शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने १०० कोटींच्या कामांचा ठराव रद्द केल्याने कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला दिलेल्या १०० कोटींच्या निधीतून एकही काम झालेले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला दिलेल्या १०० कोटींच्या निधीतून एकही काम झालेले नाही. या निधीतून भाजपने कामांचे नियोजन केले होते. मात्र, शिवसेनेने महापालिकेत सत्तेत आल्यानंतर भाजपने १०० कोटी रुपयातून होणाऱ्या कामांचा ठराव रद्द केला. हा ठराव रद्द केल्यानेच शहरातील कामे थांबली असून, हा ठराव रद्द झाला नसता तर शहरात १०० कोटींच्या निधीतून कामांना सुरुवात झाली असती असा आरोप भाजपचे गटनेते भगत बालाणी व उपगटनेते राजेंद्र घुगे-पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला आहे.

शहरातील रस्त्यांची अक्षरश वाट लागली आहे. राज्य शासनाकडून तीन वर्षांपुर्वी १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. मात्र, तीन वर्ष होवून देखील या निधीतून एकही रुपया खर्च झालेला नाही. याबाबत ‘लोकमत’ ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रकाशीत केले होते. यानंतर भाजपकडून प्रसिध्दीपत्रक काढून हा निधी अद्यापही अखर्चीत असल्याबाबत शिवसेनेला जबाबदार धरले आहे. भाजपकडून काढण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, मनपाला नगरोथ्थान योजने अंतर्गत ३ वर्षापुर्वी १०० कोटीचा निधी मंजुर झाला होता. त्यापैकी ४२ कोटीची कामांची निविदा निघुन ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला व त्यापैकी ५८ कोटींची प्रस्तावीत कामे तांत्रीक अडचणीमुळे प्रलंबीत आहे. दरम्यान, लोकसभा व विधानसभा ची आचारसंहिता असल्याकारणाने या कामांमध्ये दिंरगाई झाली. मात्र, त्यानंतर शिवसेनेचे सरकार राज्यात आल्यानंतर या सरकारने या निधीवर स्थगिती आणली, महापालिकेतही शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, या निधीवरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी १०० कोटीमधून होणारी कामे रद्द करण्याचा ठराव केला. यामुळे ही कामे रखडली, आता शिवसेनेने राज्य सरकारकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणावा असे आव्हान देखील भाजपकडून देण्यात आले आहे.