शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

निंदकाचे घर असावे शेजारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:12 IST

आपण आपल्या मित्रमंडळीत, समाजात, घरात, कुटुंबात, परिवारात, ऑफिसमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी भरपूर लोकांमध्ये वावरत असतो. अशा वेळेस कुणाचा विचार, स्वभाव, ...

आपण आपल्या मित्रमंडळीत, समाजात, घरात, कुटुंबात, परिवारात, ऑफिसमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी भरपूर लोकांमध्ये वावरत असतो. अशा वेळेस कुणाचा विचार, स्वभाव, सवयी, बोलणे आपल्यास न पटणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचा उदोउदो करणे कितपत योग्य आहे? काही व्यक्तींचा स्वभाव तोंडावर स्तुती आणि पाठीमागे निंदा असा बनलाच आहे. त्यात सुधारणा करणे कठीण नाही, पण शक्य आहे. नेहमी एखादी गोष्ट केल्यास तो स्वभावाचा भाग बनून जातो. निंदा करणे हा स्वभावाचा भाग बनलेल्या लोकांचे पण असेच आहे. अगदी बारीक-सारीक बाबींवरही ते सहकाऱ्याची, कुटुंबातील सदस्यांची निंदा करतात, त्याचे त्यांना काहीच वाटत नाही, कारण तो त्यांचा स्वभाव बनला आहे.

या निंदा करणाऱ्यांच्या हो मध्ये, आपण हो दिला तर नकळत आपलाही स्वभाव त्यांच्या सारखा बनतो, याची जाणीवही आपणास नसते. तेव्हा कुणी निंदा करीत असला तर एक चांगले वाक्य आहे, ते म्हणजे `सुनते हुए न सुनो, देखते हुए न देखो`. सूक्ष्म विचार केला तर त्यातून एकच भाव निघतो, तो म्हणजे जर कुणी आपल्यासमोर दुसऱ्या व्यक्तीची निंदा केली तर स्पष्टपणे त्यांना थांबवा.

काही वेळेस आपले वरिष्ठ अथवा मोठे निंदा करतात, तेव्हा त्यांना थांबविण्याचे धारिष्ट्य आपणात नसेल, किंवा त्यांना निंदा करण्यापासून प्रवृत्त करता येत नसेल तर फक्त एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या. असे केल्यास त्यांना त्याची जाणीव होईल. मात्र, त्यांच्या हो मध्ये हो देऊ नका. तुम्ही प्रतिसाद देत नाही, असे त्यांना जाणवेलच आणि असे केल्यास पुढे भविष्यात दुसऱ्यांची निंदा तुमच्याकडे ते पुन्हा कुणाची निंदा करणार नाही. त्याचा हा स्वभाव बदलण्यास तुम्ही पुढाकार घ्यावा, यामुळे एक होईल आपण इतरांचे दुर्गुण आपल्यात येऊ देणार नाही. आपण निंदा, नालस्ती ऐकून आपले मन अक्षरश: कचराकुंडी बनवितो, तेव्हा आपले मन कचराकुंडी बनवू नका. कुणीही यावे आणि तुमच्या कानात इतरांच्या निंदारूपी कचरा टाकावा. मनाला मंदिर बनवायचे असेल तर कुणी दुसऱ्याची निंदा,नालस्ती तुमच्याकडे करू लागला तर त्यास तेथेच थांबवा आणि त्यास त्याची जाणीव करून द्या, असे केल्यास निंदकाची घरे हळूहळू कमी होतील आणि हा समाज मूल्यनिष्ठ बनेल.

- ब्रह्माकुमारी मीनाक्षी दीदी, उपक्षेत्र संचालिका, ब्रह्माकुमारीज, जळगाव