शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
4
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
5
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
6
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
7
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
8
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
9
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
10
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
11
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
12
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
13
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
14
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
16
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
17
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
18
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
19
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
20
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?

फुले मार्केट बंद करताच रस्त्यांवर थाटले जाताहेत व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : फुले मार्केट भागात अनेक विक्रेते दुपारीदेखील व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्यानंतर मनपा प्रशासनाने फुले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : फुले मार्केट भागात अनेक विक्रेते दुपारीदेखील व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्यानंतर मनपा प्रशासनाने फुले मार्केटचे सर्व प्रवेशद्वार बंद करून व्यवसाय करण्यास विक्रेत्यांना मज्जाव केला होता. मात्र फुले मार्केट बंद होताच विक्रेत्यांनी आता शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील रस्त्यालगत व्यवसाय सुरू केला आहे. मंगळवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक व विक्रेत्यांमध्ये दिवसभर पाठशिवणीचा खेळ सुरू होता.

जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाकडून बाजारपेठांमधील नेहमी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत तसेच सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकानांना व्यवसाय करण्यास तसेच भाजीपाला विक्रेत्यांना निश्चित केलेल्या जागांवरच व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. मात्र असे असताना शहरातील दुकानदार, रस्त्यांवर विक्री करणारे विक्रेते यांच्याकडून नियमांची पायमल्ली होत आहे. शहरातील फुले मार्केट भागात अनेक विक्रेते दुकाने थाटत असल्याने, शुक्रवारी महापालिकेच्या पथकाने फुले मार्केटमध्ये जाणारे सर्व रस्ते बंद केले होते. मात्र फुले मार्केटमधील रस्ते बंद केल्यानंतर विक्रेत्यांनी आता थेट रस्त्यावर येऊनच व्यवसाय थाटण्यास सुरुवात केली. मंगळवारी शहरातील बळीराम पेठ, टॉवर चौक, सुभाष चौक व शिवाजी रोड परिसरात अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती तसेच सकाळी ११ वाजेनंतरदेखील या ठिकाणी गर्दी कायम असल्याचे चित्र आढळून आले.

मनपाचे पथक येताच पळापळ आणि गोंधळ

सकाळी ११ वाजेनंतरदेखील मुख्य बाजारपेठ परिसरात विक्रेत्यांची दुकाने थाटलेली होती तसेच या ठिकाणी नागरिकांचीदेखील गर्दी झालेली होती. याबाबत मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच मनपाचे पथक मुख्य बाजार पेठ भागात दाखल झाले. मनपाचे पथक येताच बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला. अनेक विक्रेत्यांनी मिळेल त्या रस्त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, तर काही विक्रेत्यांनी आपला सामान जमा करून पळापळ सुरू केली. मनपा कर्मचाऱ्यांनी विक्रेत्यांवर थेट कारवाई करत माल जप्त केला. यावेळी १९ विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.

बजरंग बोगदा परिसरात पुन्हा विक्रेत्यांची गर्दी

बजरंग बोगदा परिसरात महापालिकेच्या पथकाने गेल्या आठवड्यात कारवाई करून या ठिकाणचा बाजार उठवला होता. मात्र आठवड्याभरातच या भागात पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेपासून या भागात अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती तसेच नागरिकांनीदेखील भाजीपाला घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यासह शहरातील महाबळ, मेहरूण, खोटे नगर या भागातदेखील भाजीपाल्याचा बाजार भरत आहे. विशेषकरून सायंकाळच्या वेळेस सोशल डिस्टन्सिंगच्या कोणत्याही नियमांची अंमलबजावणी न करताच या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी मात्र शहरातील मुख्य बाजारपेठ भागातच ठाण मांडून बसले आहेत. शहरातील उपनगर भागातदेखील मनपा पथकाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.