शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

निंदकाचे घर असावे शेजारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:12 IST

आपण आपल्या मित्रमंडळीत, समाजात, घरात, कुटुंबात, परिवारात, ऑफिसमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी भरपूर लोकांमध्ये वावरत असतो. अशा वेळेस कुणाचा विचार, स्वभाव, ...

आपण आपल्या मित्रमंडळीत, समाजात, घरात, कुटुंबात, परिवारात, ऑफिसमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी भरपूर लोकांमध्ये वावरत असतो. अशा वेळेस कुणाचा विचार, स्वभाव, सवयी, बोलणे आपल्यास न पटणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचा उदोउदो करणे कितपत योग्य आहे? काही व्यक्तींचा स्वभाव तोंडावर स्तुती आणि पाठीमागे निंदा असा बनलाच आहे. त्यात सुधारणा करणे कठीण नाही, पण शक्य आहे. नेहमी एखादी गोष्ट केल्यास तो स्वभावाचा भाग बनून जातो. निंदा करणे हा स्वभावाचा भाग बनलेल्या लोकांचे पण असेच आहे. अगदी बारीक-सारीक बाबींवरही ते सहकाऱ्याची, कुटुंबातील सदस्यांची निंदा करतात, त्याचे त्यांना काहीच वाटत नाही, कारण तो त्यांचा स्वभाव बनला आहे.

या निंदा करणाऱ्यांच्या हो मध्ये, आपण हो दिला तर नकळत आपलाही स्वभाव त्यांच्या सारखा बनतो, याची जाणीवही आपणास नसते. तेव्हा कुणी निंदा करीत असला तर एक चांगले वाक्य आहे, ते म्हणजे `सुनते हुए न सुनो, देखते हुए न देखो`. सूक्ष्म विचार केला तर त्यातून एकच भाव निघतो, तो म्हणजे जर कुणी आपल्यासमोर दुसऱ्या व्यक्तीची निंदा केली तर स्पष्टपणे त्यांना थांबवा.

काही वेळेस आपले वरिष्ठ अथवा मोठे निंदा करतात, तेव्हा त्यांना थांबविण्याचे धारिष्ट्य आपणात नसेल, किंवा त्यांना निंदा करण्यापासून प्रवृत्त करता येत नसेल तर फक्त एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या. असे केल्यास त्यांना त्याची जाणीव होईल. मात्र, त्यांच्या हो मध्ये हो देऊ नका. तुम्ही प्रतिसाद देत नाही, असे त्यांना जाणवेलच आणि असे केल्यास पुढे भविष्यात दुसऱ्यांची निंदा तुमच्याकडे ते पुन्हा कुणाची निंदा करणार नाही. त्याचा हा स्वभाव बदलण्यास तुम्ही पुढाकार घ्यावा, यामुळे एक होईल आपण इतरांचे दुर्गुण आपल्यात येऊ देणार नाही. आपण निंदा, नालस्ती ऐकून आपले मन अक्षरश: कचराकुंडी बनवितो, तेव्हा आपले मन कचराकुंडी बनवू नका. कुणीही यावे आणि तुमच्या कानात इतरांच्या निंदारूपी कचरा टाकावा. मनाला मंदिर बनवायचे असेल तर कुणी दुसऱ्याची निंदा,नालस्ती तुमच्याकडे करू लागला तर त्यास तेथेच थांबवा आणि त्यास त्याची जाणीव करून द्या, असे केल्यास निंदकाची घरे हळूहळू कमी होतील आणि हा समाज मूल्यनिष्ठ बनेल.

- ब्रह्माकुमारी मीनाक्षी दीदी, उपक्षेत्र संचालिका, ब्रह्माकुमारीज, जळगाव