शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

यावल-जळगाव तालुक्याच्या सीमेवरील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पास गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 17:41 IST

जळगाव-यावल तालुक्याच्या सीमेवरील तापी नदी पात्रातील गेल्या शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी उच्च तंत्र प्रणाली यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. सुमारे ४०० मजुरांचा ताफा कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणात वाहने दिमतीला आहेत. गुरुवारी सायंकाळी आमदार हभिाऊ जावळे यांनी धरणावर भेट देवून प्रकल्प सल्लागार पी.आर.पाटील व मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे यांच्याकडून आढावा घेतला.

ठळक मुद्देउच्च तंत्राचा वापरयेत्या पावसाळयात धरणात ५० टक्के साठा असेलआमदार हरिभाऊ जावळे यांनी घेतला आढावा

यावल, जि.जळगाव : जळगाव-यावल तालुक्याच्या सीमेवरील तापी नदी पात्रातील गेल्या शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी उच्च तंत्र प्रणाली यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. सुमारे ४०० मजुरांचा ताफा कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणात वाहने दिमतीला आहेत. गुरुवारी सायंकाळी आमदार हभिाऊ जावळे यांनी धरणावर भेट देवून प्रकल्प सल्लागार पी.आर.पाटील व मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे यांच्याकडून आढावा घेतला. याप्रसंगी तहसीलदार कुंदन हिरे, बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी, विलास चौधरी, उज्जैनसींग पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हर्षल पाटील उपस्थित होते.आमदार हरिभाऊ जावळे यांनी शेळगाव बॅरेज प्रकल्पास भेट देवून आढावा घेतला. सन २०१२ पुराने धरणाचे बांधकाम तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने व बांधकामात बदल केल्यानंतर झालेले बांधकाम फोडावे यासाठी अनुभवी अभियंत्यांनी सुचविलेल्या डायमंड वायर रोप या उच्च तंत्रज्ञानाने बांधकाम सुरू आहे. बांधकाम कापण्यासाठी अत्यंत उच्च व महागडे तंत्रज्ञान असल्याचे प्रकल्प सल्लागार प्रकाश पाटील व कायकारी अभियंता मोरे यांनी सांगितले.आमदार जावळे यांनी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना अडचणींची विचारणा केली व निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आश्वासन दिले. आहे.या प्रकल्पाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम येत्या पाच-सहा महिन्यात पूर्ण होणार असल्याचे सांगून येत्या पावसायात धरण ४०-५० टक्के भरले जाणार असल्याची ग्वाही अधिकारी वर्गाने पत्रकारांना दिली.बुडीत क्षेत्राचा पूलकडगाव-जोगलखेडा हा वाघूर नदीवरील पूल, पिळोदा-भुसावळ रस्त्यावरील मोर नदीवरील पूल आणि अंजाळे घाट ते अंजाळे गाव १९५ मीटर लांबीचा पूल या तीन पुलांच्या निविदा काढलेल्या आहेत. या पुलांच्या बांधकामास लवकरच सुरवात होणार आहे. धरणाच्या खालच्या बाजूस असलेला प्रस्तावित जळगाव- शेळगाव-बामणोद राज्यमार्गावर या पुलासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे. हा पूल झाल्यास यावल-जळगाव अंतर केवळ २२ किलोमीटर होणार आहे. बुडीत क्षेत्रातील पुलांच्या कामानुसार धरणातील जलसाठा वाढवला जाणार असल्याची माहिती अधिकारी वर्गाने दिली.सन १९९९ मध्ये धरणाच्या प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आली होती. तेव्हा १९८.५ कोटींच्या प्रकल्प होता. मात्र २०१२ पासून काम बंद होते. वर्षापासून आमदार जावळे यांच्या प्रयत्नाने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सतत तगादा लावून सुधारित किमतीनुसार ६९९ कोटी ४८ लाख खर्चासाठी शासनाने मान्यता दिली असल्याने कामास गती मिळाली. धरणाच्या उजव्या व डाव्या बाजूच्या मार्गदर्शन भिंतीचे बांधकाम जवळजवळ पूर्णत्वास आले आहे.असा आहे प्रकल्पप्रकल्पासाठी एक हजार ८४८ हेक्टर क्षेत्राची गरज आहे. त्यात खासगी ११६० हेक्टरपैकी ६६० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. शासकीय जमीन ६४८ हेक्टर, तर वनजमीन ४० हेक्टर लागत असून, पूर्ण जमीन संपादित करण्याची प्रक्रिया झाली आहे. बॅरेजची साठवण क्षमता ११६.३६६ दशलक्ष घनमीटर (४.११ टीएमसी) राहणार आहे. प्रकल्पामुळे तापी काठावरील मच्छिमारी व्यवसायात मोठी वाढ होार आहे.सिंचनाचा लाभया प्रकल्पामुळे यावल तालुक्यातील १९ गावे प्रत्यक्ष लाभ क्षेत्रात येत असून, ९ हजार १२८ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. तालुक्यातील कोणतेही गाव बुडीतात जाणार नाही. तालुक्यातील आठ गावे तर भुसावळ चार गावे व जळगाव तालुक्यातील तीन गावातील शेतकºयांची जमीन प्रकल्पात जाणार आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल