शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

आठ दिवसांत तोडल्या साठ वीजजोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:22 IST

धरणगाव : कोरोनाच्या काळात नागरिकांचे आर्थिक संकट कोसळले आहे. महावितरणकडून थकबाकीपोटी वीजजोडणी तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली ...

धरणगाव : कोरोनाच्या काळात नागरिकांचे आर्थिक संकट कोसळले आहे. महावितरणकडून थकबाकीपोटी वीजजोडणी तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आठ दिवसांत ६० जोडण्या तोडण्यात आल्या आहेत.

वीजजोडणी तोडताना कुठल्याही हप्त्याची तरतूद केली जात नाही, त्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या कठीण काळात तरी ही मोहीम थांबवण्यात यावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे. महावितरणकडून आधीच वाढीव बिले दिली जात आहेत. तसेच रोज सात ते आठ वीजजोडण्या तोडण्यात येत आहेत. वीज वितरण विभागाकडून वाढीव बिलांच्या संदर्भात उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. यामुळे शहरात सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.

काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वीज वितरण विभागाला वीजबिल भरण्यासाठी टप्पे पाडून देण्याची सूचना केली होती. मात्र, अधिकारी ऐकण्यास तयार नाही, अशी स्थिती आहे.

कोट

लहान माळीवाडा परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांत रोज सात ते आठ ठिकाणच्या वीजजोडण्या तोडण्यात आल्या.

- भीमराज पाटील, सामान्य नागरिक धरणगाव

कोट

आठ दिवसांत सुमारे साठ वीजजोडणी कापण्यात आली आहे. ज्या ग्राहकांनी सहा महिने, एक वर्षापासून वीजबिल भरले नाही, त्यांच्याकडील वीजजोडणी कापली जात आहे. नागरिकांनी वीजबिल लवकर भरावे.

- एम.पी.धोटे, सहायक अभियंता महावितरण धरणगाव