शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

घर पडून ६ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 8:57 PM

शेवगे बुद्रूक येथील घटना, एक गंभीर जखमी

पारोळा : तालुक्यातील शेवगे बद्रूक येथे जोरदार पावसाने मातीचे घर पडून सहाजण मातीखाली दबल्याने जखमी झाले. ही घटना येथे २१ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. मातीच्या ढिगा-याखाली दबलेल्या सहाजणांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले.शेवगे बुद्रूक येथे २० जुलै रोजी रात्री मुसळदार पाऊस झाला. त्यामुळे येथील कल्पना चंद्रकांत पाटील यांचे मातीचे घर अचानकपणे कोसळले. यात कल्पना चंद्रकांत पाटील (वय ४९), सागर अशोक पाटील (१६), कविता चंद्रकांत पाटील (२१), ललित बाळू पाटील (१७), वाल्मीक चंद्रकांत पाटील (२४), छबा पाटील (७०) असे सहाजण दाबले गेले होते. त्यांना ग्रमस्थांनी बाहेर काढले. यात कल्पना चंद्रकांत पाटील या गंभीर जखमी असून, त्यांना धुळे येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.जखमींना रुग्णवाहिकेतून नेऊन डॉ. सुनील पारोचे, प्रमोद सूर्यवंशी यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. डॉ.योगेश साळुंखे, परिचारिका सरला पवार, डॉ.अंजली पाटील, दीपक सोनार, राजू वानखेडे आदींनी उपचार केले. सरपंच आशा पाटील यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मुलगा राकेश याला रुग्णवाहिका बोलविण्यासाठी सांगितले. तहसीलदार अनिल गवांदे यांना फोन करून माहिती दिली. घटनास्थळी तहसीलदार अनिल गावंदे, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, हवालदार काशिनाथ पाटील, अनिल वाघ, मंडलाधिकारी पी.ए.पाटील, प्रदीप गांगुर्डे, शहर तलाठी निशिकांत पाटील, भैया निकम, बी.टी.पाटील आदींनी भेटी दिली.घर पडून घरातील सर्व संसारोपयोगी वस्तूंसह ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले. महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा केला.------चौकटी----ग्रामस्थांच्या तत्परतेने वाचले जीवघर कोसळण्याचा मोठा आवाज झाल्याने शेजारील महिला घरातून धावत बाहेर आली. तिने घर पडलेले पाहून आरडाओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ धावून आले. मिळेल त्या साहित्याने गावातील तरुणांनी मातीचा ढिगारा उपसत जखमींना बाहेर काढले. यावेळी मातीच्या ढिगा-याखाली कोण कुठे आहे हे समजणे कठीण होते. प्र्रथम वाल्मीक पाटील यास बाहेर काढण्यात आले. त्याने आणखी पाचजण ढिगा-याखाली असल्याचे सांगितले. तेव्हा ग्रामस्थांनी सर्वांना अलगदपणे मातीच्या बाहेर काढून सर्वांचे प्राण वाचविले. ग्रामस्थांनी वेळीच तत्परता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला.----मुलगा वाल्मीक हा आईला भेटण्यासाठी आला होतावाल्मीक पाटील हा सेलवास येथे कंपनीत नोकरीला आहे. त्याची विधवा आई विधवा असून त्या वडिलांच्या आत्यांसोबत घरात होत्या. आईच्या खात्यात जमा झालेले लाल्या रोगाचे अनुदान काढून देण्यासाठी व भेटीसाठी वाल्मीक आला होता. बहीण कविता हीदेखील सासरहून आईला भेटण्यासाठी आली होती. तसेच गावातील दोन नातेवाईक वाल्मीकला भेटण्यासाठी घरी आले होते. हे सर्वजण घरात असताना ही दुर्दैवी घटना घडली.