शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या मातीतील घडलेले एक आश्चर्य- अभिनेते डॉ.अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 18:38 IST

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासाला पडलेले कोडे होते, तर देशाच्या इतिहासाला सोनेरी स्वप्न होते आणि महाराष्ट्राच्या मातीतील घडलेले एक आश्चर्य होते. सर्वसामान्य कुटुंंबात येवूनही केवळ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवात्वावर पोहचता येते, असे उदाहरण जगात सापडणे अशक्य आहे, अशी त्यांची थोरवी आहे, असे स्पष्ट मत अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी चाळीसगाव येथे ६ रोजी चाळीसगाव प्रिमीयर लिगच्या खुल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

ठळक मुद्देचाळीसगाव येथे प्रिमियर लिगच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन१९२ संघातील एक हजार ९२० खेळाडू सहभागी२० खेळाडूंचा चाळीसगाव संघ राज्य, राष्ट्रीय पातळीवर खेळणार

चाळीसगाव, जि.जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासाला पडलेले कोडे होते, तर देशाच्या इतिहासाला सोनेरी स्वप्न होते आणि महाराष्ट्राच्या मातीतील घडलेले एक आश्चर्य होते. सर्वसामान्य कुटुंंबात येवूनही केवळ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवात्वावर पोहचता येते, असे उदाहरण जगात सापडणे अशक्य आहे, अशी त्यांची थोरवी आहे, असे स्पष्ट मत अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी चाळीसगाव येथे ६ रोजी चाळीसगाव प्रिमीयर लिगच्या खुल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.य.ना.चव्हाण महाविद्यालयात प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. कोल्हे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात् आले. अध्यक्षस्थानी खासदार ए.टी.पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री एम.के.पाटील, माजी आमदार प्रा.साहेबराव घोडे, राजीव देशमुख, आर.ओ.पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, के.बी.साळुंखे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुरेश स्वार, सतीष दराडे, कृ.उ.बा.सभापती रवींद्र चुडामण पाटील, वसंतराव चंद्रात्रे, अ‍ॅड. रोहित पाटील, रमेश सोनवणे, नाना पवार, उद्धवराव महाजन, धर्मराज वाघ, अरुण निकम, डॉ. संजय देशमुख, मंगेश पाटील, विश्वास चव्हाण, दगाजी जाधव, संयोजक कैलास सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी नारायणवाडीतील युवक व युवतीने शिववंदना व महाराजांची आरती म्हटली. प्रास्ताविक संयोजक व भारतीय कृषी व अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सूर्यवंशी यांनी केले. या कबड्डी स्पर्धेत एकूण १९२ संघातील एक हजार ९२० खेळाडू सहभागी झाले असून, त्यापैकी २० खेळाडूंचा चाळीसगाव संघ या नावाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व जिल्हा पातळीवर खेळेल व त्या माध्यमातून चाळीसगावचे नाव उंचावेल, अशी अपेक्षा सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.खासदार ए.टी.पाटील, माजी आमदार आर.ओ.पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जिजाबराव वाघ यांनी केले. संयोजक कैलास सूर्यवंशी यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असल्याबद्दल डॉ. कोल्हे यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रम स्थळी डॉ. अमोल कोल्हे यांचे आगमन होताच महिलांनी त्यांचे औक्षण केले. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आधी डॉ. कोल्हे यांचे पिलखोड व टाकळी प्र.दे.येथे स्वागत करण्यात आले. कैलास सूूर्यवंशी यांच्या निवासस्थानापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.