शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
2
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
3
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
4
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
5
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
6
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
7
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
8
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
9
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
10
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
11
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
12
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
13
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
14
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
15
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
16
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
17
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
18
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
19
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
20
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Daily Top 2Weekly Top 5

एकमेव आधार कोरोनाने नेला; या पालकांना मदत कोण करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:19 IST

जिल्ह्यात अनेक कुटुंबे आली उघड्यावर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाची दुसरी लाट तरुण जिवावरच उठली आहे. पहिल्या लाटेत ...

जिल्ह्यात अनेक कुटुंबे आली उघड्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाची दुसरी लाट तरुण जिवावरच उठली आहे. पहिल्या लाटेत सर्वाधिक मृत्यू वृद्धांचे झाले होते, तर दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू तरुणांचे झालेले आहेत. अनेक कुटुंबांत एकमेव अपत्य कोरोनाने हिरावून घेतले आहेत. वृद्धापकाळाचा आधारच गेल्याने पालकांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. कोरोना योद्धा म्हणून कार्य करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत दिली जात आहे. मात्र, एकमेव आधार गेलेल्या पालकांना मदत कोण करणार? असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिलेला आहे. आई-वडील मरण पावलेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे; पण जे आई-वडीलच निराधार झाले व त्यांना कोणताही आधार नाही. उत्पन्नाचे साधन नाही किंवा वयोमानानुसार ते कामही करू शकणार नाहीत, अशा पालकांचे काय? त्यांच्यासाठी शासनाने अद्याप तरी कोणतेही धोरण आखलेले नाही.

लाॅकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाला म्हणून रिक्षाचालकांना दीड हजाराची मदत शासनाने केली. गोरगरिबांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला; परंतु अतिशय गरीब कुटुंबातीलच कमावता व्यक्ती गेल्याने उघड्यावर आलेल्या माता-पित्यांना शासनाने कोणोही अर्थसाहाय्य जाहीर केलेले नाही, अर्थसाहाय्याची खरी गरज या पालकांना आहे.

कोरोनाचे एकूण रुग्ण - १४०७३३

बरे झालेले -१३४७६८

सध्या उपचार घेत असलेले -

एकूण मृत्यू -२५५०

(बॉक्स)

अख्खे कुटुंबच गेले... फक्त मुले राहिली

सावदा येथे तर आई-वडील, ज्येष्ठ काका-काकू व आजी असे अख्खे कुटुंबच कोरोनाने हिरावून घेतले. या कुटुंबात शिक्षण घेत असलेले भाऊ, बहीण यातून बचावले आहेत. पालकत्व हिरावल्याने ही मुले पोरकी झाली आहेत. एकाच महिन्यात एकाच कुटुंबात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. त्यांचा आधारच कोरोनाने हिरावून घेतला आहे.

बाॅक्स

निराधार झालेल्यांना अर्थसाहाय्याची गरज

अनेक कुटुंबांत एकमेव आधार कोरोनाने हिरावला आहे. अनेक कुटुंबांमध्ये कमावता मुलगा गेला आहे. आता या कुटुंबांना कोणीच आधार नाही. अशांना शासनाने अर्थसाहाय्य करण्याची गरज आहे. कोरोना योद्धा म्हणून ट्रेक करणारे आरोग्य कर्मचारी पोलीस व इतर फ्रंटलाइन वर्कर यांचा जीव गमावला असेल तर त्यांच्या कुटुंबाला शासनाने अर्थसाहाय्य दिले जाते. मात्र, ज्यांच्या मागे- पुढे कोणीच नाही. ते उघड्यावर आलेले आहेत अशांना शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही. शासनाने त्यांना मदत करावी, अशी मागणी जननायक फाउंडेशन या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी केली आहे.