शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ममुराबाद-धामणगाव रस्त्याचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:21 IST

ममुराबाद, ता.जळगाव : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या ममुराबाद- धामणगाव रस्त्याचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. तीन वर्षात ...

ममुराबाद, ता.जळगाव : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या ममुराबाद- धामणगाव रस्त्याचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. तीन वर्षात या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होऊ शकले नाही. अर्धवट कामाला सध्या कुणीच वाली नाही.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत ममुराबाद गावाजवळील राज्यमार्ग ४२ ते धामणगाव- खापरखेडा गावापर्यंतच्या साडेचार किलोमीटर रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. सुमारे दोन कोटी ५४ लाख ५२ हजार रुपयांच्या निधीला मान्यता मिळाल्यानंतर त्याद्वारे जवळपास सव्वाचार किलोमीटरचे डांबरीकरण व उर्वरित रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच आठ ठिकाणी लहान मोऱ्यांचे काम व हातेड नाल्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम त्यातून प्रस्तावित आहे. ३०ऑक्टोबर २०१८ रोजी कामाला सुरुवात होऊन वर्षभरात सदरचे काम पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला देण्यात आली होती. प्रत्यक्षात संबंधितांकडून आजतागायत या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसून, डांबरीकरणासह हातेड नाल्यावरील मोठ्या पुलाचे काम करताना खूपच दिरंगाई केली जात आहे. खडीकरण झालेल्या रस्त्यावरील खडी मोठ्या प्रमाणात उखडली असून, मोऱ्यांचे बांधकाम केल्यानंतर त्याठिकाणी पाण्याचा व्यवस्थित वापर न केल्याने बहुतांश ठिकाणी मोठे तडे पडले आहेत. हातेड नाल्याजवळ फक्त वाळू आणून टाकली आहे. पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. मधल्या कमी अंतराच्या रस्त्याचे काम पूर्णत्वास आल्यावर धामणगावसह परिसरातील खापरखेड्याच्या नागरिकांचा मोठा फेरा वाचू शकणार आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून सदर रस्ता पूर्ण होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेनेही धामणगाव रस्त्याच्या अर्धवट कामाकडे सोयीस्कर डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.

------------------------------

जिल्हाधिकाऱ्यांचा रस्त्यासाठी पत्र व्यवहार

प्रस्तावित धामणगाव रस्त्यालगत भारतीय खाद्य निगम (एफसीआय) अंतर्गत एका खासगी संस्थेच्या माध्यमातून मोठी धान्य गोदामे उभारण्यात आली आहेत. याठिकाणी साठविण्यात आलेल्या धान्याचे जिल्हाभरातील रेशन दुकानांना वितरण केले जाते. मात्र, धामणगाव रस्ता कच्चा व एकेरी असल्याने विशेषतः पावसाळ्यात गोदामांपर्यंत अवजड वाहने पोहोचणे जिकिरीचे होऊन जाते. बऱ्याचवेळा वाहने चिखलात फसतात. प्रसंगी वाहन उलटल्यामुळे अन्नधान्याची नासाडी होते. तसेच उचल थांबल्याने धान्य पुरवठ्यात अडचणी येतात. ही स्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी नुकताच पत्र व्यवहार केला असून, त्याद्वारे धामणगाव रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची सूचना दिली आहे.

--------------------------------------

फोटो कॅप्शन

१) ममुराबाद- धामणगाव रस्त्याचे काम अर्धवट सोडून देण्यात आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जाड खडी उखडली आहे.

२) धामणगाव रस्त्यावरील मोऱ्यांची कामे खूपच निकृष्ट दर्जाची असून, बांधकामाला मोठे तडे पडले आहेत. (जितेंद्र पाटील)