शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

निंदकाचे घर असावे शेजारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:12 IST

आपण आपल्या मित्रमंडळीत, समाजात, घरात, कुटुंबात, परिवारात, ऑफिसमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी भरपूर लोकांमध्ये वावरत असतो. अशा वेळेस कुणाचा विचार, स्वभाव, ...

आपण आपल्या मित्रमंडळीत, समाजात, घरात, कुटुंबात, परिवारात, ऑफिसमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी भरपूर लोकांमध्ये वावरत असतो. अशा वेळेस कुणाचा विचार, स्वभाव, सवयी, बोलणे आपल्यास न पटणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचा उदोउदो करणे कितपत योग्य आहे? काही व्यक्तींचा स्वभाव तोंडावर स्तुती आणि पाठीमागे निंदा असा बनलाच आहे. त्यात सुधारणा करणे कठीण नाही, पण शक्य आहे. नेहमी एखादी गोष्ट केल्यास तो स्वभावाचा भाग बनून जातो. निंदा करणे हा स्वभावाचा भाग बनलेल्या लोकांचे पण असेच आहे. अगदी बारीक-सारीक बाबींवरही ते सहकाऱ्याची, कुटुंबातील सदस्यांची निंदा करतात, त्याचे त्यांना काहीच वाटत नाही, कारण तो त्यांचा स्वभाव बनला आहे.

या निंदा करणाऱ्यांच्या हो मध्ये, आपण हो दिला तर नकळत आपलाही स्वभाव त्यांच्या सारखा बनतो, याची जाणीवही आपणास नसते. तेव्हा कुणी निंदा करीत असला तर एक चांगले वाक्य आहे, ते म्हणजे `सुनते हुए न सुनो, देखते हुए न देखो`. सूक्ष्म विचार केला तर त्यातून एकच भाव निघतो, तो म्हणजे जर कुणी आपल्यासमोर दुसऱ्या व्यक्तीची निंदा केली तर स्पष्टपणे त्यांना थांबवा.

काही वेळेस आपले वरिष्ठ अथवा मोठे निंदा करतात, तेव्हा त्यांना थांबविण्याचे धारिष्ट्य आपणात नसेल, किंवा त्यांना निंदा करण्यापासून प्रवृत्त करता येत नसेल तर फक्त एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या. असे केल्यास त्यांना त्याची जाणीव होईल. मात्र, त्यांच्या हो मध्ये हो देऊ नका. तुम्ही प्रतिसाद देत नाही, असे त्यांना जाणवेलच आणि असे केल्यास पुढे भविष्यात दुसऱ्यांची निंदा तुमच्याकडे ते पुन्हा कुणाची निंदा करणार नाही. त्याचा हा स्वभाव बदलण्यास तुम्ही पुढाकार घ्यावा, यामुळे एक होईल आपण इतरांचे दुर्गुण आपल्यात येऊ देणार नाही. आपण निंदा, नालस्ती ऐकून आपले मन अक्षरश: कचराकुंडी बनवितो, तेव्हा आपले मन कचराकुंडी बनवू नका. कुणीही यावे आणि तुमच्या कानात इतरांच्या निंदारूपी कचरा टाकावा. मनाला मंदिर बनवायचे असेल तर कुणी दुसऱ्याची निंदा,नालस्ती तुमच्याकडे करू लागला तर त्यास तेथेच थांबवा आणि त्यास त्याची जाणीव करून द्या, असे केल्यास निंदकाची घरे हळूहळू कमी होतील आणि हा समाज मूल्यनिष्ठ बनेल.

- ब्रह्माकुमारी मीनाक्षी दीदी, उपक्षेत्र संचालिका, ब्रह्माकुमारीज, जळगाव