शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मिल्लत नगर आणि शिव कॉलनी येथे भुयारी मार्ग बांधण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मिल्लत नगर आणि शिव कॉलनी येथे भुयारी मार्ग बांधण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दिशाभूल करत असल्याचा आरोप करत मिल्लत नगर परिसरातील नागरिकांनी महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले.

शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ६१ कोटी रुपयांत देण्यात आले होते. त्याला चेंज ऑफ स्कोपनुसार ६ कोटींच्या अतिरिक्त कामाची तरतूद देण्यात आली होती. मूळ कामाच्या निविदेत शिव कॉलनी, मिल्लत नगर, अग्रवाल चौक या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुलाच्या कामाचा समावेश करण्यात आला नव्हता. ही कामे या सहा कोटींच्या रकमेत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र प्रादेशिक कार्यालयाकडे या कामांसाठी १३ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मिल्लत नगर, सालार नगर या भागात शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे तेथे अनेक विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडावा लागतो. त्यामुळे येथे भुयारी मार्ग करण्याची गरज असल्याची आग्रही मागणी आंदोलकांनी केली.

यावेळी समांतर रस्ते कृती समितीचे फारुक शेख, निवेदिता ताठे, प्रतिभा शिरसाठ, बाबा देशमुख ,जळगाव जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे अध्यक्ष मझर पठाण, शिवसेनेचे महानगराध्यक्ष जाकिर पठाण, एमआयएमचे माजी समन्वयक बशीर बुऱ्हानी, जळगाव शहर काँग्रेसचे नदीम काझी, नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, फारुक शेख, इम्रान शेख, अब्दुल नदीम अहमद, नबील साबीर शेख, झाहिद शाह उपस्थित होते.

सेकंड फेजचे आमिष

या वेळी आंदोलक आणि प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांच्यात झालेल्या चर्चेत सिन्हा यांनी भुयारी मार्ग आणि खोटे नगर ते पाळधी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सेंकड फेजमध्ये करण्याचे सांगितले असल्याचे फारुक शेख यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे; मात्र त्यासाठी अजून प्राथमिक तयारीदेखील नाही. त्यामुळे तोपर्यंत आणखी किती जणांचे बळी घेणार, असा प्रश्न देखील शेख यांनी उपस्थित केला आहे.

फोटो कॅप्शन - प्रकल्प संचालक सिन्हा यांना निवेदन देताना प्रतिभा शिरसाठ, निवेदिता ताठे, फारुक शेख सोबत जमील देशपांडे आणि इतर. (१३ सीटीआर ३३)