शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

‘ती’ सहा बालके मिळण्यासाठी पंकजा मुंडे यांना साकडे

By admin | Updated: July 27, 2016 00:11 IST

टाटिया शिशुगृह प्रकरण : दोषींवर कारवाईचे दिले संकेत

 
 
 
जळगाव : टाटिया शिशुगृहाच्या ताब्यातील ‘त्या’ तीन महिन्याच्या बालकासह अन्य पाच बालकांना संगोपनासाठी पुन्हा संस्थेच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी संस्थेचे सचिव वीरेंद्रप्रकाश धोका यांनी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना साकडे. शुक्रवारी त्यांनी मुंडे यांची भेट घेतली. दरम्यान, शिशुगृहातील अनागोंदी व बालक नेण्याच्या प्रकरणात शिशुगृहाची मान्यता रद्द केली जाणार नाही, परंतु दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुंडे यांनी विधानसभेत दिली.
जळगाव जिल्ह्यातील एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीने व्यवस्थापकावर दबाव टाकून त्यांच्या परिचित व्यक्तीला हे तीन महिन्याचे बाळ बेकायदेशीरपणे देण्यात भाग पाडले आहे. याबाबत संस्थेने पोलीस स्टेशनला तक्रारही दिली आहे. आता अन्य बालकेही औरंगाबाद येथे हलविण्यात आली आहेत. संगोपनासाठी ती सर्व बाळे आमच्या ताब्यात द्यावे अशी मागणी धोका यांनी मुंडे यांच्याकडे केली.
जालन्याचे आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करुन या प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर उत्तर देताना महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्व प्रकरणाची आपण माहिती घेतली आहे. आयुक्त स्तरावर त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसातही तक्रार देण्यात आलेली आहे. बालकांच्या संगोपनाचा विषय असल्याने कोणत्याही शिशुगृहाची मान्यता रद्द केली जाणार नाही, मात्र अनियमितता व गैरप्रकार झाला असेल तर संबंधित दोषी व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुंडे यांनी दिले. 
 
 
पुनर्वसनासाठी मंत्र्यांना निवेदन
जळगाव : शहरातील दहा वर्षीय पीडित मुलीच्या पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजनेतून तिला तत्काळ पाच लाखाची मदत मंजूर करावी या मागणीसाठी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानाच्या राज्य सहसंयोजक तथा बाल हक्क आयोगाच्या माजी सदस्या प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांनी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मंगळवारी मुंबईत भेट घेतली.या भेटीत त्यांनी मुंडे यांना घटनेची माहिती दिली.
पीडित मुलगी सध्या बाल निरीक्षणगृहात आहे. मनोधैर्य योजनेतून मिळालेली रक्कम सज्ञान झाल्यानंतर तिला मिळू शकेल, जेणे करुन या रकमेतून तिचे पुनर्वसन होईल व भावी आयुष्य सुखकर होईल.या मुलीला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रय}शील आहोत. दरम्यान, या मुलीला तत्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन मुंडे यांनी प्रा.पाटील यांना दिले. गेल्या आठवडय़ात प्रा.पाटील यांनी पीडित मुलगी व तिच्या आजीची भेट घेऊन मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याबाबत बाल कल्याण अधिका:यांशी चर्चा केली होती.
 
शिशुगृह प्रशासनाकडून न्यायालयात याचिका
 बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार टाटिया शिशुगृहातील 6 बालकांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. या आदेशाविरोधात आता टाटिया शिशुगृह प्रशासनाने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
प्रभारी अधीक्षक गणेश परदेशी यांनी मूळ संस्थेच्यावतीने याचिका दाखल केली असून त्यात, बाल कल्याण समितीने बालकांना औरंगाबादला हलविण्यासाठी दिलेले आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे.