शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

बहिणाबार्इंच्या कवितेतील आखजी (आखाजी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:50 IST

भुसावळ येथील मराठी साहित्याच्या अभ्यासक आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या विविध भूमिका, वेशभूषा साकारलेल्या प्रा.कमल पाटील यांनी बहिणाबार्इंच्या कवितेतील आखाजी वर्णन केली आहे. वाचा ती त्यांच्याच शब्दात...

आखजीचा आखजीचा मोलाचा सन देखाजी निंबावरी निंबावरी बांधलाय छान झोका जी ।असं म्हणून आमच्या बहिणाई या मोलाच्या सणाचे मौलिकत्व अतिशय मार्मिक, चपखल आणि गोड शब्दात गुंफत जातात. खरंच आमचे सण, उत्सव मानवी जीवन सर्वार्थाने सुखी करणारे आहेत. फक्त आम्ही त्यामागची वैचारिक, तात्त्विक बैठक समजून घेणे आवश्यक आहे. संसार तापाने तापलेल्या, त्रासलेल्या जीवाला सुखाची, आनंदाची, चैतन्याची नवसंजीवनी देणारे हे सण आहेत. बरेच सण स्त्रियांना आगळ्या वेगळ्या सुखाची अनुभूती देणारे आहेत. आमचा आखजीचा सण सासुरवाशीणीला कशी सुखाची अनुभूती देतो याचे सुंदर वर्णन आमच्या बहिणाबाई चौधरींनी त्यांच्या ‘आखजी’ कवितेत केले आहे. बहिणाबार्इंनी गुढीपाडवा, आखजी, पोळा या खान्देशातील कृषी संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या सणांचे सुंदर चित्रण केले आहे.खान्देशात साजरा होणारा ‘आखजी’ हा सण, या सणाचे त्या काळातील स्वरूप, महत्त्व कवयित्री बहिणाबाई चौधरी अतिशय रसाळ शब्दात सांगतात. बहिणाबार्इंच्या काळात १०, १२ वर्षाच्या मुलींचे विवाह होऊन त्या एकत्र कुटुंबात नांदायला जात. या एकत्र कुटुंबात काम आणि सासुरवास हेच या मुलींच्या वाट्याला यायचे. या त्रासात त्यांना माहेरची आस लागायची. या मुलींना सुखाचे, आनंदाचे क्षण अनुभवायला मिळायचे ते सणाला माहेरपणासाठी गेल्यावर. त्यातही आखजीचा आनंद काय सांगावा -माझा झोका माझा झोकाचालला भिरीभिरी जी ।माझा झोका माझा झोकाखेयतो वाऱ्यावरी जी ।असा झोका, गाणे यांचा अपूर्व आनंद त्या लुटतात. या झोक्याच्या वर्णनाच्या ओघात सासुरवाशीणीच्या मनाची आंदोलनेही आमच्या बहिणाई अगदी हळूवारपणे टिपतात.गेला झोका गेला झोकाचालला माहेराले जी ।आला झोेका आला झोकापलट सासरले जी ।असे स्त्री मनाचे हेलकावे त्या सहज टिपतात. ‘आखजीला’ झोक्याच्या आनंदाबरोबर अनेक गोष्टींचा आनंद त्या घेतात. त्यात गवराईचे खेळही महत्त्वाचे आहेत.आमच्या खान्देशात आखजीची चाहुल चैत्राच्या सुरुवातीपासूनच लागते. लहान मुली चैत्र महिन्यात गवराई बसवतात. त्या सुंदर सजवतात म्हणूनच - गवराई गवराईसजव सजवल्या जीअशा सुंदर सजवलेल्या गवराईजवळ गाणे खेळ यासाठी ‘संगावीनी’ बोलवतात. गाण्यांबरोबर पिंगा, फुगडी, टिपºया अशा कितीतरी खेळांचा ‘धांगडधिंगा’ चालतो, एक वेगळा आनंदोत्सव या गवराईचे ‘आखजीला थाटात विसर्जन होते.किती खेय, किती खेय,सांगू मी काय काय जीखेयीसनी खेयीसनीआंबले हातपायजीअशा खेळून थकलेल्या या मुली दोन दिवस विसावा घेतात आणि ‘सन सरे आस उरे’ असे म्हणून आता परत आखजी केव्हा येणार, असे ‘सईला’ विचारुन संसाराला लागतात, असे सुंदर वर्णन आखजीचे माझ्या बहिणाई करतात. लेवागण बोलीमुळे काव्य अधिकच रसाळ होते. याशिवाय या सणाला अनेक पैलू आहेत. पौराणिक महत्त्व या सणाचे आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा सण खरंच मोलाचा नाही का?-प्रा.कमल पाटील, भुसावळ

टॅग्स :literatureसाहित्यBhusawalभुसावळ