शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

तपकीर आणि लॉटरीचं तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 16:19 IST

लोकमतच्या ‘वीकेण्ड’ पुरवणीमधील अॅड. माधव भोकरीकर यांचा लेख शनिवार, दि. 26 ऑगस्ट 2017

माङो वडील आपल्या आयुष्यात केव्हा तरी ‘लॉटरी’ लागेल या आशेने नियमीत महाराष्ट्र राज्य लॉटरीची तिकिटे घ्यायचे. नोकरीला होते तेव्हा हे प्रमाण जास्त होते कारण गावात येणंजाणं असायचे. मात्र नोकरीतून दोन वर्षाची मुदतवाढ मिळाल्यानंतर निवृत्त झाल्यावर तुलनेने गावात जाणे कमी झाले म्हणून तिकिटे काढणे आपोआपच कमी झाले. ‘तिकिटांमधे जेवढे पैसे गेले तेवढेपण पैसे काही आजर्पयत लॉटरीतून मिळाले नसतील.’ आमच्या आईचे नेहमीचे उद्गार! यावर ‘असू दे ! मिळतील केव्हा तरी!’ हा वडिलांचा तिला दिलासा. आईचा यावर विश्वास नसे. तिकिटे मात्र ते स्वत:च काढत, कोणाला काढण्यासाठी पाठवत नसत. थोडय़ा गप्पा झाल्यावर माझी आठवण यायची. ‘अरे, तपकीर आणायला सांग रे.’ म्हणत त्या कनवटीला खोचलेल्या कापडी पिशवीतून पाच-दहा पैसे काढायच्या. काही वेळा सोबत पिशवी असायची तर काही वेळा नसायची. ‘काकू, तुम्ही जा घरी. मला पण तपकीर आणायची आहे. तुमची पण आणायला सांगतो.’ भाऊ काकूंना सांगायचे. ‘बरं, पाठव त्याला घरीच. मी निघते आता’ म्हणत त्या उठायच्या. चालायला लागायच्या. जाताजाता माङया धाकटय़ा काकूंशी बोलायच्या. मी भाऊंकडून पैसे घेऊन दुकानात जायचो. वडिलांना ‘मद्रास तपकीर’ लागायची. भाऊंकडून पैसे घेऊन थोडे जवळचे दुकान म्हणजे शारंगधरशेठ कासार यांचे. एकदा त्यांच्याकडून तपकीर घेतली व दलाल काकूंना नेवून दिली. त्यांनी पुडी उघडून पाहिली, त्यांना हवी असलेली तपकीर नव्हती. ‘अरे, ही माझी तपकीर नाही. परत कर आणि माझी आण.’ त्यांनी तपकिरीचे नाव सांगितले. पुन्हा दुकानावर जाणे आले. त्यांच्याकडून तपकीर बदलवून घेणे आले. अपमानास्पद प्रसंग, करणार काय? कारण घरातील काम सोडून इतरांच्या कामाला नकार देण्याइतका बाणेदारपणा त्यावेळी आमच्यात नव्हता. ते कोणाचेही काम पूर्ण व्यवस्थितपणे करावे लागे. अलिकडची पिढी तुलनेने भाग्यवान! काम न करून सांगणार कोणाला? परत गेलो, शारंगधरशेठ बसले होते. त्यांना तपकिरीची पुडी परत दिली व सांगितले, ‘ही नको. बदलवून दुसरी द्या.’ त्यांनी तपकिरीचे नाव विचारले, मी आठवू लागलो. मला सांगता येईना. त्यांनी माझी अडचण ओळखली व विचारले, ‘कोणाला पाहिजे आहे?’ मी समस्या सुटल्याच्या आनंदात सांगितले, ‘दलाल काकू!’ ‘मग, हे अगोदर नाही सांगायचे की दलाल काकूंची तपकीर म्हणून?’ शारंगधरशेठ बोलले. मला ऐकून घेणे भाग होते. त्यावेळी कोणासाठीही कोणाचेही बोलणे ऐकावे लागायचे. एकंदरीत तडफ कमीच होती. आता नाही ऐकणार कोणी! त्यांनी काळसर तपकिरीची पुडी बांधली व सांगितले, ‘त्यांची तपकीर दिली आहे. यापुढे त्यांना हवी असेल तर त्यांचे नाव सांगत जा.’ ही त्यांनी समज दिल्यावर, मी ती पुडी घेतली व काकूंना आणून दिली. त्यांना प्रसंग जसा घडला तसा सांगितला. त्या हसल्या. त्यांनी पुडी उघडून पाहिली व समाधानाने मान हलवून छान! म्हणत चिमूटभर ओढली. ते छान कोणाला होते हे अजूनही समजले नाही; बहुतेक शारंगधरशेठ यांच्या धोरणीपणाला असावी. कदाचित माङयावर आईच्या कडक स्वभावाचा परिणाम जास्त असावा. मी लॉटरीचे तिकीट आजर्पयत फक्त दोनदा काढले, ती निदान 25 वर्षापूर्वी! एकदा म्हणजे तिकिटे विकणारा फारच पोरसवदा मुलगा होता, त्याच्या ‘साहेब, एक तरी तिकीट घ्या.’ या विनंतीतील स्वर मला हलवून गेला म्हणून! आणि दुस:यांदा भुसावळला कोर्टातूून येताना, घाईगर्दीत तिकीट विक्रेत्याने अगदी अजीजीने म्हटले म्हणून! दोन्ही वेळा मला बक्षीस मिळाले, पण नंतर मी तिकीट काढले नाही. ‘परमेश्वराला जर आपल्याला काही द्यायचे असेल तर तो आपल्या कष्टांचे फळ देईल, बसल्या-बसल्या तिकीट काढून घरी पैसे देणार नाही’ ही माझी भावना ! आता काही वेळा समजते या वयात, भाऊ लॉटरीची तिकिटे का घेत असतील? त्यासाठी जवळचे पैसे का खर्च करत असतील? आता त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत मी आहे. मग त्यांच्यापुढील त्या वेळच्या अनेक अडचणींचा डोंगर डोळ्यापुढे येतो. त्यांची ओढाताण, मनाची घालमेल, परिस्थितीचा रेटा, त्याला तोंड देण्याची असलेली ताकद ! आणि मग माझाच मी असं काहीतरी लिहून जातो. (उत्तरार्ध)