शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

 जळगाव जिल्ह्यात ६८ मतदान केंद्रांवर असेल विशेष लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 11:46 IST

संवेदनशिल केंद्र : प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर तयारी सुरु

ठळक मुद्देमतदान केंद्रांचे सर्वेक्षण

जळगाव : यापूर्वी मतदान काळात ज्या मतदान केंद्रांवर गैरप्रकार तसेच बोगस मतदानाचे प्रकार झाले असतील असे ६८ मतदान केंद्र क्रिटीकल व सामाजिकदृष्टया संवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या केंद्रांवर विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले जाणार आहे.लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर प्रशासनातर्फे विविध पातळ्यांवर तयारीला वेग देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे विविध पातळ्यांवरील अधिकाऱ्यांच्या रोज बैठका घेत आहेत. तसेच मतदानाची प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडावी या दृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे.मतदान केंद्रांचे सर्वेक्षणज्या मतदान केंद्रांवर निवडणूक काळात केंद्र बळकावण्याचा प्रकार करणे, बोगस मतदान करणे, हाणामाऱ्यांचे प्रकार घडणे असे प्रकार घडल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्यास अशी मतदान केंद्र क्रिटीकल व सामाजिकदृष्ट्या संवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर विशेष खबरदारी बाळगण्याचे नियोजन सुरू आहे. या संदर्भात मतदान केंद्रांचे पूर्वी घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करून प्रशासनाने आपला अहवाल बनविला आहे.विशेष बंदोबस्ताचे होणार नियोजनअन्य मतदान केंद्रांच्या तुलनेत सामाजिकदृष्ट्या संवेदनशिल व क्रिटीकल मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त असेल. मतदान केंद्राच्या परिसरात ओळखपत्र असल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. यासह केंद्रावर मतदान काळातील प्रत्येक क्षणाचे चित्रीकरण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.गुन्ह्यांच्या घटनांची दखल२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील पाच ठिकाणी निवडणूक कारणावरून वाद होऊन गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर गत दहा वर्षात १७ विविध गुन्हे या काळात दाखल आहेत याची नोंदही गांभीर्याने घेण्यात आली आहे.अशी आहेत संवेदनशिल व क्रिटीकल केंद्रलोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघनिहाय संवेदनशिल व क्रिटीकल केंद्र पुढील प्रमाणे आहे. जळगाव शहर मतदार संघ २ मतदान केंद्र, जळगाव ग्रामीण १०, अमळनेर १०, पाचोरा १ असे या लोकसभा मतदार संघात २३ मतदान केंद्र हे संवेदनशिल व क्रिटीकल असल्याची नोंद आहे. रावेर लोकसभा मतदार संघात चोपडा विधानसभा मतदार संघात ८, रावेर १९, भुसावळ १५, मुक्ताईनगर ३ एकूण ४५ मतदान केंद्र संवेदनशिल व क्रिटीकल आहेत. जिल्ह्यातील क्रिटीकल मतदान केंद्रांची संख्या २८ तर सामाजिकदृष्टया संवेदनशिल केंद्रांची संख्या ४० आहे.

टॅग्स :Politicsराजकारण