शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

डाळींचा काहीसा दिलासा, खाद्यतेलात पुन्हा तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यात कमी झालेल्या खाद्यतेलाच्या भावात या आठवड्यात पुन्हा थोडी तेजी आली असून, इतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवड्यात कमी झालेल्या खाद्यतेलाच्या भावात या आठवड्यात पुन्हा थोडी तेजी आली असून, इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहे. दुसरीकडे डाळींचे भाव काहीसे कमी झाले असून, कोथिंबीर, कांद्याचेदेखील भाव उतरले आहे.

गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून चढ-उतार होत असलेल्या खाद्यतेलाचे भाव गेल्या आठवड्यात काहीसे कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र या आठवड्यात लोणच्यामुळे खाद्यतेलाला मागणी वाढत असल्याने त्यांचे भाव वाढत आहे. सोयाबीन तेलात भाववाढ होऊन ते १५५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते १९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. तसेच सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. खाद्यतेलातील भाववाढ गेल्या आठवड्यात थांबून प्रत्येक तेलामध्ये पाच ते दहा रुपयांची घसरण झाली होती. मात्र आता पुन्हा तेवढेच भाव वाढले आहे.

डाळींचा दिलासा

डाळींचे भाव कमी झाले आहे. यामध्ये तूरडाळ १०० ते ११५, मूगडाळ १०० ते ११५, हरभरा डाळ ७० ते ८०, उडीद डाळ १०५ ते ११५ रुपये प्रतिकिलोवर आली आहे. बेसनपीठ ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर कायम आहे. साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून, रवा ३५ ते ४० रुपये, तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहे.

कोथिंबीरचे भाव कमी

सध्या उन्हाळा सुरू असल्याने भाजीपाल्याचे भाव वाढत आहे. गेल्या आठवड्यात कोथिंबीर ८० रुपये किलो, तर मेथीही ६० रुपये किलोवर पोहोचली होती. मात्र या आठवड्यात कोथिंबीर ६० रुपये प्रतिकिलोवर आला आहे. टमाट्याचे भाव १५ रुपये प्रतिकिलोवर आहे.

कांदे स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी होऊन ते २० रुपये प्रति किलोवर आहेत. यासोबतच कांद्याचे भावदेखील कमी होऊन ते १५ रुपये प्रतिकिलोवर आले आहे. लसण, लिंबू यांना मागणी वाढल्याने त्यांचे भाव वाढलेलेच आहे. लसण १०० ते १४० रुपये, तर लिंबू ६० रुपये प्रति किलोवर कायम आहे. यासोबतच बारीक हिरवी मिरची ६० रुपये प्रति किलोवर आहे.

खाद्यतेलाचे भाव पुन्हा वाढल्याने आर्थिक भार वाढला आहे. मात्र डाळीचे भाव कमी झाल्याने तसेच भाजीपालादेखील स्थिर असल्याने दिलासा आहे.

- रमेश जाधव, ग्राहक

कमी झालेले खाद्यतेलाचे भाव या आठवड्यात पुन्हा वाढले आहे, तर डाळींचे भाव काहीसे कमी झाले आहे. इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे.

- ईश्वर चौधरी, व्यापारी

गेल्या आठवड्यात भाववाढ झालेल्या कोथिंबीरचे भाव तसेच कांद्याचे भाव या आठवड्यात कमी झाले आहे.

- शरद सोनवणे, भाजीपाला विक्रेते