शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

 जळगाव जिल्ह्यात ६८ मतदान केंद्रांवर असेल विशेष लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 11:46 IST

संवेदनशिल केंद्र : प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर तयारी सुरु

ठळक मुद्देमतदान केंद्रांचे सर्वेक्षण

जळगाव : यापूर्वी मतदान काळात ज्या मतदान केंद्रांवर गैरप्रकार तसेच बोगस मतदानाचे प्रकार झाले असतील असे ६८ मतदान केंद्र क्रिटीकल व सामाजिकदृष्टया संवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या केंद्रांवर विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले जाणार आहे.लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर प्रशासनातर्फे विविध पातळ्यांवर तयारीला वेग देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे विविध पातळ्यांवरील अधिकाऱ्यांच्या रोज बैठका घेत आहेत. तसेच मतदानाची प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडावी या दृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे.मतदान केंद्रांचे सर्वेक्षणज्या मतदान केंद्रांवर निवडणूक काळात केंद्र बळकावण्याचा प्रकार करणे, बोगस मतदान करणे, हाणामाऱ्यांचे प्रकार घडणे असे प्रकार घडल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्यास अशी मतदान केंद्र क्रिटीकल व सामाजिकदृष्ट्या संवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर विशेष खबरदारी बाळगण्याचे नियोजन सुरू आहे. या संदर्भात मतदान केंद्रांचे पूर्वी घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करून प्रशासनाने आपला अहवाल बनविला आहे.विशेष बंदोबस्ताचे होणार नियोजनअन्य मतदान केंद्रांच्या तुलनेत सामाजिकदृष्ट्या संवेदनशिल व क्रिटीकल मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त असेल. मतदान केंद्राच्या परिसरात ओळखपत्र असल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. यासह केंद्रावर मतदान काळातील प्रत्येक क्षणाचे चित्रीकरण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.गुन्ह्यांच्या घटनांची दखल२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील पाच ठिकाणी निवडणूक कारणावरून वाद होऊन गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर गत दहा वर्षात १७ विविध गुन्हे या काळात दाखल आहेत याची नोंदही गांभीर्याने घेण्यात आली आहे.अशी आहेत संवेदनशिल व क्रिटीकल केंद्रलोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघनिहाय संवेदनशिल व क्रिटीकल केंद्र पुढील प्रमाणे आहे. जळगाव शहर मतदार संघ २ मतदान केंद्र, जळगाव ग्रामीण १०, अमळनेर १०, पाचोरा १ असे या लोकसभा मतदार संघात २३ मतदान केंद्र हे संवेदनशिल व क्रिटीकल असल्याची नोंद आहे. रावेर लोकसभा मतदार संघात चोपडा विधानसभा मतदार संघात ८, रावेर १९, भुसावळ १५, मुक्ताईनगर ३ एकूण ४५ मतदान केंद्र संवेदनशिल व क्रिटीकल आहेत. जिल्ह्यातील क्रिटीकल मतदान केंद्रांची संख्या २८ तर सामाजिकदृष्टया संवेदनशिल केंद्रांची संख्या ४० आहे.

टॅग्स :Politicsराजकारण