शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मयत कुटुंबांच्या वारसांना मदत करून केले ‘श्री’ विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 18:25 IST

गणेशोत्सव काळात गावात मयत झालेल्या तीन कुटुंबांच्या वारसांना संसाराचे जीवनावश्यक साहित्य देऊन तालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपने समाजापुढे सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श घालून दिला आहे.

ठळक मुद्देअनिष्ट रूढींना फाटा भंडाऱ्याचे कार्यक्रम रद्द करून मंडळाचा सामाजिक ऐक्याचा आदर्शतालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपचा पुढाकारलोकमत शुभ वर्तमानत्या कुटुंबाचे अश्रू अनावरसाक्षात गणेशच कार्यकर्त्यांच्या रूपाने मदतीला आला

अमळनेर, जि.जळगाव : गणेशोत्सव काळात गावात मयत झालेल्या तीन कुटुंबांच्या वारसांना संसाराचे जीवनावश्यक साहित्य देऊन तालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपने समाजापुढे सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श घालून दिला आहे.गणेशोत्सव म्हणजे भंडारा, महाप्रसाद विसर्जन मिरवणुकीत वाजंत्री यावर प्रचंड खर्च करून पैशाची उधळपट्टी केली जाते. मात्र अंतुर्ली रंजाने या गावात गणेशोत्सव काळात सहा दिवसात मातंग समाजाचे राकेश रोहिदास म्हस्के वय २२), शिंपी समाजाचे मधुकर पीतांबर शिंपी (वय ६०), मागासवर्गीय समाजाचे भाईदास केशव जगदेव यांचे निधन झाले. त्यामुळे या तीन समाजातील परिवार पोरका झाला.कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्याने कुटुंबातील इतर सदस्यांवर संकट कोसळले म्हणून स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपचे अध्यक्ष अनिल धोबी, उपाध्यक्ष योगेश सैंदाणे, महेश पाटील, कार्याध्यक्ष सतीश पाटील, सचिन सैंदाणे यांनी सामूहिकरित्या निर्णय घेऊन सातव्या दिवशी विसर्जनाच्या वेळी बँड, डीजे वाजवायचे नाही आणि महाप्रसाद, भंडारा आदी कार्यक्रम रद्द केले. बचत केलेल्या या पैशातून तिन्ही कुटुंबांच्या सदस्यांना संसारोपयोगी साहित्य, कपडे आणि तीन महिन्यांचा किराणा सामान असे साहित्य घेऊन दिले. ते सरपंच शीतल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी त्या कुटुंबाचे अश्रू अनावर झाले. साक्षात गणेशच कार्यकर्त्यांच्या रूपाने मदतीला आला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.तिन्ही वेगवेगळ्या समाजाच्या कुटुंबांना मदत करून स्वराज्य मंडळाने व कमांडो ग्रुपने सामाजिक ऐक्य दाखवले आणि रूढी परंपरांना फाटा देऊन खºया भक्तीची दिशा दाखवली. याबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. मंडळाने कोणतीही वाजंत्री न वाजता साध्या पद्धतीने मिरवणूक काढली. अजय गायकवाड, राकेश गरुड, गणेश जगताप, गणेश म्हस्के, सुनील शेवाळे, नारायण पाटील, बापू शिक्रापूर, समाधान गरुड, विकास शिरसाठ, विजय पाटील, अनिल गायकवाड, गणेश अवसरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर