शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जळगाव, जामनेरवर पाणीटंचाईच्या संकटाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:15 IST

जलसंपदामंत्र्यांनी केले पाणी जपून वापराचे आवाहन

ठळक मुद्दे पाणी जपून न वापरल्यास एप्रिलपासूनच पाणी टंचाईची भितीजळगाव, जामनेरला मागणीएवढेच आरक्षण एरंडोलची समस्या गंभीर

जळगाव: जळगाव शहर व जामनेरचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या वाघूर धरणात यंदा कमी पाणीसाठा आहे. केवळ निम्म्यावर हा पाणीसाठा असल्याने पाणी जपून वापरा. थोडी कळ सोसून सहकार्य करा, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मेहरूण तलावावर आयोजित रावण दहन कार्यक्रमाप्रसंगी केल्याने जळगाव, जामनेरवर पाणीटंचाईचे संकट गडद झाले असल्याचे संकेत मिळाले आहेत.महाजन म्हणाले की, वाघूर धरणात निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. जळगाव शहराची, जामनेरची पाणीयोजना या धरणावरच आहे. ते पाणी संपले तर कुठलीच पर्यायी सोय नाही. त्यामुळे जामनेर, जळगावकरांनी थोडी कळ सोसून पाणी जपून वापरावे. काटकसर करून सहकार्य करावे. तरच एप्रिल, मे महिन्यात व्यवस्थित पाणीपुरवठा होऊ शकेल.जळगाव, जामनेरला मागणीएवढेच आरक्षणवाघूर धरणात जेमतेम ४४ टक्के पाणीसाठा आहे. ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. जळगाव शहरासाठी १४१५ एमसीएफटी तर जामनेरसाठी ९२ एमसीएफटी पाणी आरक्षणाची मागणी मागील वर्षी होती. त्यानुसार आरक्षण देण्यात आले होते. यंदाही तेवढीच मागणी असून त्यानुसार आरक्षण पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतच मंजूर करण्यात आले होते. मात्र भोकरबारीच्या विषयावर घोळ चालल्याने पाणी आरक्षणाचा आरखडा अंतीम झालेला नव्हता. आता आठ दिवसांत त्याबाबत बैठक होऊन अंतीम मंजुरी होणार आहे.एरंडोलची समस्या गंभीरपारोळ्यासाठी मागील वर्षी १०० एमसीएफटी पाणी आरक्षणाची मागणी केली होती. मात्र ७५ एमसीएफटी एवढेच आरक्षण दिले होते. यंदा ७५ एमसीएफटी आरक्षणाची मागणी करण्यात आली असून तेवढेच मंजूरीची शिफारस प्रशासनाने केली आहे. मात्र एरंडोलसाठी अंजनी धरणातून मागील वर्षी ६० एमसीएफटीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ३० एमसीएफटी देण्यात आले होते. यंदाही ३० एमसीएफटीच पाणी दिले जाणार आहे. तर १५ एमसीएफटी कासोद्याला दिले जाणार आहे. यंदा अंजनी धरणात केवळ ८२ एमसीएफटी मृत पाणीसाठा आहे. त्यातून हे ३० व १५ एमसीएफटी पाणी देणे शक्य असले तरीही फेब्रुवारीपर्यंतच ते देणे शक्य होईल. कारण बाष्पीभवनामुळे पाण्याच्या साठ्यात नंतर वेगाने घट होणार आहे. त्यामुळे एरंडोलची समस्या गंभीर आहे.