शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

एकमेव आधार कोरोनाने नेला; या पालकांना मदत कोण करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:19 IST

जिल्ह्यात अनेक कुटुंबे आली उघड्यावर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाची दुसरी लाट तरुण जिवावरच उठली आहे. पहिल्या लाटेत ...

जिल्ह्यात अनेक कुटुंबे आली उघड्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाची दुसरी लाट तरुण जिवावरच उठली आहे. पहिल्या लाटेत सर्वाधिक मृत्यू वृद्धांचे झाले होते, तर दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू तरुणांचे झालेले आहेत. अनेक कुटुंबांत एकमेव अपत्य कोरोनाने हिरावून घेतले आहेत. वृद्धापकाळाचा आधारच गेल्याने पालकांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. कोरोना योद्धा म्हणून कार्य करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत दिली जात आहे. मात्र, एकमेव आधार गेलेल्या पालकांना मदत कोण करणार? असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिलेला आहे. आई-वडील मरण पावलेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे; पण जे आई-वडीलच निराधार झाले व त्यांना कोणताही आधार नाही. उत्पन्नाचे साधन नाही किंवा वयोमानानुसार ते कामही करू शकणार नाहीत, अशा पालकांचे काय? त्यांच्यासाठी शासनाने अद्याप तरी कोणतेही धोरण आखलेले नाही.

लाॅकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाला म्हणून रिक्षाचालकांना दीड हजाराची मदत शासनाने केली. गोरगरिबांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला; परंतु अतिशय गरीब कुटुंबातीलच कमावता व्यक्ती गेल्याने उघड्यावर आलेल्या माता-पित्यांना शासनाने कोणोही अर्थसाहाय्य जाहीर केलेले नाही, अर्थसाहाय्याची खरी गरज या पालकांना आहे.

कोरोनाचे एकूण रुग्ण - १४०७३३

बरे झालेले -१३४७६८

सध्या उपचार घेत असलेले -

एकूण मृत्यू -२५५०

(बॉक्स)

अख्खे कुटुंबच गेले... फक्त मुले राहिली

सावदा येथे तर आई-वडील, ज्येष्ठ काका-काकू व आजी असे अख्खे कुटुंबच कोरोनाने हिरावून घेतले. या कुटुंबात शिक्षण घेत असलेले भाऊ, बहीण यातून बचावले आहेत. पालकत्व हिरावल्याने ही मुले पोरकी झाली आहेत. एकाच महिन्यात एकाच कुटुंबात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. त्यांचा आधारच कोरोनाने हिरावून घेतला आहे.

बाॅक्स

निराधार झालेल्यांना अर्थसाहाय्याची गरज

अनेक कुटुंबांत एकमेव आधार कोरोनाने हिरावला आहे. अनेक कुटुंबांमध्ये कमावता मुलगा गेला आहे. आता या कुटुंबांना कोणीच आधार नाही. अशांना शासनाने अर्थसाहाय्य करण्याची गरज आहे. कोरोना योद्धा म्हणून ट्रेक करणारे आरोग्य कर्मचारी पोलीस व इतर फ्रंटलाइन वर्कर यांचा जीव गमावला असेल तर त्यांच्या कुटुंबाला शासनाने अर्थसाहाय्य दिले जाते. मात्र, ज्यांच्या मागे- पुढे कोणीच नाही. ते उघड्यावर आलेले आहेत अशांना शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही. शासनाने त्यांना मदत करावी, अशी मागणी जननायक फाउंडेशन या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी केली आहे.