शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

बहिणाबाईच्या काव्यातील स्त्री भावविश्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:45 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘चाळता स्मृतीची पाने’ या सदरात प्रा.ए.बी. पाटील यांचा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यावरील विशेष लेख.

बहिणाबाईच्या काव्यामध्ये स्त्रीचे भावविश्व अतिशय तरलपणे चित्रित झालेले आहे. बहिणाबार्इंचा कालखंड म्हणजे स्त्री जीवनाचा खडतर काळ. बंदिस्त जीवन. फारसं स्वातंत्र्य नाही. कोवळ्या वयात होणारी लग्नं, बऱ्याच घरांमध्ये होणारा सासुरवास, अशा संसारात स्त्रिचीच अधिक परवड होते. एक स्त्री म्हणून बहिणाबाई हे सर्व जाणून होती. आपल्या ‘संस्कार’ नामक कवितेमध्ये बहिणाबाईने आदर्श संस्काराचे चित्र रेखाटलेले आहे.देखा संसार संसार,दोन्ही जीवाचा इचार,देतो दु:खाले होकार,अन् सुखाले नकार’’संसार म्हणजे केवळ एकाचा, अर्थात केवळ पुरुषाचाच विचार नव्हे तर पती-पत्नी दोघांचा विचार महत्त्वाचा असून, दोघांच्या संयुक्तीक प्रयत्नांनी, विचारांनी संसाराचा गाडा सुरळीत चालू शकतो. संसारात एकमेकांची दु:ख वाटून हलकी करणे म्हणजे पती-पत्नीने एकमेकाला आधार देणे होय. खीरा, भिलावा, सागरगोट्या यासारख्या नित्य परिचयाच्या गोष्टीतून ती संसाराचे मर्म स्पष्ट करते. वरवर बघता संसार क्लेशकारक वाटत असला तरी तो आतून गोडंबीसारखा गोड, मधूर असतो.या सर्व परिस्थितीत स्त्रिला तिच्या माहेराची ओढ अधिक तीव्रतेने होत असते. माहेराची उत्कट माया तिच्या हृदयाशी जोडलेली असते. त्यामुळे माहेराचा निरोप वारा तिच्या कानात सांगतो. माहेराच्या या भावनिक मायेचे असे संबंध असल्यामुळे रखरखीत उन्हात तापलेला रस्तासुद्धा तिला मखमली वाटेसारखा वाटतो. माहेराच्या वाटेवरच्या दगडाची ठेच लागली तर तो दगड तिला धडपड न करता नीट जाण्याचा सल्ला मोठ्या आपुलकीनं देतो. रस्त्याने जात असताना उचकी लागली म्हणजे माहेरच्या माणसांनी आठवण केली हा विश्वास असतो. एवढेच नाही तर माहेरी जात असताना रस्त्यात भेटलेली साळुंखी तिच्यापुढे जाऊन बहिणाबाईच्या आईला ती येत असल्याची बातमी देते. माहेर म्हटलं म्हणजे तिथल्या सर्व आठवणी दाटून येतात. माहेरुन घर, माहेरची माणसं, रस्त्यात लागणारी नदी, पानांचे तांडे, रेल्वे फाटक, बाभळीचं वन अशा असंख्य आठवणी मनात फेर धरतात.तत्कालीन समाजजीवनामध्ये सासुरवाशिणीला करावे लागणारे निरंतर कष्ट हे नित्याचेच होते. शेतकरी कुटुंबात तर कष्टांना पर्यायच नव्हता. बहिणाबाई सासुरवाशिणीला वाद न घालता सर्व सहन करण्याचा सल्ला देते व अशावेळी माहेरची आठवण मनात जागवायला सांगते. माहेरची आठवण म्हणजे कष्टांवर, दु:खावर हळूवार फुंकर घालण्यासारखे आहे. माहेरच्या प्रेमाची आठवण दु:ख सहन करण्याची ताकद देते. त्यामुळे वाद न वाढता घरातच मिटतो व घराची इभ्रतही कायम राहते. ‘योगी आणि सासुरवाशिण’ रचनेत योगी व सासुरवाशिणीच्या संवादाद्वारे तत्कालीन स्त्री जीवनाचे चित्रण बहिणाबाईने प्रभावीपणे केले आहे. ‘माहेराचं गाणं सारखं काय गाते, मग सासरी कशासाठी आली?’ योग्याच्या या प्रश्नावर बहिणाबाई उत्तर देते,‘‘अरे लागले डोहाये,सांगे शेतातली माटीगाते माहेराचं गान लेक येईन रे पोटीदेरे देरे योग्य ध्यान, ऐक काय मी सांगतेलेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’’अशा समर्पक शब्दात ती योग्याला निरुत्तर करते. अतिशय संवेदनशीलतेने बहिणाबाईने तत्कालीन स्त्री जीवनाचे तरल व प्रभावी चित्रण केलेले आहे.- प्रा.ए.बी. पाटील