शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांत तोडल्या साठ वीजजोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:22 IST

धरणगाव : कोरोनाच्या काळात नागरिकांचे आर्थिक संकट कोसळले आहे. महावितरणकडून थकबाकीपोटी वीजजोडणी तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली ...

धरणगाव : कोरोनाच्या काळात नागरिकांचे आर्थिक संकट कोसळले आहे. महावितरणकडून थकबाकीपोटी वीजजोडणी तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आठ दिवसांत ६० जोडण्या तोडण्यात आल्या आहेत.

वीजजोडणी तोडताना कुठल्याही हप्त्याची तरतूद केली जात नाही, त्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या कठीण काळात तरी ही मोहीम थांबवण्यात यावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे. महावितरणकडून आधीच वाढीव बिले दिली जात आहेत. तसेच रोज सात ते आठ वीजजोडण्या तोडण्यात येत आहेत. वीज वितरण विभागाकडून वाढीव बिलांच्या संदर्भात उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. यामुळे शहरात सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.

काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वीज वितरण विभागाला वीजबिल भरण्यासाठी टप्पे पाडून देण्याची सूचना केली होती. मात्र, अधिकारी ऐकण्यास तयार नाही, अशी स्थिती आहे.

कोट

लहान माळीवाडा परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांत रोज सात ते आठ ठिकाणच्या वीजजोडण्या तोडण्यात आल्या.

- भीमराज पाटील, सामान्य नागरिक धरणगाव

कोट

आठ दिवसांत सुमारे साठ वीजजोडणी कापण्यात आली आहे. ज्या ग्राहकांनी सहा महिने, एक वर्षापासून वीजबिल भरले नाही, त्यांच्याकडील वीजजोडणी कापली जात आहे. नागरिकांनी वीजबिल लवकर भरावे.

- एम.पी.धोटे, सहायक अभियंता महावितरण धरणगाव