शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या मातीतील घडलेले एक आश्चर्य- अभिनेते डॉ.अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 18:38 IST

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासाला पडलेले कोडे होते, तर देशाच्या इतिहासाला सोनेरी स्वप्न होते आणि महाराष्ट्राच्या मातीतील घडलेले एक आश्चर्य होते. सर्वसामान्य कुटुंंबात येवूनही केवळ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवात्वावर पोहचता येते, असे उदाहरण जगात सापडणे अशक्य आहे, अशी त्यांची थोरवी आहे, असे स्पष्ट मत अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी चाळीसगाव येथे ६ रोजी चाळीसगाव प्रिमीयर लिगच्या खुल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

ठळक मुद्देचाळीसगाव येथे प्रिमियर लिगच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन१९२ संघातील एक हजार ९२० खेळाडू सहभागी२० खेळाडूंचा चाळीसगाव संघ राज्य, राष्ट्रीय पातळीवर खेळणार

चाळीसगाव, जि.जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासाला पडलेले कोडे होते, तर देशाच्या इतिहासाला सोनेरी स्वप्न होते आणि महाराष्ट्राच्या मातीतील घडलेले एक आश्चर्य होते. सर्वसामान्य कुटुंंबात येवूनही केवळ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवात्वावर पोहचता येते, असे उदाहरण जगात सापडणे अशक्य आहे, अशी त्यांची थोरवी आहे, असे स्पष्ट मत अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी चाळीसगाव येथे ६ रोजी चाळीसगाव प्रिमीयर लिगच्या खुल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.य.ना.चव्हाण महाविद्यालयात प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. कोल्हे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात् आले. अध्यक्षस्थानी खासदार ए.टी.पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री एम.के.पाटील, माजी आमदार प्रा.साहेबराव घोडे, राजीव देशमुख, आर.ओ.पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, के.बी.साळुंखे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुरेश स्वार, सतीष दराडे, कृ.उ.बा.सभापती रवींद्र चुडामण पाटील, वसंतराव चंद्रात्रे, अ‍ॅड. रोहित पाटील, रमेश सोनवणे, नाना पवार, उद्धवराव महाजन, धर्मराज वाघ, अरुण निकम, डॉ. संजय देशमुख, मंगेश पाटील, विश्वास चव्हाण, दगाजी जाधव, संयोजक कैलास सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी नारायणवाडीतील युवक व युवतीने शिववंदना व महाराजांची आरती म्हटली. प्रास्ताविक संयोजक व भारतीय कृषी व अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सूर्यवंशी यांनी केले. या कबड्डी स्पर्धेत एकूण १९२ संघातील एक हजार ९२० खेळाडू सहभागी झाले असून, त्यापैकी २० खेळाडूंचा चाळीसगाव संघ या नावाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व जिल्हा पातळीवर खेळेल व त्या माध्यमातून चाळीसगावचे नाव उंचावेल, अशी अपेक्षा सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.खासदार ए.टी.पाटील, माजी आमदार आर.ओ.पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जिजाबराव वाघ यांनी केले. संयोजक कैलास सूर्यवंशी यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असल्याबद्दल डॉ. कोल्हे यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रम स्थळी डॉ. अमोल कोल्हे यांचे आगमन होताच महिलांनी त्यांचे औक्षण केले. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आधी डॉ. कोल्हे यांचे पिलखोड व टाकळी प्र.दे.येथे स्वागत करण्यात आले. कैलास सूूर्यवंशी यांच्या निवासस्थानापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.