शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

मिरचीचा ‘तिखट’पणा उत्पादकांच्याच नशिबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST

जळगाव : हिरव्या मिरचीची आवक प्रचंड वाढल्याने, ती मातीमोल भावात विकण्यासह फेकून देण्याची वेळ आली आहे. जळगाव कृषी उत्पन्न ...

जळगाव : हिरव्या मिरचीची आवक प्रचंड वाढल्याने, ती मातीमोल भावात विकण्यासह फेकून देण्याची वेळ आली आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन रुपये प्रति किलोने हिरवी मिरची खरेदी केली जात असून, उठाव नसल्याने दररोज चार ते पाच ट्रॅक्टरभर मिरची फेकून दिली जात आहे.

गेल्या महिन्याभरापासून हिरव्या मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. त्यात आता तर दररोज १० टन हिरवी मिरची येत असल्याने आलेल्या सर्व मिरच्या खरेदी होत नाही. त्यामुळे त्यांना भाव मिळणे कठीण होत आहे.

उर्वरित मालाचे करायचे काय?

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागासह सटाणा, मालेगाव, सिल्लोड, अजिंठा इत्यादी भागांतून मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरचीची आवक सुरू आहे. पहाटे लिलावाच्या वेळी उत्पादकांकडून दोन रुपये प्रति किलोने मिरचीची खरेदी केली जात आहे. विशेष म्हणजे, ५० रुपयांना पिशवीभर मिरची विकली जात आहे. एक तर आवक जास्त व मिरचीला सध्या उठाव नसल्याने भाव तर गडगडलेच आहे, शिवाय आलेल्या पूर्ण मालाची खरेदीही होत नाही. त्यामुळे बाजार समितीमध्येच हिरव्या मिरची सोडून उत्पादक निघून जातात. परिणामी, बाजार समितीमधील कर्मचारीच दररोज चार ते पाच ट्रॅक्टर हिरव्या मिरच्या फेकून देत आहे.

उत्पादकांच्या पदरी निराशा

यंदा मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरचीची लागवड करण्यात आली. पावसामुळे उत्पादनही चांगले आले. मात्र, तिला भाव मिळत नसल्याने उत्पादकांची चांगलीच निराशा होत आहे. एक तर भाव मिळत नाही व माल खरेदी न झाल्यास, तो परत नेणेही परवडणारे नसल्याने ते येथेच माल सोडून जात आहे. त्यामुळे उत्पादकांचा उत्पादन खर्च तर दूरच भाडेही निघत नसल्याची स्थिती आहे.

सध्या हिरव्या मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, दोन रुपये प्रति किलो भाव तिला मिळत आहे. आलेला माल पूर्ण खरेदी न झाल्यास तो फेकून द्यावा लागत आहे.

- वासू पाटील, भाजीपाला विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती.