शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

जळगाव, जामनेरवर पाणीटंचाईच्या संकटाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:15 IST

जलसंपदामंत्र्यांनी केले पाणी जपून वापराचे आवाहन

ठळक मुद्दे पाणी जपून न वापरल्यास एप्रिलपासूनच पाणी टंचाईची भितीजळगाव, जामनेरला मागणीएवढेच आरक्षण एरंडोलची समस्या गंभीर

जळगाव: जळगाव शहर व जामनेरचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या वाघूर धरणात यंदा कमी पाणीसाठा आहे. केवळ निम्म्यावर हा पाणीसाठा असल्याने पाणी जपून वापरा. थोडी कळ सोसून सहकार्य करा, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मेहरूण तलावावर आयोजित रावण दहन कार्यक्रमाप्रसंगी केल्याने जळगाव, जामनेरवर पाणीटंचाईचे संकट गडद झाले असल्याचे संकेत मिळाले आहेत.महाजन म्हणाले की, वाघूर धरणात निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. जळगाव शहराची, जामनेरची पाणीयोजना या धरणावरच आहे. ते पाणी संपले तर कुठलीच पर्यायी सोय नाही. त्यामुळे जामनेर, जळगावकरांनी थोडी कळ सोसून पाणी जपून वापरावे. काटकसर करून सहकार्य करावे. तरच एप्रिल, मे महिन्यात व्यवस्थित पाणीपुरवठा होऊ शकेल.जळगाव, जामनेरला मागणीएवढेच आरक्षणवाघूर धरणात जेमतेम ४४ टक्के पाणीसाठा आहे. ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. जळगाव शहरासाठी १४१५ एमसीएफटी तर जामनेरसाठी ९२ एमसीएफटी पाणी आरक्षणाची मागणी मागील वर्षी होती. त्यानुसार आरक्षण देण्यात आले होते. यंदाही तेवढीच मागणी असून त्यानुसार आरक्षण पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतच मंजूर करण्यात आले होते. मात्र भोकरबारीच्या विषयावर घोळ चालल्याने पाणी आरक्षणाचा आरखडा अंतीम झालेला नव्हता. आता आठ दिवसांत त्याबाबत बैठक होऊन अंतीम मंजुरी होणार आहे.एरंडोलची समस्या गंभीरपारोळ्यासाठी मागील वर्षी १०० एमसीएफटी पाणी आरक्षणाची मागणी केली होती. मात्र ७५ एमसीएफटी एवढेच आरक्षण दिले होते. यंदा ७५ एमसीएफटी आरक्षणाची मागणी करण्यात आली असून तेवढेच मंजूरीची शिफारस प्रशासनाने केली आहे. मात्र एरंडोलसाठी अंजनी धरणातून मागील वर्षी ६० एमसीएफटीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ३० एमसीएफटी देण्यात आले होते. यंदाही ३० एमसीएफटीच पाणी दिले जाणार आहे. तर १५ एमसीएफटी कासोद्याला दिले जाणार आहे. यंदा अंजनी धरणात केवळ ८२ एमसीएफटी मृत पाणीसाठा आहे. त्यातून हे ३० व १५ एमसीएफटी पाणी देणे शक्य असले तरीही फेब्रुवारीपर्यंतच ते देणे शक्य होईल. कारण बाष्पीभवनामुळे पाण्याच्या साठ्यात नंतर वेगाने घट होणार आहे. त्यामुळे एरंडोलची समस्या गंभीर आहे.