शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अंजलीच्या पाठीशी शमिभा उभी राहिली अन् इतिहास घडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:07 IST

मराठीमध्ये एम.ए. केलेल्या शमिभा या वंचित बहुजन आघाडीच्या युवक जिल्हाध्यक्ष आहेत. अंजलीचा अर्ज नाकारला गेला. त्यावेळी शमिभा फैजपूरला होत्या. ...

मराठीमध्ये एम.ए. केलेल्या शमिभा या वंचित बहुजन आघाडीच्या युवक जिल्हाध्यक्ष आहेत. अंजलीचा अर्ज नाकारला गेला. त्यावेळी शमिभा फैजपूरला होत्या. अंजलीने अर्ज नाकारल्याची माहिती त्यांना दिली. अर्ज अखेरच्या काही तासात नाकारला होता. मात्र शमिभा तातडीने जळगावला परत आल्या. त्यांनी संपूर्ण माहिती घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी वाल्हे आणि तहसीलदार नामदेव पाटील यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कायद्याची जाण आणि लैंगिक समानतेसाठी लढा उभारणाऱ्या शमिभा यांनी कुणालाही जुमानले नाही. त्यांनी थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यांनी या याचिकेत मांडलेल्या मुद्यांना खंडपीठानेही मान्य केले आणि निवडणुकीत उभे राहण्याचा अंजलीचा मार्ग मोकळा झाला. मार्ग मोकळा झालेला असला तरी निवडून येण्याची कसरत अंजलीला करायची होती. इथून पुढचा प्रवास होता. तो आतापर्यंत जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये फक्त स्त्री की पुरुष अशीच चर्चा होत होती. मात्र अंजलीच्या यशाने खरी चर्चा सुरू झाली आहे स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी यांची.

याबाबत बोलताना शमिभा पाटील यांनी सांगितले की,‘आमच्या समानता आणि स्वाभिमानाचा हा फक्त पहिला टप्पा होता. ही सुरुवात आहे. आम्ही खंडपीठात मुद्देसूद याचिका दाखल केली होती. नालसा जजमेंट, तिसरा महिला आयोग यांनी तृतीयपंथीयांना दिलेल्या सुविधा यांचा उल्लेखही त्यात करण्यात आला होता. त्यामुळे आम्ही न्यायालयातून आमचा हक्क मिळवून दिला. अंजलीचा निवडणुकीचा संघर्ष सुरू झाला. ही संधी आहे हे आमच्या लक्षात आले होते. अंजली या आधीच्या निवडणुकीत फक्त ११ मतांनी पराभूत झाली होती. हा फरक यावेळी पुसून काढण्यासाठी आम्ही मेहनत घेतली. अंजलीने गावकऱ्यांचा विश्वास जिंकला. पुढचा टप्पा हा तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध नोकरभरतींमध्ये आरक्षण मिळवून देण्यावर आहे. जर निवडणुकीसाठी महिला राखीव वॉर्डातून उभे राहता येते. तर महिला राखीव असलेल्या आरक्षणातून देखील नोकरी मिळवता येऊ शकते हे आम्ही सर्वांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. अंजलीने सर्वांसमोर एक आदर्श उभा केला आहे. पुढच्या काळात तिची प्रेरणा घेऊन जळगाव जिल्ह्यातून किमान चार ते पाच तृतीयपंथी हे पोलीस भरती, दोन जण रेल्वे भरतीसाठी प्रयत्न करत आहेत. तर चार जण हे वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये कार्यरत आहे. स्वत: अंजली यांनी देखील विविध संस्थांवर काम केले आहे.

निवडणूक जिंकणाऱ्या अंजली या फक्त आठवी पास आहेत. मात्र त्यांनी दा‌खवलेले धैर्य मात्र अफाट आहे. या पुढच्या वाटचालीबद्दल बोलताना अंजली यांनी सांगितले की, गावाचा विकासाकडे लक्ष देणार आहे. गावातील गटातटाच्या राजकारणात न पडता विकास हेच एकमेव ध्येय असेल. महिलांसाठी शौचालयांचा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. ही निवडणूक जिंकले हा एक भाग झाला. पण माझ्यासारखीच अनेक स्वप्ने असणाऱ्या तृतीयपंथीयांचा लढा हा खूप मोठा आहे. मला माझ्या लढाईतून त्यांच्यासाठी काम करायचे आहे. ’

जळगाव जिल्ह्यात ३०० पेक्षा जास्त तृतीयपंथीय आहेत.