शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

मारवडला मयताची अंत्ययात्रा नव्हे तर काढली जाते शोभायात्रा

By admin | Updated: June 30, 2017 13:56 IST

अंत्ययात्रा नव्हे मयताची काढली जाते शोभायात्रा. सुतकाऐवजी केले जाते रामनामाचे स्मरण

 संजय पाटील /ऑनलाईन लोकमत

अमळनेर,दि.30 - मृत्यू ही अटळ बाब आहे. मृत्यूनंतर त्याचे विधीवत अंत्यसंस्कार हा मानवी जीवनातील शेवटचा संस्कार असतो. मात्र अमळनेर तालुक्यातील मारवड येथील सुरेश साळुंखे यांचे कुटुंब कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार नव्हे तर एखाद्या राजाची शोभायात्रा काढावी तसा उत्सव साजरा करतात.
मारवड येथील साळुंखे परिवारात मृत्यू झाल्यानंतर दु:ख व्यक्त न करता आनंद व्यक्त केला जातो. कैवल्य सत विज्ञान विधी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. अशा परिवारानां राम स्नेही परिवार संबोधले जाते. माणूस  जन्माला आल्यानंतर जसा आंनद व्यक्त केला जातो, तसाच तो मृत झाल्यावरही  व्यक्त करावा हे तत्व अनुसरून अंत्ययात्रा नव्हे तर शोभायात्रा काढली जाते. लाकडी वैकुंठी किंवा डोली तयार करून मृत व्यक्तीला ध्यान करत आहे, अशा पद्धतीने बसवून वाजंत्री लावून घोडे , उंट, हत्ती , यावर शिलेदार बसवून  स्मशानाच्या दिशेने शोभा यात्रा काढली जाते. आणि विशेष म्हणजे यात महिलाही मोठय़ा संख्येने सहभागी होतात. रस्त्याने जाताना हरी जसगायन , रामनाम स्मरण केले जाते. महिला स्मशानात ही येतात. या पद्धतीत अनिष्ट रूढी जसे सुतक, केस देणे, गंधमुक्ती, उत्तरकार्य, विधी केला जात नाही. अग्निडागही परिवारातील कोणीही देतो. तसेच श्राद्ध, पुण्यतिथी असे काहीच केले जात नाही. स्मशानात लोकांना खायला आणि पाणी याचीही व्यवस्था केली जाते. व्यक्तीला जिवंतपणीच जे काही खाऊ घालायचे ते खाऊ घालतात. मेल्यानंतर पितर किंवा श्राद्ध घातले जात नाही. तसेच सुतकाचे दिवस पाळण्यापेक्षा राम नामाचे स्मरण करून रामद्वार पद्धतीची माहिती दिली जाते. व्यक्तीचे निधन अपघाती असो की नैसर्गिक किंवा व्यक्ती तरुण असो किंवा म्हातारी शोभायात्रेत सर्व जण महिलांसह जल्लोष आनंद व्यक्त करतात.