शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शेवरे बु।। येथे आदिवासी महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:12 IST

अडावद, ता. चोपडा : खर्डी शिवारात विनाकारण जंगलतोड का करतात? यापुढे जंगलात दिसला तर याद राखा, असा दम ...

अडावद, ता. चोपडा : खर्डी शिवारात विनाकारण जंगलतोड का करतात? यापुढे जंगलात दिसला तर याद राखा, असा दम देत आदिवासी महिलेसह दोन जणांना मारहाण करीत महिलेचा विनयभंग करणाऱ्या खर्डी येथील तिघांना अडावद पोलिसांनी अटक केली आहे. येथून जवळच असलेल्या शेवरे बु. (ता. चोपडा) येथे दि. ६ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत अडावद पोलीस स्टेशनला शेवरे बु. येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल दि. ६ रोजी ४ वाजेच्या सुमारास तिचे पती व अन्य दोघे घरात जेवण करत असताना, खर्डी (ता. चोपडा) येथील मुरलीधर गोकुळ पाटील, समाधान प्रताप पाटील व अनिल ऊर्फ व्हिडीओ बापू कोळी या तिघांनी तिचे पती बालसिंग पावरा यांना खर्डी शिवारात विनाकारण जंगलतोड का करतात, यापुढे जंगलात दिसलात तर याद राखा, असा दम देत मारहाण केली. त्यांना सोडविण्यास गेलेल्या गुलीबाईसही मारहाण करत मुरलीधर पाटील याने भांडणाचा फायदा घेत गुलीबाईचा विनयभंग केला.

या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी गुलीबाई, पती व अन्य दोघांसह संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास अडावद पोलीस स्टेशनला येत असताना खर्डी गावात मुख्य चौकात अडवून अनिल कोळी याने परत शिवीगाळ करून गुड्या कुमाऱ्या बारेला व सायमल मकरसिंग बारेला या दोघांना विळ्याने मारहाण करून जखमी केले.

याबाबत अडावद पोलीस स्टेशनला गुलीबाई हिच्या फिर्यादीवरून तिघांविरुध्द भादंवि कलम ३५४, ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती समजताच शेकडोंच्या संख्येने आदिवासी बांधवांनी पोलीस स्टेशनला एकच गर्दी केली होती. घटनेची तीव्रता पाहता, पोलिसांनी तात्काळ संशयित तिघांना गजाआड केले.

या घटनेत परस्परविरोधी दुसऱ्या फिर्यादीत खर्डी, ता. चोपडा येथील महिलेच्या तक्रारीवरून तीनजणांविरुध्द अडावद पोलीस स्टेशनला दि. ७ रोजी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. किरकोळ कारणावरून दि. ६ रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास खर्डी शिवारात प्रताप घनदास बारेलासह दोनजणांनी शिवीगाळ करून डोक्यावर व पाठीवर चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व मण्यांची पोत तोडून नुकसान केले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण दांडगे, पोलीस उपनिरीक्षक महेश घायतळ, सहायक फौजदार जगदीश कोळंबे, शरिफ तडवी, योगेश गोसावी, नसिर तडवी हे करत आहेत.

पोलिसांनी तात्काळ घेतली दखल

या घटनेची माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक किरण दांडगे, पोलीस उपनिरीक्षक महेश घायतळ हे आपल्या ताफ्यासह खर्डी येथे तात्काळ दाखल झाले. वादाच्या परिस्थितीमुळे जमलेल्या जमावाला आवाहन करून दांडगेे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्याचप्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी शेकडो आदिवासी बांधवांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अशा संवेदनशील परिस्थितीत अडावद पोलिसांनी तात्काळ घेतलेल्या ‘ॲक्शन’मुळे मोठा अनर्थ टळला.