शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

विमानतळावर बसणार अत्याधुनिक रडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पाऊस व अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, हवामान विभागाकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पाऊस व अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, हवामान विभागाकडून अनेकदा अंदाज वर्तविल्यावर देखील अंदाज चुकतात. यामुळे शेतीला मोठा फटका बसत असतो. अशा परिस्थितीत जिल्ह्यात स्थानिक पातळीवर रडार यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली तर त्याचा फायदा कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होवू शकतो. विमानतळ प्राधिकरणातर्फे जळगाव विमानतळावर रडार यंत्रणा बसविण्यासाठी हालचाली सुरु आहे. यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच मंजूरी मिळून याठिकाणी रडार यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याची माहिती जळगाव विमानतळ प्राधीकरणाचे संचालक सुनील मुगरीवार यांनी दिली.

ही यंत्रणा विमानतळ प्राधिकरणासाठी कार्यान्वित केली जाणार असली तरी याचा फायदा विमानतळ प्राधिकरणाच्या सुरक्षेसोबतच जिल्ह्यातील कृषी क्षेत्रासाठी केला जाणार आहे. जिल्ह्यासह संपुर्ण खान्देशात रडार यंत्रणा कोणत्याही जिल्ह्यात बसविण्यात आलेली नाही. यामुळे जिल्ह्यातील हवामानाचा अचूक अंदाज वर्तविताना हवामान विभागाचे अंदाज देखील चुकत असतात. यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या चक्रीवादळांची माहिती, अवकाळीची माहिती ऐनवेळी उपलब्ध होत नसल्याने शेतीचे दरवर्षी मोठे नुकसान होत असते. जर रडार यंत्रणा जिल्ह्यात कार्यान्वित झाली तर त्याचा फायदा कृषी क्षेत्राला हवामानाचा अचूक अंदाज मिळविण्यासाठी होवू शकणार आहे.

रडार यंत्रणा काम कशी करते

ही रेडियो लहरी वापरून आकाशातील वस्तूंचे चित्र तयार करण्यासाठीची यंत्रणा आहे. या रडारमधून पाठवलेल्या तरंग लहरी एखाद्या वस्तूवर आदळून (उदा. विमान, ढग व इतर ठोस वस्तू) परततात, तेव्हा त्यातल्या तरंगलांबीचा फरक मोजला जातो. त्यामुळे वस्तूचा वेग, आकार, घनता आदी अनेक बाबी अतिशय अचूक नोंदवता येतात.

होणारे फायदे

मुख्यत्वे करून रडारचा वापर विमानतळ प्राधिकरण व सैन्य हे आपल्या सुरक्षेसाठी करत असतात. तर रडारमुळे हवामानाचा अंदाज देखील घेतला जात असतो. राज्यातील मान्सून व हवामानाच्या बदलत्या पॅटर्नमुळे गाव, तालुका व जिल्हानिहाय वातावरण मोठ्या प्रमाणात बदलत आहे. रडार यंत्रणेमुळे सुमारे १०० ते २५० किमी परिसरातील ढगफुटी, गारपीट व वादळ अशा नैसर्गिक आपत्तींपासून काही दिवसआधीच पुर्वसूचना उपलब्ध होवू शकते. यामुळे कृषी उद्योग व शेतकऱ्यांना याचा फायदा होवू शकणार आहे.

हवामान विभागाकडून मिळणार मंजूरी ?

विमानतळ प्राधिकरणाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, याप्रस्तावात जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला नैसर्गिक संकटामुळे किती प्रमाणात नुकसान होते याची देखील माहिती देण्यात आली आहे. रडारयंत्रणा जरी जळगाव विमानतळावर बसविण्यात येत असली तरी यामुळे खान्देशातील धुळे, नंदुरबार या जिल्ह्याला देखील फायदा होणार आहे. हवामान विभागाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकणार आहे.