शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मारवडला मयताची अंत्ययात्रा नव्हे तर काढली जाते शोभायात्रा

By admin | Updated: June 30, 2017 13:56 IST

अंत्ययात्रा नव्हे मयताची काढली जाते शोभायात्रा. सुतकाऐवजी केले जाते रामनामाचे स्मरण

 संजय पाटील /ऑनलाईन लोकमत

अमळनेर,दि.30 - मृत्यू ही अटळ बाब आहे. मृत्यूनंतर त्याचे विधीवत अंत्यसंस्कार हा मानवी जीवनातील शेवटचा संस्कार असतो. मात्र अमळनेर तालुक्यातील मारवड येथील सुरेश साळुंखे यांचे कुटुंब कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार नव्हे तर एखाद्या राजाची शोभायात्रा काढावी तसा उत्सव साजरा करतात.
मारवड येथील साळुंखे परिवारात मृत्यू झाल्यानंतर दु:ख व्यक्त न करता आनंद व्यक्त केला जातो. कैवल्य सत विज्ञान विधी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. अशा परिवारानां राम स्नेही परिवार संबोधले जाते. माणूस  जन्माला आल्यानंतर जसा आंनद व्यक्त केला जातो, तसाच तो मृत झाल्यावरही  व्यक्त करावा हे तत्व अनुसरून अंत्ययात्रा नव्हे तर शोभायात्रा काढली जाते. लाकडी वैकुंठी किंवा डोली तयार करून मृत व्यक्तीला ध्यान करत आहे, अशा पद्धतीने बसवून वाजंत्री लावून घोडे , उंट, हत्ती , यावर शिलेदार बसवून  स्मशानाच्या दिशेने शोभा यात्रा काढली जाते. आणि विशेष म्हणजे यात महिलाही मोठय़ा संख्येने सहभागी होतात. रस्त्याने जाताना हरी जसगायन , रामनाम स्मरण केले जाते. महिला स्मशानात ही येतात. या पद्धतीत अनिष्ट रूढी जसे सुतक, केस देणे, गंधमुक्ती, उत्तरकार्य, विधी केला जात नाही. अग्निडागही परिवारातील कोणीही देतो. तसेच श्राद्ध, पुण्यतिथी असे काहीच केले जात नाही. स्मशानात लोकांना खायला आणि पाणी याचीही व्यवस्था केली जाते. व्यक्तीला जिवंतपणीच जे काही खाऊ घालायचे ते खाऊ घालतात. मेल्यानंतर पितर किंवा श्राद्ध घातले जात नाही. तसेच सुतकाचे दिवस पाळण्यापेक्षा राम नामाचे स्मरण करून रामद्वार पद्धतीची माहिती दिली जाते. व्यक्तीचे निधन अपघाती असो की नैसर्गिक किंवा व्यक्ती तरुण असो किंवा म्हातारी शोभायात्रेत सर्व जण महिलांसह जल्लोष आनंद व्यक्त करतात.