शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

सैनिकांचे गाव फुल गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 21:58 IST

स्वातंत्र्य लढ्यापासून आजतागायत देशाच्या सीमेच्या रक्षणाकरिता लढणारे सैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.

ठळक मुद्देसैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव जेमतेम पाच हजार वस्तीच्या या गावात आजी-माजी सैनिकांची संख्या तीनशेवरसैन्यदलात शिपायापासून हवालदार, नायक, कॅप्टन पदापर्यंत बऱ्याच माजी सैनिकांनी सांभाळला कार्यभार १९६५ मधील पाकिस्तान विरोधात तसेच सन १९७१ बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभाग

सुधीर पाटीलवरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : स्वातंत्र्य लढ्यापासून आजतागायत देशाच्या सीमेच्या रक्षणाकरिता लढणारे सैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.जेमतेम पाच हजार वस्तीच्या या गावात आजी-माजी सैनिकांची संख्या तीनशेवर आहे. स्वातंत्र्य लढ्यात गावातील स्वातंत्र्य सैनिकांनीही सहभाग घेत देशाच्या स्वातंत्र्याकरिता लढण्याचे प्रेरणास्थान सानेगुरुजींकडून मिळाले. तेव्हापासून देशसेवेचे व्रत उचलत आजही देशरक्षणार्थ तरुणांचा कल आहे.स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गावातील राममंदिरात साने गुरुजीनी इंग्रजाच्या लक्षात न येता देश स्वातंत्र्य लढ्यात तरुणांना सहभागी करून घेत ब्रिटिशांच्या विरोधात फळी उभारली. त्यात त्रंबक झेंडू पाटील, अमृत पाटील (दिवानजी) त्र्यंबक पंडू पाटील, नारायण आवसू चौधरी, भालचंद्र नारायण पाटील, नथ्थू तोताराम चौधरी अशी एक स्वातंत्र्य सैनिकांची फळी उभी राहिली. ब्रिटिश शासनाच्या विरोधात कारवाया करताना त्यांना अमळनेर येथील कारागृहात शिक्षा भोगावी लागली.त्यानंतर कालांतराने १९४७ ला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरही देशसेवेसाठी भारतीय सैन्यदलात भरती होण्याकरिता तरूणांचा ओढा असल्याने येथील तरुण गावाच्या लोकसंखेच्या प्रमाणात जास्त प्रमाणात आहे. सैन्यदलात शिपायापासून हवालदार, नायक, कॅप्टन पदापर्यंत बऱ्याच माजी सैनिकांनी कार्यभार सांभाळला आहे.कॅप्टन रामदास चौधरी यांनी सन १९६५ मधील पाकिस्तान विरोधात तसेच सन १९७१ बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर वासुदेव सोमा महाजन यांनी सन १९७१ च्या युध्दासह श्रीलंकेत शांती सेनेत सहभाग नोंदवला. तसेच हरी नारायण कोलते यांनी कारगील युध्दात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.माजी सैनिकांचे मार्गदर्शनसैन्य दलातून निवृत्तीनंतर या माजी सैनिकांनी तरूणांना सतत मार्गदर्शन केल्याने तरूणांचा कल देशसेवेसाठी भारतीय सैन्यदलात भरती होण्याची वाढल्याने भारतीय सैन्यदलात गावातील तरुणांची संख्याही वाढली.ऐतिहासीक वास्तूसन १८११ साली उभारण्यात आलेली राममंदिराची वास्तू १० वर्षांनंतर आजही स्वातंत्र्य लढ्याची साक्षीदार म्हणून डौलाने उभी आहे

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनBhusawalभुसावळ