शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

महामार्गावरील खेड्यातील दारू दुकाने पुन्हा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 18:27 IST

ज्या खेड्यांचा विकास आराखडा शासनाने मंजूर केला आहे, अशा गावांना त्या ठिकाणच्या दारू दुकानांचे परवाने नूतनीकरण करण्याचा निर्णय न्यायालयाच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी घेतला आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालय व शासनाचा संयुक्त निर्णयराज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचे पत्र

आॅनलाईन लोकमतअमळनेर, दि.८ : राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील ज्या खेड्यांचा विकास आराखडा शासनाने मंजूर केला आहे, अशा गावांना त्या ठिकाणच्या दारू दुकानांचे परवाने नूतनीकरण करण्याचा निर्णय न्यायालयाच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी घेतला आहे.राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील खेड्यातील दारू दुकाने व परमिट रूम आणि बिअर बार दुकानांचे परवाने नूतनीकरणास न्यायालयाच्या आदेशाने १ एप्रिल २०१७ नंतर बंदी करण्यात आली होती. मात्र दुकानदार सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तसेच शासनाकडे निवेदनेदेखील देण्यात आली होती. त्यानुसार फेब्रुवारी २०१८ मधील सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व शासनाने काही अटींच्या अधीन राहून परवाने नुतनीकरणाचा निर्णय घेतला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्हे वगळून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत नुकतेच पत्र देऊन २०११ च्या जनगणनेनुसार पाच हजार लोकसंख्या असलेले गाव, एमआयडीसी क्षेत्र असलेले गाव , किंवा ज्या ग्रामपंचायतींचा विकास आराखडा शासनाने मंजूर केला आहे अशा गावांचे दारू, परमिट रूम बिअर बार यांचे परवाने २०१७ ते १८ व २०१८ ते १९ चे शुल्क आकारून मागणीनुसार नूतनीकरण करण्याची परवानगी दिली आहे. मात्र ज्या गावांना शासनाने पर्यटनस्थळ म्हणून मान्यता दिली आहे, तेथे दारू दुकाने सुरू करता येणार नाहीत असेही पत्रात म्हटले आहे.