शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

डाळींचा काहीसा दिलासा, खाद्यतेलात पुन्हा तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यात कमी झालेल्या खाद्यतेलाच्या भावात या आठवड्यात पुन्हा थोडी तेजी आली असून, इतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवड्यात कमी झालेल्या खाद्यतेलाच्या भावात या आठवड्यात पुन्हा थोडी तेजी आली असून, इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहे. दुसरीकडे डाळींचे भाव काहीसे कमी झाले असून, कोथिंबीर, कांद्याचेदेखील भाव उतरले आहे.

गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून चढ-उतार होत असलेल्या खाद्यतेलाचे भाव गेल्या आठवड्यात काहीसे कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र या आठवड्यात लोणच्यामुळे खाद्यतेलाला मागणी वाढत असल्याने त्यांचे भाव वाढत आहे. सोयाबीन तेलात भाववाढ होऊन ते १५५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते १९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. तसेच सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. खाद्यतेलातील भाववाढ गेल्या आठवड्यात थांबून प्रत्येक तेलामध्ये पाच ते दहा रुपयांची घसरण झाली होती. मात्र आता पुन्हा तेवढेच भाव वाढले आहे.

डाळींचा दिलासा

डाळींचे भाव कमी झाले आहे. यामध्ये तूरडाळ १०० ते ११५, मूगडाळ १०० ते ११५, हरभरा डाळ ७० ते ८०, उडीद डाळ १०५ ते ११५ रुपये प्रतिकिलोवर आली आहे. बेसनपीठ ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर कायम आहे. साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून, रवा ३५ ते ४० रुपये, तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहे.

कोथिंबीरचे भाव कमी

सध्या उन्हाळा सुरू असल्याने भाजीपाल्याचे भाव वाढत आहे. गेल्या आठवड्यात कोथिंबीर ८० रुपये किलो, तर मेथीही ६० रुपये किलोवर पोहोचली होती. मात्र या आठवड्यात कोथिंबीर ६० रुपये प्रतिकिलोवर आला आहे. टमाट्याचे भाव १५ रुपये प्रतिकिलोवर आहे.

कांदे स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी होऊन ते २० रुपये प्रति किलोवर आहेत. यासोबतच कांद्याचे भावदेखील कमी होऊन ते १५ रुपये प्रतिकिलोवर आले आहे. लसण, लिंबू यांना मागणी वाढल्याने त्यांचे भाव वाढलेलेच आहे. लसण १०० ते १४० रुपये, तर लिंबू ६० रुपये प्रति किलोवर कायम आहे. यासोबतच बारीक हिरवी मिरची ६० रुपये प्रति किलोवर आहे.

खाद्यतेलाचे भाव पुन्हा वाढल्याने आर्थिक भार वाढला आहे. मात्र डाळीचे भाव कमी झाल्याने तसेच भाजीपालादेखील स्थिर असल्याने दिलासा आहे.

- रमेश जाधव, ग्राहक

कमी झालेले खाद्यतेलाचे भाव या आठवड्यात पुन्हा वाढले आहे, तर डाळींचे भाव काहीसे कमी झाले आहे. इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे.

- ईश्वर चौधरी, व्यापारी

गेल्या आठवड्यात भाववाढ झालेल्या कोथिंबीरचे भाव तसेच कांद्याचे भाव या आठवड्यात कमी झाले आहे.

- शरद सोनवणे, भाजीपाला विक्रेते