शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
3
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
4
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
5
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
6
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
7
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
8
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
9
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
10
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
11
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
12
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
13
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
14
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
15
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
16
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
17
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
18
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
19
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
20
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

विमानतळावर बसणार अत्याधुनिक रडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पाऊस व अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, हवामान विभागाकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पाऊस व अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, हवामान विभागाकडून अनेकदा अंदाज वर्तविल्यावर देखील अंदाज चुकतात. यामुळे शेतीला मोठा फटका बसत असतो. अशा परिस्थितीत जिल्ह्यात स्थानिक पातळीवर रडार यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली तर त्याचा फायदा कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होवू शकतो. विमानतळ प्राधिकरणातर्फे जळगाव विमानतळावर रडार यंत्रणा बसविण्यासाठी हालचाली सुरु आहे. यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच मंजूरी मिळून याठिकाणी रडार यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याची माहिती जळगाव विमानतळ प्राधीकरणाचे संचालक सुनील मुगरीवार यांनी दिली.

ही यंत्रणा विमानतळ प्राधिकरणासाठी कार्यान्वित केली जाणार असली तरी याचा फायदा विमानतळ प्राधिकरणाच्या सुरक्षेसोबतच जिल्ह्यातील कृषी क्षेत्रासाठी केला जाणार आहे. जिल्ह्यासह संपुर्ण खान्देशात रडार यंत्रणा कोणत्याही जिल्ह्यात बसविण्यात आलेली नाही. यामुळे जिल्ह्यातील हवामानाचा अचूक अंदाज वर्तविताना हवामान विभागाचे अंदाज देखील चुकत असतात. यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या चक्रीवादळांची माहिती, अवकाळीची माहिती ऐनवेळी उपलब्ध होत नसल्याने शेतीचे दरवर्षी मोठे नुकसान होत असते. जर रडार यंत्रणा जिल्ह्यात कार्यान्वित झाली तर त्याचा फायदा कृषी क्षेत्राला हवामानाचा अचूक अंदाज मिळविण्यासाठी होवू शकणार आहे.

रडार यंत्रणा काम कशी करते

ही रेडियो लहरी वापरून आकाशातील वस्तूंचे चित्र तयार करण्यासाठीची यंत्रणा आहे. या रडारमधून पाठवलेल्या तरंग लहरी एखाद्या वस्तूवर आदळून (उदा. विमान, ढग व इतर ठोस वस्तू) परततात, तेव्हा त्यातल्या तरंगलांबीचा फरक मोजला जातो. त्यामुळे वस्तूचा वेग, आकार, घनता आदी अनेक बाबी अतिशय अचूक नोंदवता येतात.

होणारे फायदे

मुख्यत्वे करून रडारचा वापर विमानतळ प्राधिकरण व सैन्य हे आपल्या सुरक्षेसाठी करत असतात. तर रडारमुळे हवामानाचा अंदाज देखील घेतला जात असतो. राज्यातील मान्सून व हवामानाच्या बदलत्या पॅटर्नमुळे गाव, तालुका व जिल्हानिहाय वातावरण मोठ्या प्रमाणात बदलत आहे. रडार यंत्रणेमुळे सुमारे १०० ते २५० किमी परिसरातील ढगफुटी, गारपीट व वादळ अशा नैसर्गिक आपत्तींपासून काही दिवसआधीच पुर्वसूचना उपलब्ध होवू शकते. यामुळे कृषी उद्योग व शेतकऱ्यांना याचा फायदा होवू शकणार आहे.

हवामान विभागाकडून मिळणार मंजूरी ?

विमानतळ प्राधिकरणाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, याप्रस्तावात जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला नैसर्गिक संकटामुळे किती प्रमाणात नुकसान होते याची देखील माहिती देण्यात आली आहे. रडारयंत्रणा जरी जळगाव विमानतळावर बसविण्यात येत असली तरी यामुळे खान्देशातील धुळे, नंदुरबार या जिल्ह्याला देखील फायदा होणार आहे. हवामान विभागाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकणार आहे.