शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कांद्याचे कोडे काही सुटेना

By ram.jadhav | Updated: September 11, 2017 01:27 IST

पाऊस नसल्याने लागवड घटणार, आहे त्यालाही भाव मिळेना

ठळक मुद्देसरकारचे शेतकºयांसाठी मारक धोरणस्थानिक शेतकºयांच्या मालाला भाव नाही आणि परदेशातून आवकनेहमीप्रमाणे बळीराजाचा जातोय बळी

राम जाधव आॅनलाईन लोकमत दि़ ११ -दोन वर्षांपासून गडगडलेले कांद्याचे दर थोडेफार वाढत असतानाच सरकारने विदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा कांद्याचे दर उतरणे सुरू झाले आहे़ त्यातच इतर राज्यांतील भागात पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने, आता देशाला कांदा पुरविण्याची जबाबदारी नाशिकवर असल्याचे म्हटले जात आहे़ खान्देशात यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार आहे़ तर पिकांसाठी पाणी मिळणार कुठून, अशी स्थिती आहे़ त्यामुळे रब्बीची तयारी करायला सांगणारे ‘साहेब’ खरीप येईल की नाही, याचीच शाश्वती नाही़दोन वर्षांपासून पडलेले कांद्याचे दर गेल्या महिन्यात कुठे वाढायला सुरू झाले होते़, तोच पुन्हा कांद्याचे दर पाडण्यासाठी सरकार प्रयत्नशील झाले आहे़ ग्राहकांची अत्यंत काळजी असलेल्या ग्राहक कल्याण मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक घेऊन इजिप्तमधून २४०० टन कांदा आयात केल्याचे व अजून ९ हजार टन कांदा आयात होत असल्याचे सचिवांनी सांगितले़़़़ या बैठकीला वाणिज्य आणि कृषिमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच खासगी व्यापारीही आर्वजून उपस्थित होते.देशांतर्गत कांद्याचा दर वाढण्याआधीच ग्राहकांची इतकी काळजी घेणाºया सरकारला, दोन वर्षांपासून कांद्याला भाव मिळत नाही म्हणून कांद्याच्या शेतात रोटाव्हेटर फिरवणारे आणि कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणारे शेतकरी मात्र दिसत नाही, हे आश्चर्यच!निघालेला कांदा मे, जून व शेवटी जुलैपर्यंत साठवणूक करून भाव मिळत नाही म्हणून शेतकºयांनी विकला आणि त्यानंतर लगेचच जुलै महिन्याच्या अखेरपासून कांद्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली हे विशेष़ आता शेतकºयांकडे अल्पप्रमाणात माल आहे़ नवीन लागवडीसाठी पाणी नसल्याने खान्देशात कांद्याची लागवड यावर्षी घटणार आहे़ २० एकरवर लागवड करणारे शेतकरी यावर्षी केवळ २ एकरपर्यंतच कांद्याची लागवड करत आहेत़ तर अनेकांनी कांदा लागवडीसाठी राखून ठेवलेल्या शेतात आता दादर किंवा हरभरा लागवडीचे नियोजन सुरू केले आहे़ मागील आठवड्यात गुरुवारपर्यंत १२ ते १८ रुपयांपर्यंत कांद्याला ठोक भाव मिळत होता़ तो शुक्रवारी उतरून ११ ते १५ रुपये प्रती किलो झाला होता़शेतकºयांमध्ये निरुत्साहकांद्याला भाव नाही, पाणी नाही, त्यामुळे कांदा लागवडीसाठी शेतकºयांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे़ त्यातच पाणी टिकण्याची शाश्वती नसल्याने, शेतकरी परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़गेल्या दोन वर्षांपासून कांद्याला भाव मिळत नाही म्हणून आम्ही नुकसान झेलून कर्जबाजारी झालो़ मात्र आता थोडेफार दर मिळून पदरात काही पडेल त्यापूर्वीच जुलमी सरकारने ग्राहकांची काळजी घेण्याचे ‘सोंग’ आणले आहे़ इकडे बळीराजाचा नेहमीप्रमाणे बळी जातोय याचे मात्र सोयरसूतक कुणालाही नाही़ -विलास माळी, कांदा उत्पादक शेतकरी, चोपडा़