शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांचे गाव फुल गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 21:58 IST

स्वातंत्र्य लढ्यापासून आजतागायत देशाच्या सीमेच्या रक्षणाकरिता लढणारे सैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.

ठळक मुद्देसैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव जेमतेम पाच हजार वस्तीच्या या गावात आजी-माजी सैनिकांची संख्या तीनशेवरसैन्यदलात शिपायापासून हवालदार, नायक, कॅप्टन पदापर्यंत बऱ्याच माजी सैनिकांनी सांभाळला कार्यभार १९६५ मधील पाकिस्तान विरोधात तसेच सन १९७१ बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभाग

सुधीर पाटीलवरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : स्वातंत्र्य लढ्यापासून आजतागायत देशाच्या सीमेच्या रक्षणाकरिता लढणारे सैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.जेमतेम पाच हजार वस्तीच्या या गावात आजी-माजी सैनिकांची संख्या तीनशेवर आहे. स्वातंत्र्य लढ्यात गावातील स्वातंत्र्य सैनिकांनीही सहभाग घेत देशाच्या स्वातंत्र्याकरिता लढण्याचे प्रेरणास्थान सानेगुरुजींकडून मिळाले. तेव्हापासून देशसेवेचे व्रत उचलत आजही देशरक्षणार्थ तरुणांचा कल आहे.स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गावातील राममंदिरात साने गुरुजीनी इंग्रजाच्या लक्षात न येता देश स्वातंत्र्य लढ्यात तरुणांना सहभागी करून घेत ब्रिटिशांच्या विरोधात फळी उभारली. त्यात त्रंबक झेंडू पाटील, अमृत पाटील (दिवानजी) त्र्यंबक पंडू पाटील, नारायण आवसू चौधरी, भालचंद्र नारायण पाटील, नथ्थू तोताराम चौधरी अशी एक स्वातंत्र्य सैनिकांची फळी उभी राहिली. ब्रिटिश शासनाच्या विरोधात कारवाया करताना त्यांना अमळनेर येथील कारागृहात शिक्षा भोगावी लागली.त्यानंतर कालांतराने १९४७ ला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरही देशसेवेसाठी भारतीय सैन्यदलात भरती होण्याकरिता तरूणांचा ओढा असल्याने येथील तरुण गावाच्या लोकसंखेच्या प्रमाणात जास्त प्रमाणात आहे. सैन्यदलात शिपायापासून हवालदार, नायक, कॅप्टन पदापर्यंत बऱ्याच माजी सैनिकांनी कार्यभार सांभाळला आहे.कॅप्टन रामदास चौधरी यांनी सन १९६५ मधील पाकिस्तान विरोधात तसेच सन १९७१ बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर वासुदेव सोमा महाजन यांनी सन १९७१ च्या युध्दासह श्रीलंकेत शांती सेनेत सहभाग नोंदवला. तसेच हरी नारायण कोलते यांनी कारगील युध्दात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.माजी सैनिकांचे मार्गदर्शनसैन्य दलातून निवृत्तीनंतर या माजी सैनिकांनी तरूणांना सतत मार्गदर्शन केल्याने तरूणांचा कल देशसेवेसाठी भारतीय सैन्यदलात भरती होण्याची वाढल्याने भारतीय सैन्यदलात गावातील तरुणांची संख्याही वाढली.ऐतिहासीक वास्तूसन १८११ साली उभारण्यात आलेली राममंदिराची वास्तू १० वर्षांनंतर आजही स्वातंत्र्य लढ्याची साक्षीदार म्हणून डौलाने उभी आहे

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनBhusawalभुसावळ