शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दहशतवादाच्या निषेधार्थ मूक रॅली

By admin | Updated: May 21, 2017 13:35 IST

जळगावकरांनी केला दहशतवाद संपविण्याचा निर्धार. भव्य रॅलीने घडविले एकता व देशभक्तीचे दर्शन

 जळगाव,दि.21- दहशतवाद ही एक कीड असून ती मुळासकट नष्ट करण्याची गरज आहे.  त्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे असल्याचा संदेश देत हजारो जळगावकर नागरिक रविवारी सकाळी शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरले. कोणतीही घोषणाबाजी न करता दहशतवादाचे भूत संपविण्याचा निर्धार ‘दहशतवादी विरोधी दिना’निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीतून व्यक्त करण्यात आला. 

स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ तसेच युवाशक्ती फाउंडेशन यांच्यावतीने  रविवारी काढलेल्या सर्वधर्मीय दहशतवादविरोधी रॅलीत जळगावकर नागरिक व विविध संघटना स्वयंस्फूर्तीने मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या. 
शनिपेठेतून सुरू झालेली रॅली शास्त्री टॉवर चौक, नेहरू चौक मार्गे खान्देश सेंट्रल परिसरात पोहचली. त्याठिकाणी कन्यारत्न सर्कल नजीक रॅलीचे सभेत रुपांतर झाले. या ठिकाणी दहशतवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी  श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक कैलास सोनवणे, युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललीत कोल्हे, स्थायी समिती सभापती वर्षा खडके, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दीपक घाणेकर, अनिल सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी उपमहापौर करीम सालार, डॉ. संजय शेखावत, जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके, सिद्धांत बाफना, मनोहर पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.