शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मारवडला मयताची अंत्ययात्रा नव्हे तर काढली जाते शोभायात्रा

By admin | Updated: June 30, 2017 13:56 IST

अंत्ययात्रा नव्हे मयताची काढली जाते शोभायात्रा. सुतकाऐवजी केले जाते रामनामाचे स्मरण

 संजय पाटील /ऑनलाईन लोकमत

अमळनेर,दि.30 - मृत्यू ही अटळ बाब आहे. मृत्यूनंतर त्याचे विधीवत अंत्यसंस्कार हा मानवी जीवनातील शेवटचा संस्कार असतो. मात्र अमळनेर तालुक्यातील मारवड येथील सुरेश साळुंखे यांचे कुटुंब कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार नव्हे तर एखाद्या राजाची शोभायात्रा काढावी तसा उत्सव साजरा करतात.
मारवड येथील साळुंखे परिवारात मृत्यू झाल्यानंतर दु:ख व्यक्त न करता आनंद व्यक्त केला जातो. कैवल्य सत विज्ञान विधी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. अशा परिवारानां राम स्नेही परिवार संबोधले जाते. माणूस  जन्माला आल्यानंतर जसा आंनद व्यक्त केला जातो, तसाच तो मृत झाल्यावरही  व्यक्त करावा हे तत्व अनुसरून अंत्ययात्रा नव्हे तर शोभायात्रा काढली जाते. लाकडी वैकुंठी किंवा डोली तयार करून मृत व्यक्तीला ध्यान करत आहे, अशा पद्धतीने बसवून वाजंत्री लावून घोडे , उंट, हत्ती , यावर शिलेदार बसवून  स्मशानाच्या दिशेने शोभा यात्रा काढली जाते. आणि विशेष म्हणजे यात महिलाही मोठय़ा संख्येने सहभागी होतात. रस्त्याने जाताना हरी जसगायन , रामनाम स्मरण केले जाते. महिला स्मशानात ही येतात. या पद्धतीत अनिष्ट रूढी जसे सुतक, केस देणे, गंधमुक्ती, उत्तरकार्य, विधी केला जात नाही. अग्निडागही परिवारातील कोणीही देतो. तसेच श्राद्ध, पुण्यतिथी असे काहीच केले जात नाही. स्मशानात लोकांना खायला आणि पाणी याचीही व्यवस्था केली जाते. व्यक्तीला जिवंतपणीच जे काही खाऊ घालायचे ते खाऊ घालतात. मेल्यानंतर पितर किंवा श्राद्ध घातले जात नाही. तसेच सुतकाचे दिवस पाळण्यापेक्षा राम नामाचे स्मरण करून रामद्वार पद्धतीची माहिती दिली जाते. व्यक्तीचे निधन अपघाती असो की नैसर्गिक किंवा व्यक्ती तरुण असो किंवा म्हातारी शोभायात्रेत सर्व जण महिलांसह जल्लोष आनंद व्यक्त करतात.