शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

काहींना बोट धरून मोठे केले, अनेक जण विसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 00:49 IST

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी चिमटे घेत जोरदार फटकेबाजी केली.

जळगाव : जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी गिरीश महाजन व मी देखील फार वेळ देऊ शकलो नाही. उदय वाघ यांनी यश मिळविले. ज्यांनी यश दिले ती जनता व कार्यकर्त्यांना विसरू नका त्यांची जाण ठेवा.   काही नवीन आले त्यांना येथील संस्काराने बोट धरून मोठे केले, ते मोठे झाले याचा आनंद आहे. अनेक जण विसरत चाललेत.  किशोर काळकरांचा संपर्क नसतो,  अशा शब्दात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी चिमटे घेत जोरदार फटकेबाजी केली. भाजपा जिल्हा कार्यालयात पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, , खासदार ए.टी. पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार स्मिता वाघ, आमदार उन्मेश पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, बेटी बचाव अभियानाचे राष्टÑीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके, सह संघटन मंत्री किशोर काळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.  या जिल्ह्यात २/३ संस्था ताब्यात आहेत. हे अनेक वर्षातील लढ्याचे, कष्टाचे फळ आहे. १९८० च्या कालखंडात पक्ष शून्य होता. दोन सदस्य पंचायत समितीचे व एक जिल्हा परिषदेत होता. पण कार्यकर्त्यांच्या बळावर ताकद वाढत गेली.  अनेक विरोध सहन करत ही ताकद वाढली. ३३ सदस्य निवडून आले, पण आकडा ३४ चाखडसे म्हणाले, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत  गिरीश महाजन व्यस्त होते त्यामुळे ते व मीदेखील फारसा वेळ जिल्ह्यात देऊ शकलो नाही. उदय बापूंचे नेतृत्व निवडणुकीत होते. बºयाच गोष्टी या मलाही माहित नसतात. ३३ सदस्य निवडून आले पण आकडा ३४ झाला हे देखील मला माहित नव्हते.पक्षाने स्वबळावर ३३ जागांवर यश मिळविले. सत्ता ही आमचीच असेल. ३४ चा आकडाही आम्ही पूर्ण केला असल्याचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ प्रास्ताविकात म्हणाले. २०१२ मध्ये पक्षाला ३ लाख ३० हजाराचे मताधिक्य होते ते यावेळी ५ लाख ५० हजारावर गेले आहे. संघटन, नियोजन व विकास हे ध्येय असल्याचेही ते म्हणाले. सदस्यांचा सत्कार यावेळी जिल्हा परिषदेत नव्याने निवडून आलेल्या ३३ सदस्यांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.  गट स्थापन करू         - जलसंपदामंत्री४० पेक्षा जास्त यश मिळवायचा आपला संकल्प होता पण तो पूर्ण करता आला नाही याचे शल्य असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले. येत्या दोन दिवसात पक्षाचा गट स्थापन करायचा आहे, त्या दृष्टीने तयार रहा. पूर्ण बहुमत मिळाले असते तर अधिक आनंद झाला असता. मिळालेले यश कार्यकर्त्याच्या जोरावर असल्याने त्यांचे अभिनंदनही महाजन यांनी केले.उतू नका मातू नका-चंद्रकांत पाटीलकोणाचीही मदत न घेता, युती न करता पक्षाला या जिल्ह्णात यश मिळाले. अनेकांच्या ताकदीने ते मिळाले आहे.  पण एक धोका असतो. यश मिळाले ते डोक्यात जाऊ देऊ नका. उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले. केंद्र व राज्याच्या अनेक योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवून खूप काम करा, असेही ते यावेळी म्हणाले.