शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

बहिणाबार्इंच्या कवितेतील आखजी (आखाजी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:50 IST

भुसावळ येथील मराठी साहित्याच्या अभ्यासक आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या विविध भूमिका, वेशभूषा साकारलेल्या प्रा.कमल पाटील यांनी बहिणाबार्इंच्या कवितेतील आखाजी वर्णन केली आहे. वाचा ती त्यांच्याच शब्दात...

आखजीचा आखजीचा मोलाचा सन देखाजी निंबावरी निंबावरी बांधलाय छान झोका जी ।असं म्हणून आमच्या बहिणाई या मोलाच्या सणाचे मौलिकत्व अतिशय मार्मिक, चपखल आणि गोड शब्दात गुंफत जातात. खरंच आमचे सण, उत्सव मानवी जीवन सर्वार्थाने सुखी करणारे आहेत. फक्त आम्ही त्यामागची वैचारिक, तात्त्विक बैठक समजून घेणे आवश्यक आहे. संसार तापाने तापलेल्या, त्रासलेल्या जीवाला सुखाची, आनंदाची, चैतन्याची नवसंजीवनी देणारे हे सण आहेत. बरेच सण स्त्रियांना आगळ्या वेगळ्या सुखाची अनुभूती देणारे आहेत. आमचा आखजीचा सण सासुरवाशीणीला कशी सुखाची अनुभूती देतो याचे सुंदर वर्णन आमच्या बहिणाबाई चौधरींनी त्यांच्या ‘आखजी’ कवितेत केले आहे. बहिणाबार्इंनी गुढीपाडवा, आखजी, पोळा या खान्देशातील कृषी संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या सणांचे सुंदर चित्रण केले आहे.खान्देशात साजरा होणारा ‘आखजी’ हा सण, या सणाचे त्या काळातील स्वरूप, महत्त्व कवयित्री बहिणाबाई चौधरी अतिशय रसाळ शब्दात सांगतात. बहिणाबार्इंच्या काळात १०, १२ वर्षाच्या मुलींचे विवाह होऊन त्या एकत्र कुटुंबात नांदायला जात. या एकत्र कुटुंबात काम आणि सासुरवास हेच या मुलींच्या वाट्याला यायचे. या त्रासात त्यांना माहेरची आस लागायची. या मुलींना सुखाचे, आनंदाचे क्षण अनुभवायला मिळायचे ते सणाला माहेरपणासाठी गेल्यावर. त्यातही आखजीचा आनंद काय सांगावा -माझा झोका माझा झोकाचालला भिरीभिरी जी ।माझा झोका माझा झोकाखेयतो वाऱ्यावरी जी ।असा झोका, गाणे यांचा अपूर्व आनंद त्या लुटतात. या झोक्याच्या वर्णनाच्या ओघात सासुरवाशीणीच्या मनाची आंदोलनेही आमच्या बहिणाई अगदी हळूवारपणे टिपतात.गेला झोका गेला झोकाचालला माहेराले जी ।आला झोेका आला झोकापलट सासरले जी ।असे स्त्री मनाचे हेलकावे त्या सहज टिपतात. ‘आखजीला’ झोक्याच्या आनंदाबरोबर अनेक गोष्टींचा आनंद त्या घेतात. त्यात गवराईचे खेळही महत्त्वाचे आहेत.आमच्या खान्देशात आखजीची चाहुल चैत्राच्या सुरुवातीपासूनच लागते. लहान मुली चैत्र महिन्यात गवराई बसवतात. त्या सुंदर सजवतात म्हणूनच - गवराई गवराईसजव सजवल्या जीअशा सुंदर सजवलेल्या गवराईजवळ गाणे खेळ यासाठी ‘संगावीनी’ बोलवतात. गाण्यांबरोबर पिंगा, फुगडी, टिपºया अशा कितीतरी खेळांचा ‘धांगडधिंगा’ चालतो, एक वेगळा आनंदोत्सव या गवराईचे ‘आखजीला थाटात विसर्जन होते.किती खेय, किती खेय,सांगू मी काय काय जीखेयीसनी खेयीसनीआंबले हातपायजीअशा खेळून थकलेल्या या मुली दोन दिवस विसावा घेतात आणि ‘सन सरे आस उरे’ असे म्हणून आता परत आखजी केव्हा येणार, असे ‘सईला’ विचारुन संसाराला लागतात, असे सुंदर वर्णन आखजीचे माझ्या बहिणाई करतात. लेवागण बोलीमुळे काव्य अधिकच रसाळ होते. याशिवाय या सणाला अनेक पैलू आहेत. पौराणिक महत्त्व या सणाचे आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा सण खरंच मोलाचा नाही का?-प्रा.कमल पाटील, भुसावळ

टॅग्स :literatureसाहित्यBhusawalभुसावळ