शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

शिवसेनेने १०० कोटींच्या कामांचा ठराव रद्द केल्याने कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला दिलेल्या १०० कोटींच्या निधीतून एकही काम झालेले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला दिलेल्या १०० कोटींच्या निधीतून एकही काम झालेले नाही. या निधीतून भाजपने कामांचे नियोजन केले होते. मात्र, शिवसेनेने महापालिकेत सत्तेत आल्यानंतर भाजपने १०० कोटी रुपयातून होणाऱ्या कामांचा ठराव रद्द केला. हा ठराव रद्द केल्यानेच शहरातील कामे थांबली असून, हा ठराव रद्द झाला नसता तर शहरात १०० कोटींच्या निधीतून कामांना सुरुवात झाली असती असा आरोप भाजपचे गटनेते भगत बालाणी व उपगटनेते राजेंद्र घुगे-पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला आहे.

शहरातील रस्त्यांची अक्षरश वाट लागली आहे. राज्य शासनाकडून तीन वर्षांपुर्वी १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. मात्र, तीन वर्ष होवून देखील या निधीतून एकही रुपया खर्च झालेला नाही. याबाबत ‘लोकमत’ ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रकाशीत केले होते. यानंतर भाजपकडून प्रसिध्दीपत्रक काढून हा निधी अद्यापही अखर्चीत असल्याबाबत शिवसेनेला जबाबदार धरले आहे. भाजपकडून काढण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, मनपाला नगरोथ्थान योजने अंतर्गत ३ वर्षापुर्वी १०० कोटीचा निधी मंजुर झाला होता. त्यापैकी ४२ कोटीची कामांची निविदा निघुन ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला व त्यापैकी ५८ कोटींची प्रस्तावीत कामे तांत्रीक अडचणीमुळे प्रलंबीत आहे. दरम्यान, लोकसभा व विधानसभा ची आचारसंहिता असल्याकारणाने या कामांमध्ये दिंरगाई झाली. मात्र, त्यानंतर शिवसेनेचे सरकार राज्यात आल्यानंतर या सरकारने या निधीवर स्थगिती आणली, महापालिकेतही शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, या निधीवरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी १०० कोटीमधून होणारी कामे रद्द करण्याचा ठराव केला. यामुळे ही कामे रखडली, आता शिवसेनेने राज्य सरकारकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणावा असे आव्हान देखील भाजपकडून देण्यात आले आहे.