शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

शिरसाळे परिवार : समाजकारणाला राजकारणाची जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:27 IST

कुटुंबातील पाच सदस्यांना नगरसेवकपदाचा मान

ठळक मुद्देशिवसेना शहर प्रमुखपदाची जबाबदारीनगरपालिकेमध्ये केले प्रतिनिधीत्व

जळगाव : समाजसेवेला राजकारणाची जोड देत जळगाव शहरातील शिरसाळे परिवाराने महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे. शिरसाळे कुटुंबातील सहा सदस्यांनी महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे.१९७६ पासून राजकारणात सक्रियस्व.नारायण शिरसाळे यांनी १९७६ पासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. तत्कालिन नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी विविध कामे केली. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पुलोद आघाडी निर्माण केली होती. या आघाडीच्या माध्यमातून त्यांनी जुना आठवडे बाजार भागातून पालिकेची निवडणूक लढविली.नगरपालिकेमध्ये केले प्रतिनिधीत्वपुलोद आघाडीतर्फे जळगाव शहरातील जबाबदारी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सांभाळली. या आघाडीतर्फे नारायण शिरसाळे हे विजयी झाले होते. त्यांच्याकडे जकात समितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते. तब्बल दोन वेळा ते तत्कालिन नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते.अरुण शिरसाळे यांचे समाजकारणदोन वेळा नगरसेवकपद भूषविल्यानंतर त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मोठे पुत्र अरुण शिरसाळे यांनी एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून विविध कामे करण्यास सुरुवात केली. या मंडळाच्या जळगाव शहरात १४ शाखा होत्या. त्यांना नाट्यक्षेत्राची आवड असल्याने ‘आम्ही जळगावकर’ ही नाट्य संस्थादेखील त्यांनी तयार करुन एकांकिका स्पर्धाही घेतली.शिवसेना शहर प्रमुखपदाची जबाबदारीअरुण शिरसाळे यांचे संघटन कौशल्य पाहून तत्कालिन शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश राणा यांनी शिवसेनेमार्फत काम करण्याची संधी देत शहर प्रमुखपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर १९९५ मध्ये पालिका निवडणुक त्यांनी लढविली. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले.चेतन शिरसाळे यांची राजकारणात एन्ट्रीशिरसाळे परिवारातून चेतन शिरसाळे यांनी खान्देश विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करीत विजय मिळविला. सध्या ते विद्यमान नगरसेवक आहेत. आता प्रभाग १६ अ मधून शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.आई व मुलगा दोघे एकाच वेळी नगरसेवकमातोश्री कलाबाई शिरसाळे व अरुण शिरसाळे हे विजयी झाले. त्यानंतरच्या पंचवार्षिकमध्ये त्यांचे बंधू अर्जुन शिरसाळे निवडणुकीत उभे राहिले. दरम्यान, अरुण शिरसाळे यांना उपनगराध्यक्षपदाचा सन्मान मिळाला.शिरसाळे दाम्पत्य महापालिकेतमहापालिकेच्या निवडणुकीत अरुण शिरसाळे व त्यांच्या पत्नी लाजवंती शिरसाळे या विजयी झाल्या. मनपाचे गटनेते म्हणून त्यांनी काम पाहिले. शिरसाळे दाम्पत्याने बचत गटांच्या समस्यांबाबत वेळोवेळी प्रश्न मांडत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव