शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

घर पडून ६ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 20:57 IST

शेवगे बुद्रूक येथील घटना, एक गंभीर जखमी

पारोळा : तालुक्यातील शेवगे बद्रूक येथे जोरदार पावसाने मातीचे घर पडून सहाजण मातीखाली दबल्याने जखमी झाले. ही घटना येथे २१ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. मातीच्या ढिगा-याखाली दबलेल्या सहाजणांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले.शेवगे बुद्रूक येथे २० जुलै रोजी रात्री मुसळदार पाऊस झाला. त्यामुळे येथील कल्पना चंद्रकांत पाटील यांचे मातीचे घर अचानकपणे कोसळले. यात कल्पना चंद्रकांत पाटील (वय ४९), सागर अशोक पाटील (१६), कविता चंद्रकांत पाटील (२१), ललित बाळू पाटील (१७), वाल्मीक चंद्रकांत पाटील (२४), छबा पाटील (७०) असे सहाजण दाबले गेले होते. त्यांना ग्रमस्थांनी बाहेर काढले. यात कल्पना चंद्रकांत पाटील या गंभीर जखमी असून, त्यांना धुळे येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.जखमींना रुग्णवाहिकेतून नेऊन डॉ. सुनील पारोचे, प्रमोद सूर्यवंशी यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. डॉ.योगेश साळुंखे, परिचारिका सरला पवार, डॉ.अंजली पाटील, दीपक सोनार, राजू वानखेडे आदींनी उपचार केले. सरपंच आशा पाटील यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मुलगा राकेश याला रुग्णवाहिका बोलविण्यासाठी सांगितले. तहसीलदार अनिल गवांदे यांना फोन करून माहिती दिली. घटनास्थळी तहसीलदार अनिल गावंदे, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, हवालदार काशिनाथ पाटील, अनिल वाघ, मंडलाधिकारी पी.ए.पाटील, प्रदीप गांगुर्डे, शहर तलाठी निशिकांत पाटील, भैया निकम, बी.टी.पाटील आदींनी भेटी दिली.घर पडून घरातील सर्व संसारोपयोगी वस्तूंसह ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले. महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा केला.------चौकटी----ग्रामस्थांच्या तत्परतेने वाचले जीवघर कोसळण्याचा मोठा आवाज झाल्याने शेजारील महिला घरातून धावत बाहेर आली. तिने घर पडलेले पाहून आरडाओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ धावून आले. मिळेल त्या साहित्याने गावातील तरुणांनी मातीचा ढिगारा उपसत जखमींना बाहेर काढले. यावेळी मातीच्या ढिगा-याखाली कोण कुठे आहे हे समजणे कठीण होते. प्र्रथम वाल्मीक पाटील यास बाहेर काढण्यात आले. त्याने आणखी पाचजण ढिगा-याखाली असल्याचे सांगितले. तेव्हा ग्रामस्थांनी सर्वांना अलगदपणे मातीच्या बाहेर काढून सर्वांचे प्राण वाचविले. ग्रामस्थांनी वेळीच तत्परता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला.----मुलगा वाल्मीक हा आईला भेटण्यासाठी आला होतावाल्मीक पाटील हा सेलवास येथे कंपनीत नोकरीला आहे. त्याची विधवा आई विधवा असून त्या वडिलांच्या आत्यांसोबत घरात होत्या. आईच्या खात्यात जमा झालेले लाल्या रोगाचे अनुदान काढून देण्यासाठी व भेटीसाठी वाल्मीक आला होता. बहीण कविता हीदेखील सासरहून आईला भेटण्यासाठी आली होती. तसेच गावातील दोन नातेवाईक वाल्मीकला भेटण्यासाठी घरी आले होते. हे सर्वजण घरात असताना ही दुर्दैवी घटना घडली.