शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सहावे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन जळगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 17:40 IST

24 रोजी उद्घाटन : महिलांना केंद्रबिंदू मानून संमेलनाचे विचारसूत्र

ठळक मुद्दे दिग्गज विचारवंत सहभागी होणार संमेलनाचे विचारसूत्र महिलाच

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 12 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षाच्या पाश्र्वभूमीवर सहावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन जळगाव येथे 24 सप्टेंबर रोजी  सकाळी 9 ते संध्याकाळी सहा या वेळेत कांताई सभागृहात होणार आहे.  यावेळी दिग्गज विचारवंत सहभागी होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष साजीद शेख यांनी मंगळवारी दुपारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी संमेलनाचे प्रमुख संयोजक मुकूंद सपकाळे, जिल्हा महिला असोसिएशनच्या अध्यक्षा राजकमल पाटील, वासंती दिघे,  वैशाली पाटील, अशफाक पिंजारी, फईम पटेल, डॉ. शरीफ शेख, सुधाकर पाटील, प्रा. दिंगबर कटय़ारे उपस्थित होते.प्रगतीशील लेखक संघ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समिती आणि पुरोगामी समविचारी संघटना यांच्या संयुक्तविद्यमाने भारतर} डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार  सर्वसामान्य नागरिकांपयर्ंत पोहचावे या हेतूने एकूण 10 संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आतार्पयत नागपूर, नाशिक, पुणे, भोर, नांदेड येथे हे संमेलन झाले. आता जळगावात महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समिती, जिल्हा महिला असोसिएशन आणि पुरोगामी समविचारी संघटनेच्यावतीने 24 रोजी सहावे संमेलन होणार आहे.  उद्घाटन प्रा. डॉ. अंजली मायादेव आंबेडकर यांच्याहस्ते होणार आहे.  त्यानंतर त्यांचे बीज भाषण होईल.यावेळी अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर प्रथम सत्रात ‘हिंदू कोड बिल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ याविषयावर प्रा. श्रुती तांबे तर दुस:या सत्रात ‘अल्पसंख्यांक स्त्रीया आणि संविधान’ या विषयावर विचारवंत डॉ. रजिया पटेल, तिस:या सत्रात ‘स्त्री शिक्षणाची वर्तमान परिस्थिती’ या विषयावर डॉ. भारती पाटील, ‘जागतिकीकरणाचे स्त्रीयांवरील परिणाम’ या विषयावर प्रा. विनया मालती हरि तर समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. पुष्पा भावे, कॉ. डॉ. भालचंद्र कांगो हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार असल्याचे  पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.  नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

संमेलनाचे विचारसूत्र महिलाच या संमेलनाचे वैशिष्ट म्हणजे, महिलांच्या मानवी जीवन जगण्याच्या हक्कासाठी उपयोगी ठरणारा दिशादर्शक दृष्टीकोन ठेवून, महिलांना केंद्रबिंदू मानून संमेलनाचे विचारसूत्र महिलाच आहे.