शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव, जामनेरवर पाणीटंचाईच्या संकटाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:15 IST

जलसंपदामंत्र्यांनी केले पाणी जपून वापराचे आवाहन

ठळक मुद्दे पाणी जपून न वापरल्यास एप्रिलपासूनच पाणी टंचाईची भितीजळगाव, जामनेरला मागणीएवढेच आरक्षण एरंडोलची समस्या गंभीर

जळगाव: जळगाव शहर व जामनेरचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या वाघूर धरणात यंदा कमी पाणीसाठा आहे. केवळ निम्म्यावर हा पाणीसाठा असल्याने पाणी जपून वापरा. थोडी कळ सोसून सहकार्य करा, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मेहरूण तलावावर आयोजित रावण दहन कार्यक्रमाप्रसंगी केल्याने जळगाव, जामनेरवर पाणीटंचाईचे संकट गडद झाले असल्याचे संकेत मिळाले आहेत.महाजन म्हणाले की, वाघूर धरणात निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. जळगाव शहराची, जामनेरची पाणीयोजना या धरणावरच आहे. ते पाणी संपले तर कुठलीच पर्यायी सोय नाही. त्यामुळे जामनेर, जळगावकरांनी थोडी कळ सोसून पाणी जपून वापरावे. काटकसर करून सहकार्य करावे. तरच एप्रिल, मे महिन्यात व्यवस्थित पाणीपुरवठा होऊ शकेल.जळगाव, जामनेरला मागणीएवढेच आरक्षणवाघूर धरणात जेमतेम ४४ टक्के पाणीसाठा आहे. ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. जळगाव शहरासाठी १४१५ एमसीएफटी तर जामनेरसाठी ९२ एमसीएफटी पाणी आरक्षणाची मागणी मागील वर्षी होती. त्यानुसार आरक्षण देण्यात आले होते. यंदाही तेवढीच मागणी असून त्यानुसार आरक्षण पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतच मंजूर करण्यात आले होते. मात्र भोकरबारीच्या विषयावर घोळ चालल्याने पाणी आरक्षणाचा आरखडा अंतीम झालेला नव्हता. आता आठ दिवसांत त्याबाबत बैठक होऊन अंतीम मंजुरी होणार आहे.एरंडोलची समस्या गंभीरपारोळ्यासाठी मागील वर्षी १०० एमसीएफटी पाणी आरक्षणाची मागणी केली होती. मात्र ७५ एमसीएफटी एवढेच आरक्षण दिले होते. यंदा ७५ एमसीएफटी आरक्षणाची मागणी करण्यात आली असून तेवढेच मंजूरीची शिफारस प्रशासनाने केली आहे. मात्र एरंडोलसाठी अंजनी धरणातून मागील वर्षी ६० एमसीएफटीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ३० एमसीएफटी देण्यात आले होते. यंदाही ३० एमसीएफटीच पाणी दिले जाणार आहे. तर १५ एमसीएफटी कासोद्याला दिले जाणार आहे. यंदा अंजनी धरणात केवळ ८२ एमसीएफटी मृत पाणीसाठा आहे. त्यातून हे ३० व १५ एमसीएफटी पाणी देणे शक्य असले तरीही फेब्रुवारीपर्यंतच ते देणे शक्य होईल. कारण बाष्पीभवनामुळे पाण्याच्या साठ्यात नंतर वेगाने घट होणार आहे. त्यामुळे एरंडोलची समस्या गंभीर आहे.