शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या मातीतील घडलेले एक आश्चर्य- अभिनेते डॉ.अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 18:38 IST

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासाला पडलेले कोडे होते, तर देशाच्या इतिहासाला सोनेरी स्वप्न होते आणि महाराष्ट्राच्या मातीतील घडलेले एक आश्चर्य होते. सर्वसामान्य कुटुंंबात येवूनही केवळ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवात्वावर पोहचता येते, असे उदाहरण जगात सापडणे अशक्य आहे, अशी त्यांची थोरवी आहे, असे स्पष्ट मत अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी चाळीसगाव येथे ६ रोजी चाळीसगाव प्रिमीयर लिगच्या खुल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

ठळक मुद्देचाळीसगाव येथे प्रिमियर लिगच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन१९२ संघातील एक हजार ९२० खेळाडू सहभागी२० खेळाडूंचा चाळीसगाव संघ राज्य, राष्ट्रीय पातळीवर खेळणार

चाळीसगाव, जि.जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासाला पडलेले कोडे होते, तर देशाच्या इतिहासाला सोनेरी स्वप्न होते आणि महाराष्ट्राच्या मातीतील घडलेले एक आश्चर्य होते. सर्वसामान्य कुटुंंबात येवूनही केवळ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवात्वावर पोहचता येते, असे उदाहरण जगात सापडणे अशक्य आहे, अशी त्यांची थोरवी आहे, असे स्पष्ट मत अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी चाळीसगाव येथे ६ रोजी चाळीसगाव प्रिमीयर लिगच्या खुल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.य.ना.चव्हाण महाविद्यालयात प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. कोल्हे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात् आले. अध्यक्षस्थानी खासदार ए.टी.पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री एम.के.पाटील, माजी आमदार प्रा.साहेबराव घोडे, राजीव देशमुख, आर.ओ.पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, के.बी.साळुंखे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुरेश स्वार, सतीष दराडे, कृ.उ.बा.सभापती रवींद्र चुडामण पाटील, वसंतराव चंद्रात्रे, अ‍ॅड. रोहित पाटील, रमेश सोनवणे, नाना पवार, उद्धवराव महाजन, धर्मराज वाघ, अरुण निकम, डॉ. संजय देशमुख, मंगेश पाटील, विश्वास चव्हाण, दगाजी जाधव, संयोजक कैलास सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी नारायणवाडीतील युवक व युवतीने शिववंदना व महाराजांची आरती म्हटली. प्रास्ताविक संयोजक व भारतीय कृषी व अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सूर्यवंशी यांनी केले. या कबड्डी स्पर्धेत एकूण १९२ संघातील एक हजार ९२० खेळाडू सहभागी झाले असून, त्यापैकी २० खेळाडूंचा चाळीसगाव संघ या नावाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व जिल्हा पातळीवर खेळेल व त्या माध्यमातून चाळीसगावचे नाव उंचावेल, अशी अपेक्षा सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.खासदार ए.टी.पाटील, माजी आमदार आर.ओ.पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जिजाबराव वाघ यांनी केले. संयोजक कैलास सूर्यवंशी यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असल्याबद्दल डॉ. कोल्हे यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रम स्थळी डॉ. अमोल कोल्हे यांचे आगमन होताच महिलांनी त्यांचे औक्षण केले. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आधी डॉ. कोल्हे यांचे पिलखोड व टाकळी प्र.दे.येथे स्वागत करण्यात आले. कैलास सूूर्यवंशी यांच्या निवासस्थानापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.