शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर बसणार अत्याधुनिक रडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पाऊस व अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, हवामान विभागाकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पाऊस व अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, हवामान विभागाकडून अनेकदा अंदाज वर्तविल्यावर देखील अंदाज चुकतात. यामुळे शेतीला मोठा फटका बसत असतो. अशा परिस्थितीत जिल्ह्यात स्थानिक पातळीवर रडार यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली तर त्याचा फायदा कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होवू शकतो. विमानतळ प्राधिकरणातर्फे जळगाव विमानतळावर रडार यंत्रणा बसविण्यासाठी हालचाली सुरु आहे. यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच मंजूरी मिळून याठिकाणी रडार यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याची माहिती जळगाव विमानतळ प्राधीकरणाचे संचालक सुनील मुगरीवार यांनी दिली.

ही यंत्रणा विमानतळ प्राधिकरणासाठी कार्यान्वित केली जाणार असली तरी याचा फायदा विमानतळ प्राधिकरणाच्या सुरक्षेसोबतच जिल्ह्यातील कृषी क्षेत्रासाठी केला जाणार आहे. जिल्ह्यासह संपुर्ण खान्देशात रडार यंत्रणा कोणत्याही जिल्ह्यात बसविण्यात आलेली नाही. यामुळे जिल्ह्यातील हवामानाचा अचूक अंदाज वर्तविताना हवामान विभागाचे अंदाज देखील चुकत असतात. यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या चक्रीवादळांची माहिती, अवकाळीची माहिती ऐनवेळी उपलब्ध होत नसल्याने शेतीचे दरवर्षी मोठे नुकसान होत असते. जर रडार यंत्रणा जिल्ह्यात कार्यान्वित झाली तर त्याचा फायदा कृषी क्षेत्राला हवामानाचा अचूक अंदाज मिळविण्यासाठी होवू शकणार आहे.

रडार यंत्रणा काम कशी करते

ही रेडियो लहरी वापरून आकाशातील वस्तूंचे चित्र तयार करण्यासाठीची यंत्रणा आहे. या रडारमधून पाठवलेल्या तरंग लहरी एखाद्या वस्तूवर आदळून (उदा. विमान, ढग व इतर ठोस वस्तू) परततात, तेव्हा त्यातल्या तरंगलांबीचा फरक मोजला जातो. त्यामुळे वस्तूचा वेग, आकार, घनता आदी अनेक बाबी अतिशय अचूक नोंदवता येतात.

होणारे फायदे

मुख्यत्वे करून रडारचा वापर विमानतळ प्राधिकरण व सैन्य हे आपल्या सुरक्षेसाठी करत असतात. तर रडारमुळे हवामानाचा अंदाज देखील घेतला जात असतो. राज्यातील मान्सून व हवामानाच्या बदलत्या पॅटर्नमुळे गाव, तालुका व जिल्हानिहाय वातावरण मोठ्या प्रमाणात बदलत आहे. रडार यंत्रणेमुळे सुमारे १०० ते २५० किमी परिसरातील ढगफुटी, गारपीट व वादळ अशा नैसर्गिक आपत्तींपासून काही दिवसआधीच पुर्वसूचना उपलब्ध होवू शकते. यामुळे कृषी उद्योग व शेतकऱ्यांना याचा फायदा होवू शकणार आहे.

हवामान विभागाकडून मिळणार मंजूरी ?

विमानतळ प्राधिकरणाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, याप्रस्तावात जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला नैसर्गिक संकटामुळे किती प्रमाणात नुकसान होते याची देखील माहिती देण्यात आली आहे. रडारयंत्रणा जरी जळगाव विमानतळावर बसविण्यात येत असली तरी यामुळे खान्देशातील धुळे, नंदुरबार या जिल्ह्याला देखील फायदा होणार आहे. हवामान विभागाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकणार आहे.