शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मयत कुटुंबांच्या वारसांना मदत करून केले ‘श्री’ विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 18:25 IST

गणेशोत्सव काळात गावात मयत झालेल्या तीन कुटुंबांच्या वारसांना संसाराचे जीवनावश्यक साहित्य देऊन तालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपने समाजापुढे सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श घालून दिला आहे.

ठळक मुद्देअनिष्ट रूढींना फाटा भंडाऱ्याचे कार्यक्रम रद्द करून मंडळाचा सामाजिक ऐक्याचा आदर्शतालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपचा पुढाकारलोकमत शुभ वर्तमानत्या कुटुंबाचे अश्रू अनावरसाक्षात गणेशच कार्यकर्त्यांच्या रूपाने मदतीला आला

अमळनेर, जि.जळगाव : गणेशोत्सव काळात गावात मयत झालेल्या तीन कुटुंबांच्या वारसांना संसाराचे जीवनावश्यक साहित्य देऊन तालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपने समाजापुढे सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श घालून दिला आहे.गणेशोत्सव म्हणजे भंडारा, महाप्रसाद विसर्जन मिरवणुकीत वाजंत्री यावर प्रचंड खर्च करून पैशाची उधळपट्टी केली जाते. मात्र अंतुर्ली रंजाने या गावात गणेशोत्सव काळात सहा दिवसात मातंग समाजाचे राकेश रोहिदास म्हस्के वय २२), शिंपी समाजाचे मधुकर पीतांबर शिंपी (वय ६०), मागासवर्गीय समाजाचे भाईदास केशव जगदेव यांचे निधन झाले. त्यामुळे या तीन समाजातील परिवार पोरका झाला.कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्याने कुटुंबातील इतर सदस्यांवर संकट कोसळले म्हणून स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपचे अध्यक्ष अनिल धोबी, उपाध्यक्ष योगेश सैंदाणे, महेश पाटील, कार्याध्यक्ष सतीश पाटील, सचिन सैंदाणे यांनी सामूहिकरित्या निर्णय घेऊन सातव्या दिवशी विसर्जनाच्या वेळी बँड, डीजे वाजवायचे नाही आणि महाप्रसाद, भंडारा आदी कार्यक्रम रद्द केले. बचत केलेल्या या पैशातून तिन्ही कुटुंबांच्या सदस्यांना संसारोपयोगी साहित्य, कपडे आणि तीन महिन्यांचा किराणा सामान असे साहित्य घेऊन दिले. ते सरपंच शीतल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी त्या कुटुंबाचे अश्रू अनावर झाले. साक्षात गणेशच कार्यकर्त्यांच्या रूपाने मदतीला आला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.तिन्ही वेगवेगळ्या समाजाच्या कुटुंबांना मदत करून स्वराज्य मंडळाने व कमांडो ग्रुपने सामाजिक ऐक्य दाखवले आणि रूढी परंपरांना फाटा देऊन खºया भक्तीची दिशा दाखवली. याबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. मंडळाने कोणतीही वाजंत्री न वाजता साध्या पद्धतीने मिरवणूक काढली. अजय गायकवाड, राकेश गरुड, गणेश जगताप, गणेश म्हस्के, सुनील शेवाळे, नारायण पाटील, बापू शिक्रापूर, समाधान गरुड, विकास शिरसाठ, विजय पाटील, अनिल गायकवाड, गणेश अवसरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर