शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

निंदकाचे घर असावे शेजारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:12 IST

आपण आपल्या मित्रमंडळीत, समाजात, घरात, कुटुंबात, परिवारात, ऑफिसमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी भरपूर लोकांमध्ये वावरत असतो. अशा वेळेस कुणाचा विचार, स्वभाव, ...

आपण आपल्या मित्रमंडळीत, समाजात, घरात, कुटुंबात, परिवारात, ऑफिसमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी भरपूर लोकांमध्ये वावरत असतो. अशा वेळेस कुणाचा विचार, स्वभाव, सवयी, बोलणे आपल्यास न पटणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचा उदोउदो करणे कितपत योग्य आहे? काही व्यक्तींचा स्वभाव तोंडावर स्तुती आणि पाठीमागे निंदा असा बनलाच आहे. त्यात सुधारणा करणे कठीण नाही, पण शक्य आहे. नेहमी एखादी गोष्ट केल्यास तो स्वभावाचा भाग बनून जातो. निंदा करणे हा स्वभावाचा भाग बनलेल्या लोकांचे पण असेच आहे. अगदी बारीक-सारीक बाबींवरही ते सहकाऱ्याची, कुटुंबातील सदस्यांची निंदा करतात, त्याचे त्यांना काहीच वाटत नाही, कारण तो त्यांचा स्वभाव बनला आहे.

या निंदा करणाऱ्यांच्या हो मध्ये, आपण हो दिला तर नकळत आपलाही स्वभाव त्यांच्या सारखा बनतो, याची जाणीवही आपणास नसते. तेव्हा कुणी निंदा करीत असला तर एक चांगले वाक्य आहे, ते म्हणजे `सुनते हुए न सुनो, देखते हुए न देखो`. सूक्ष्म विचार केला तर त्यातून एकच भाव निघतो, तो म्हणजे जर कुणी आपल्यासमोर दुसऱ्या व्यक्तीची निंदा केली तर स्पष्टपणे त्यांना थांबवा.

काही वेळेस आपले वरिष्ठ अथवा मोठे निंदा करतात, तेव्हा त्यांना थांबविण्याचे धारिष्ट्य आपणात नसेल, किंवा त्यांना निंदा करण्यापासून प्रवृत्त करता येत नसेल तर फक्त एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या. असे केल्यास त्यांना त्याची जाणीव होईल. मात्र, त्यांच्या हो मध्ये हो देऊ नका. तुम्ही प्रतिसाद देत नाही, असे त्यांना जाणवेलच आणि असे केल्यास पुढे भविष्यात दुसऱ्यांची निंदा तुमच्याकडे ते पुन्हा कुणाची निंदा करणार नाही. त्याचा हा स्वभाव बदलण्यास तुम्ही पुढाकार घ्यावा, यामुळे एक होईल आपण इतरांचे दुर्गुण आपल्यात येऊ देणार नाही. आपण निंदा, नालस्ती ऐकून आपले मन अक्षरश: कचराकुंडी बनवितो, तेव्हा आपले मन कचराकुंडी बनवू नका. कुणीही यावे आणि तुमच्या कानात इतरांच्या निंदारूपी कचरा टाकावा. मनाला मंदिर बनवायचे असेल तर कुणी दुसऱ्याची निंदा,नालस्ती तुमच्याकडे करू लागला तर त्यास तेथेच थांबवा आणि त्यास त्याची जाणीव करून द्या, असे केल्यास निंदकाची घरे हळूहळू कमी होतील आणि हा समाज मूल्यनिष्ठ बनेल.

- ब्रह्माकुमारी मीनाक्षी दीदी, उपक्षेत्र संचालिका, ब्रह्माकुमारीज, जळगाव