभर मिरची विकली जात आहे. एक तर आवक जास्त व मिरचीला सध्या उठाव नसल्याने भाव तर गडगडलेच आहे, शिवाय आलेल्या पूर्ण मालाची खरेदीही होत नाही. त्यामुळे बाजार समितीमध्येच हिरव्या मिरची सोडून उत्पादक निघून जातात. परिणामी, बाजार समितीमधील कर्मचारीच दररोज चार ते पाच ट्रॅक्टर हिरव्या मिरच्या फेकून देत आहे.

उत्पादकांच्या पदरी निराशा

यंदा मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरचीची लागवड करण्यात आली. पावसामुळे उत्पादनही चांगले आले. मात्र, तिला भाव मिळत नसल्याने उत्पादकांची चांगलीच निराशा होत आहे. एक तर भाव मिळत नाही व माल खरेदी न झाल्यास, तो परत नेणेही परवडणारे नसल्याने ते येथेच माल सोडून जात आहे. त्यामुळे उत्पादकांचा उत्पादन खर्च तर दूरच भाडेही निघत नसल्याची स्थिती आहे.

सध्या हिरव्या मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, दोन रुपये प्रति किलो भाव तिला मिळत आहे. आलेला माल पूर्ण खरेदी न झाल्यास तो फेकून द्यावा लागत आहे.

- वासू पाटील, भाजीपाला विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती.