शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

कांद्याचे कोडे काही सुटेना

By ram.jadhav | Updated: September 11, 2017 01:27 IST

पाऊस नसल्याने लागवड घटणार, आहे त्यालाही भाव मिळेना

ठळक मुद्देसरकारचे शेतकºयांसाठी मारक धोरणस्थानिक शेतकºयांच्या मालाला भाव नाही आणि परदेशातून आवकनेहमीप्रमाणे बळीराजाचा जातोय बळी

राम जाधव आॅनलाईन लोकमत दि़ ११ -दोन वर्षांपासून गडगडलेले कांद्याचे दर थोडेफार वाढत असतानाच सरकारने विदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा कांद्याचे दर उतरणे सुरू झाले आहे़ त्यातच इतर राज्यांतील भागात पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने, आता देशाला कांदा पुरविण्याची जबाबदारी नाशिकवर असल्याचे म्हटले जात आहे़ खान्देशात यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार आहे़ तर पिकांसाठी पाणी मिळणार कुठून, अशी स्थिती आहे़ त्यामुळे रब्बीची तयारी करायला सांगणारे ‘साहेब’ खरीप येईल की नाही, याचीच शाश्वती नाही़दोन वर्षांपासून पडलेले कांद्याचे दर गेल्या महिन्यात कुठे वाढायला सुरू झाले होते़, तोच पुन्हा कांद्याचे दर पाडण्यासाठी सरकार प्रयत्नशील झाले आहे़ ग्राहकांची अत्यंत काळजी असलेल्या ग्राहक कल्याण मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक घेऊन इजिप्तमधून २४०० टन कांदा आयात केल्याचे व अजून ९ हजार टन कांदा आयात होत असल्याचे सचिवांनी सांगितले़़़़ या बैठकीला वाणिज्य आणि कृषिमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच खासगी व्यापारीही आर्वजून उपस्थित होते.देशांतर्गत कांद्याचा दर वाढण्याआधीच ग्राहकांची इतकी काळजी घेणाºया सरकारला, दोन वर्षांपासून कांद्याला भाव मिळत नाही म्हणून कांद्याच्या शेतात रोटाव्हेटर फिरवणारे आणि कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणारे शेतकरी मात्र दिसत नाही, हे आश्चर्यच!निघालेला कांदा मे, जून व शेवटी जुलैपर्यंत साठवणूक करून भाव मिळत नाही म्हणून शेतकºयांनी विकला आणि त्यानंतर लगेचच जुलै महिन्याच्या अखेरपासून कांद्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली हे विशेष़ आता शेतकºयांकडे अल्पप्रमाणात माल आहे़ नवीन लागवडीसाठी पाणी नसल्याने खान्देशात कांद्याची लागवड यावर्षी घटणार आहे़ २० एकरवर लागवड करणारे शेतकरी यावर्षी केवळ २ एकरपर्यंतच कांद्याची लागवड करत आहेत़ तर अनेकांनी कांदा लागवडीसाठी राखून ठेवलेल्या शेतात आता दादर किंवा हरभरा लागवडीचे नियोजन सुरू केले आहे़ मागील आठवड्यात गुरुवारपर्यंत १२ ते १८ रुपयांपर्यंत कांद्याला ठोक भाव मिळत होता़ तो शुक्रवारी उतरून ११ ते १५ रुपये प्रती किलो झाला होता़शेतकºयांमध्ये निरुत्साहकांद्याला भाव नाही, पाणी नाही, त्यामुळे कांदा लागवडीसाठी शेतकºयांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे़ त्यातच पाणी टिकण्याची शाश्वती नसल्याने, शेतकरी परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़गेल्या दोन वर्षांपासून कांद्याला भाव मिळत नाही म्हणून आम्ही नुकसान झेलून कर्जबाजारी झालो़ मात्र आता थोडेफार दर मिळून पदरात काही पडेल त्यापूर्वीच जुलमी सरकारने ग्राहकांची काळजी घेण्याचे ‘सोंग’ आणले आहे़ इकडे बळीराजाचा नेहमीप्रमाणे बळी जातोय याचे मात्र सोयरसूतक कुणालाही नाही़ -विलास माळी, कांदा उत्पादक शेतकरी, चोपडा़