शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
2
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
5
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
6
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
7
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
8
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
9
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
10
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
11
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
12
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
13
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
14
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
15
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
16
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
17
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
18
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
19
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
20
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

मयत कुटुंबांच्या वारसांना मदत करून केले ‘श्री’ विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 18:25 IST

गणेशोत्सव काळात गावात मयत झालेल्या तीन कुटुंबांच्या वारसांना संसाराचे जीवनावश्यक साहित्य देऊन तालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपने समाजापुढे सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श घालून दिला आहे.

ठळक मुद्देअनिष्ट रूढींना फाटा भंडाऱ्याचे कार्यक्रम रद्द करून मंडळाचा सामाजिक ऐक्याचा आदर्शतालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपचा पुढाकारलोकमत शुभ वर्तमानत्या कुटुंबाचे अश्रू अनावरसाक्षात गणेशच कार्यकर्त्यांच्या रूपाने मदतीला आला

अमळनेर, जि.जळगाव : गणेशोत्सव काळात गावात मयत झालेल्या तीन कुटुंबांच्या वारसांना संसाराचे जीवनावश्यक साहित्य देऊन तालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपने समाजापुढे सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श घालून दिला आहे.गणेशोत्सव म्हणजे भंडारा, महाप्रसाद विसर्जन मिरवणुकीत वाजंत्री यावर प्रचंड खर्च करून पैशाची उधळपट्टी केली जाते. मात्र अंतुर्ली रंजाने या गावात गणेशोत्सव काळात सहा दिवसात मातंग समाजाचे राकेश रोहिदास म्हस्के वय २२), शिंपी समाजाचे मधुकर पीतांबर शिंपी (वय ६०), मागासवर्गीय समाजाचे भाईदास केशव जगदेव यांचे निधन झाले. त्यामुळे या तीन समाजातील परिवार पोरका झाला.कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्याने कुटुंबातील इतर सदस्यांवर संकट कोसळले म्हणून स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपचे अध्यक्ष अनिल धोबी, उपाध्यक्ष योगेश सैंदाणे, महेश पाटील, कार्याध्यक्ष सतीश पाटील, सचिन सैंदाणे यांनी सामूहिकरित्या निर्णय घेऊन सातव्या दिवशी विसर्जनाच्या वेळी बँड, डीजे वाजवायचे नाही आणि महाप्रसाद, भंडारा आदी कार्यक्रम रद्द केले. बचत केलेल्या या पैशातून तिन्ही कुटुंबांच्या सदस्यांना संसारोपयोगी साहित्य, कपडे आणि तीन महिन्यांचा किराणा सामान असे साहित्य घेऊन दिले. ते सरपंच शीतल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी त्या कुटुंबाचे अश्रू अनावर झाले. साक्षात गणेशच कार्यकर्त्यांच्या रूपाने मदतीला आला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.तिन्ही वेगवेगळ्या समाजाच्या कुटुंबांना मदत करून स्वराज्य मंडळाने व कमांडो ग्रुपने सामाजिक ऐक्य दाखवले आणि रूढी परंपरांना फाटा देऊन खºया भक्तीची दिशा दाखवली. याबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. मंडळाने कोणतीही वाजंत्री न वाजता साध्या पद्धतीने मिरवणूक काढली. अजय गायकवाड, राकेश गरुड, गणेश जगताप, गणेश म्हस्के, सुनील शेवाळे, नारायण पाटील, बापू शिक्रापूर, समाधान गरुड, विकास शिरसाठ, विजय पाटील, अनिल गायकवाड, गणेश अवसरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर