शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

तापीच्या पाण्यावरून संघर्षाची चिन्हे

By admin | Updated: August 25, 2015 22:25 IST

उपसा योजनांचे पुनरुज्जीवन करण्यात उदासीन असलेल्या पाटबंधारे विभागाने तापीवरील प्रकल्पातील पाणी अडविण्याबाबतही आडमुठे धोरण स्वीकारल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

रमाकांत पाटील नंदुरबारउपसा योजनांचे पुनरुज्जीवन करण्यात उदासीन असलेल्या पाटबंधारे विभागाने तापीवरील प्रकल्पातील पाणी अडविण्याबाबतही आडमुठे धोरण स्वीकारल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सध्या दुष्काळाचे सावट असताना प्रकल्पात पाणी अडविले जात नसल्याने शेतकरी संतप्त झाले असून, प्रशासन व शेतक:यात संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. तापी नदीवर जिल्ह्यात सारंगखेडा आणि प्रकाशा येथे प्रकल्प बांधण्यात आले आहेत. यापूर्वी याठिकाणी उपसा योजना राबविण्यात आल्या होत्या. परंतु या योजना पूर्ण होताच तापी नदी हंगामी वाहू लागल्याने उपसा योजनेचा फायदा शेतक:यांना झाला नाही. उलट माथी कर्ज झाले. या पाश्र्वभूमीवर प्रकल्पांना मंजुरी मिळून रडतखडत या प्रकल्पांची कामे चार वर्षापासून पूर्णत्वास आली आहेत. प्रकल्प पूर्ण झाल;े पण उपसा योजना बंद पडल्या. त्यामुळे जवळपास 400 कोटींपेक्षा अधिक खर्च होऊनही सारंगखेडा आणि प्रकाशा या दोन्ही प्रकल्पांचा उद्देश तूर्त तरी साध्य झालेला नाही. अशा स्थितीत या प्रकल्पांमध्ये अडविलेले पाणी शेतकरी आपापल्या खर्चाने आपल्या शेतार्पयत नेऊन उत्पन्न वाढविण्याची धडपड करीत आहेत. यंदा महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतात जेमतेम जगलेली पिके करपू  लागली आहेत. अशा स्थितीत शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी प्रय} करीत आहे. परंतु तापी काठावरील चित्र मात्र भयानक आहे. वास्तविक पाऊस नसल्याने व दुष्काळाची चर्चा सुरू झाल्याने  प्रकल्पातील पाणी अडविण्यासाठी प्रय} होणे अपेक्षित होते. परंतु पाटबंधारे विभागाच्या निष्क्रियतेमुळे तापीतील पाणी गुजरातमध्ये वाहून जात आहे. सद्य:स्थितीत सारंगखेडा ते प्रकाशादरम्यान तापी नदीचे पात्र कोरडे होऊ लागले आहे. प्रकाशा प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी प्रय} न झाल्याने पाणी गुजरातमध्ये वाहून गेले. परिणामी पात्र कोरडे झाल्याने यादरम्यान असलेल्या शेतक:यांना पिकांना पाणी देणेही अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकरी पाणी अडविण्यासाठी प्रकाशा प्रकल्पाधिका:यांकडे तगादा लावत आहेत. दुसरीकडे या प्रकल्पातील पाणी अडविण्यासाठी जरी प्रय} झाला तरी आता वरून पाणी सोडण्यासाठीही प्रयत्न करावा लागणार आहे. सारंगखेडा, सुलवाडे आणि हतनूर धरणातून पाणी सोडल्यास प्रकाशा बॅरेजमध्ये पाणीसाठा होऊ शकतो. पण सध्या तरी पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे प्रकाशा बॅरेज ठणठणाट आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये पाटबंधारे विभागाच्या अधिका:यांविरुद्ध असंतोष व्यक्त होत असून, त्याबाबत गावोगावी बैठकाही होत आहेत. यासंदर्भात काही शेतक:यांनी जिल्हाधिका:यांकडे धाव घेतली असून, संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.