शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जामनेरातील वादग्रस्त संकुलाबाबत सहा तास झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जामनेर येथे जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेले व्यापारी संकूल हे शासन नियमानुसार नसल्याची तक्रारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जामनेर येथे जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेले व्यापारी संकूल हे शासन नियमानुसार नसल्याची तक्रारी ॲड.विजय पाटील यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समिती जिल्हा परिषेदत दाखल झाली असून या समितीने गुरूवारी दुपारी १ ते पावणे सात वाजेपर्यंत संकुलाच्या कागदपत्रांची छाननी केली. ही प्राथमिक स्तरावरील चौकशी असल्याचे नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त मनिष सांगळे यांनी सांगितले.

समितीत मनिष सांगळे यांच्यासह सहाय्यक आयुक्त राजन पाटील, लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी के.बी.रणदिवे, बांधकाम विभागाचे अधिकारी नंदू पवार आदींसह कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जि.पच्या तक्रार निवारण कक्षाच्या पाठीमागे असलेल्या कोविड समुपदेशन कक्षाच्या शेजारी असलेल्या सभागृहात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संकुलाबाबतच्या सर्व फाईली व कागदपत्रे आणली होती. यासह या संकुलाबाबत झालेले ठराव, सर्व फाईल्स यांची बारकाईने अधिकारी तपासणी करीत होते. दरम्यान, गुरूवारी वेळ कमी असल्याने शुक्रवारी पुन्हा उर्वरीत कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

जामनेरात अद्याप भेट नाही

हे संकुल म्हणजे कदाचित हा राज्यातील पहिलाच प्रकल्प होता. त्याची कागदपत्रे अधिक असून प्राथमिक स्तरावर कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याचे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जामनेरात सद्या भेट दिली नाही. कागदपत्र तपासणीलाच अधिक कालावधी लागणार आहे. पुढील आठवड्यात पुन्हा नियोजन करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण

जामनेरात जि.प.च्या जागेवर मराठी, उर्दू शाळा व पंचायत समिती कार्यालय इमारती बांधकाम करण्यासह उर्वरित जागेवर वाणिज्य प्रयोजनासाठी संकुल बांधकामासाठी शासनाने २०११ साली मान्यता दिली होती. भूमिपूजनाआधी प्रिमियमची रक्कम अदा करणे बंधनकारक केले होते. मात्र, ठेकेदार आर. के. शर्मा त्यांचे भागीदार श्रीकांत खटोड तसेच श्रीराम खटोड यांनी ती रक्कम भरली नाही. ६ कोटी ९८ लाख ३५ हजार ही रक्कम अद्यापही जि. प. ला अदा केलेली नसल्याची तक्रार ॲड. विजय पाटील यांनी ३० मार्च २०२१ रोजी केली होती. त्यानुसार या तक्रारीची चौकशी करण्यासाठी ६ एप्रिल रोजी समिती स्थापन केली होती. उर्दू शाळा ही बोदवड रस्त्यावर दोन ते तीन किलोमिटर अंतरावर बांधण्यात आली तसेच संकुलाचा तिसरा मजला बेकायदेशीर असल्याबाबत ॲड.पाटील यांनी तक्रारी केली हेाती. यानुसार ६ एप्रिल रोजी ग्रामविकास विभागाने तातडीने त्री सदस्यीय समिती नियुक्त करीत या संकुलाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार ही समिती जिल्हा परिषदेत दाखल झाली आहे.

राष्ट्रवादीचे निवेदन

या संकुलाच्या बदलाबाबत कुठलीही परवनागी न घेता विकासकाने बांधकाम केले असून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून दुकाने दिली आहेत. यात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष तथा जि. प. सदस्य रवींद्र पाटील यांनी केला आहे. त्यांनी याबाबत समितीचे अध्यक्ष मनिष सांगळे यांना निवेदन दिले आहे. यात पारदर्शकपणे चौकशीकरून संबधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष धवल पाटील, महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे उपस्थित होते.