शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

देशातील २०० यशस्वी कृषी उद्योजकात मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे येथील श्यामल जावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 19:17 IST

कृषी विस्ताराचे राष्ट्रीय व्यवस्थापन संस्थेने देशभरातील २०० यशस्वी कृषिपूरक उद्योग करणाऱ्या उद्योजकांची यशोगाथा नुकतीच स्मरणिकेत प्रकाशित केली आहे. यात मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे येथील माळरानावर वेगवेगळे तलाव करून मत्स्यबीज उत्पादन करणाºया उच्च शिक्षित तरुण श्यामल जावरे यांची मत्स्यबीज प्रकल्पाची निवड करण्यात आली

ठळक मुद्देपडीक जमिनीतून साकारला प्रकल्पनोकरी सोडून सुरू केला व्यवसाय

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : कृषी विस्ताराचे राष्ट्रीय व्यवस्थापन संस्थेने देशभरातील २०० यशस्वी कृषिपूरक उद्योग करणाऱ्या उद्योजकांची यशोगाथा नुकतीच स्मरणिकेत प्रकाशित केली आहे. यात मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे येथील माळरानावर वेगवेगळे तलाव करून मत्स्यबीज उत्पादन करणाºया उच्च शिक्षित तरुण श्यामल जावरे यांची मत्स्यबीज प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. त्यांचे हे मत्स्यबीज उत्पादन प्रकल्प कृषीपूरक उद्योजकांना मार्गदर्शक ठरत आहे.कृषी विस्तार राष्ट्रीय व्यवस्थापन संस्था ही देशातील एक स्वायत्त कृषि शिक्षण संस्था आहे. कृषी अर्थव्यवस्थेमध्ये विस्तार अधिकारी, व्यवस्थापक, शास्त्रज्ञ आणि प्रशासक यांना व्यवस्थापकीय आणि तांत्रिक कौशल्यांचा विकास करणे, शेतकऱ्यांंना आणि मच्छीमारांना टिकाऊ शेतीचा सराव करण्यासाठी त्यांना सहाय्य आणि सेवा प्रदान करण्यात सक्षम करणे हा आहे. अशा या संस्थेमार्फत मुक्ताईनगरसारख्या ग्रामीण भागातील मत्स्यबीज उत्पादन करणाºया शेतकºयाचा यशोगाथा मांडून सन्मानित करण्यात आले आहेमुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे गावाच्या माळरानावर असलेल्या आपल्या पडीक सहा एकर क्षेत्रात उच्चशिक्षित तरुण शेतकºयांचे मत्स्यबीज उत्पादन प्रकल्प साकारला आहे. त्यातून शेती पूरक उद्योगांच्या नावीन्यपूर्ण उपक्रम तयार झालाय. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेल्या या प्रकल्पातून पहिल्या पंधरवड्यात २५ लाख मत्स्यबीज उत्पादन घेण्याचा विक्रम केला आहे.असा आहे प्रकल्पसव्वा कोटी रुपये खर्चातूून श्यामल जावरे यांनी आधुनिक प्रकल्प उभा केला आहे. खासगी स्वरूपात खान्देशातून हा पहिलाच प्रकल्प आहे. प्रकल्पात ब्रूडर टँकमध्ये दोन हॉर्सपॉवरच्या मोटर चालणारे दोन एरिएटर सोडले आहेत. त्यामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण वाढून पाण्याचा प्रवाह पोहण्याचा व्यायाम मिळतो. येथील मासे आठ मीटर व्यासाच्या स्पनिग पुलांमध्ये सोडले जातात. येथे नर व मादी सोडून अंडी फलित होतात. तयार झालेल्या अंडी सोडले जातात. ७२ तासांनंतर अंड्यांमधून मत्स्यबीज तयार होतात. हे पाईपलाईनद्वारे स्क्रीनिंग पूलमध्ये सोडले जातात. तेथे माश्यांवर कंडिशनिंग शावर केले जाते. हे बीजखाद्य ग्रहण करण्यायोग्य झाल्यानंतर त्यांना नर्सरी मध्ये सोडले जाते. थोडक्यात या संपूर्ण प्रक्रियेत येथे आठ तलाव तयार करण्यात आले आहे. प्रकल्पाची रचनेट प्रकल्पात पावसाचे पाणी येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.मिरगड रोहू कटलाप्रजाती खान्देशात मासेमारी व्यवसाय करणाºया संस्था व व्यावसायिक मिरगळ रोह कतला असे मत्स्यबीज वापर करतात. हे बीज त्यांना कोलकाता किंवा हैदराबाद येथून मागवायचे लागते. त्यांनी या तिन्ही प्रकारच्या मत्स्यबीजांचे उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे व्यावसायिकांना लांब अंतरावरून मत्स्यबीज आणण्याचा खर्च आणि त्रास टळला आहे.उच्च शिक्षित तरुणसेवानिवृत्त अधिकारी महेंद्र रामकृष्ण भोई यांचे पुत्र श्यामल जावरे यांनी हा प्रकल्प साकारला आहे. बीएससी अ‍ॅग्री मास्टर आॅफ मार्केटिंग मॅनेजमेंट अशा उच्च शिक्षणाची नोकरी सोडून त्यांनी शेतीची कास धरली. मत्स्यबीज उत्पादन करणारे व्यवसाय निवडला. यासाठी त्यांनी सेंटर इन्स्टिट्यूट आॅफ एज्युकेशन अभ्यास केला. नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला आणि तो यशस्वी ठरला. देशपातळीवर यशस्वी मत्स्यबीज उत्पादक म्हणून ते ओळखले जाऊ लागले आहेत.