शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

साहेब, रुग्णालयात, अंत्यसंस्काराला जातोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठीच एसटी बसेस सुरू आहेत. असे असतानाही काही प्रवासी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठीच एसटी बसेस सुरू आहेत. असे असतानाही काही प्रवासी रुग्णालयात जायचे आहे, अंत्यसंस्काराला जायचे आहे, अशा प्रकारची तीच ती कारणे देऊन घराबाहेर पडून, प्रवास करत असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले.

राज्य शासनाने कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी महामंडळाची बससेवा बंद ठेवली असून, फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांसाठीच बससेवा सुरू ठेवली आहे, तर ज्या नागरिकांना बसने प्रवास करायचा आहे, त्यांना जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक सेवेचा पास काढण्याचे बंधनकारक केले आहे. मात्र, असे असतानाही अनेक नागरिक या-ना त्या प्रकारची कारणे सांगून बसने प्रवास करतच आहेत. यामध्ये विशेषतः एखाद्या ग्रामीण मार्गावरून शहरात बस येताना हे प्रवासी वाहकाने प्रवासाचे कारण विचारल्यावर, साहेब तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात जायचे आहे, कधी जवळच्या नातलगाला रुग्णालयात भेटायला जायचे आहे, तर कधी अंत्यसंस्काराला जायचे आहे, अशी कारणे देऊन बसमधून प्रवास करतात. ही कारणे सांगितल्यामुळे बस वाहकही जास्त चौकशी न करता प्रवेश देतो. दरम्यान, काही वाहक प्रवाशांकडून प्रवासासाठी जिल्हा प्रशासनाचा पास मागत असल्याने, या कारणावरून प्रवाशी व वाहकांमध्ये किरकोळ वादही घडत असल्याचे प्रकार घडत आहेत.

इन्फो :

- जिल्ह्यातील एकूण आगार - ११

- सध्या चालविल्या जाणाऱ्या बसेस - १० ते १२

- दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या १०० ते १५०

इन्फो :

प्रवाशांकडून तीच ती कारणे :

शासनातर्फे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीला दहा ते बारा दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, संचारबंदीच्या सुरुवातीपासूनच नागरिकांतर्फे विविध कारणांनी नागरिक प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. यात सुरुवातीपासूनच रुग्णालयात आणि अंत्यसंस्काराला जाण्याची ही दोन महत्त्वाची कारणे सांगत आहेत. तर बोटावर मोजण्याइतक्याच नागरिकांकडून या कारणासाठी रितसर शासनाच्या परवानगीचा पास असतो, तर बहुतांश नागरिकांकडे कुठलाही पास नसल्याने, विविध प्रकारची कारणे सांगून प्रवास करत असल्याचे दिसून आले.

पाचोरा, चाळीसगाव मार्गावर गर्दी

सध्या महामंडळातर्फे अत्यावश्यक सेवेसाठीच बससेवा सुरू आहे. यामध्ये पाचोरा, चाळीसगाव मार्गावरच प्रवाशांची जास्त गर्दी आहे. कारण, या भागातील बहुतांश नागरिक जळगावात विविध शासकीय आस्थापने व आरोग्यसेवेत नोकरीला आहेत. सकाळी ३० ते ४० प्रवासी व सायंकाळी पुन्हा तितकेच प्रवासी बसने प्रवास करत आहेत. रेल्वेला आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नसल्याने हा नोकरदार वर्ग बसने प्रवास करत आहे.

इन्फो :

एसटी कर्मचाऱ्यांसोबत वाद-

सध्या संचारबंदीत अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे. तसेच या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहूनच बसमध्ये प्रवेश दिला जात आहे. मात्र, ज्यांच्याकडे प्रवासासाठी आवश्यक सेवेचा कुठलाही पास नसल्यामुळे त्या प्रवाशाला प्रवासास परवानगी मिळत नसल्याने वाहक व त्या प्रवाशात वाद होत आहेत.

इन्फो :

सध्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच सेवा असून, प्रत्येकाचे ओळखपत्र पाहूनच बसमध्ये प्रवेश दिला जातो. तसे नसेल तर प्रवेश दिला जात नाही. मात्र, प्रवाशांनी रुग्णालयाचे किंवा अंत्यसंस्काराचे कारण सांगितल्यावर प्रवेश दिला जातो. मात्र, त्यावेळेसही आमचे वाहक खात्री करूनच बसमध्ये प्रवेश देतात.

प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार