शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

केळीवर तीव्र उन्हाचा प्रकोप

By admin | Updated: April 18, 2017 00:38 IST

रावेर : प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल

रावेर : केळीच्या   माहेरघरातच ग्लोबल वॉर्मिगचे पडसाद म्हणून की काय एप्रिलच्या मध्यातच मे हिट सारख्यच 47 डिग्रीच्या असह्य सनस्ट्रोकने केळीला माहेरात पोरकं करून सोडले आहे.  प्रतिकूल,  असह्य तापमानात केळीची खोडं खाली जमिीवर पडत आहेत. तर फळारूपाला येणारा वा परिपक्व झालेली केळीची घडं निसटून  उत्पादकांची अपरिमित हानी सुरू झाली आहे. सनस्ट्रोकच्या  शॉकचे विपरीत परिणाम तत्क्षणीच दिसणारे नसून कालांतराने केळीबाग उद्ध्वस्त झाल्याचे दृष्टिक्षेपात पडत असल्याने शासनाच्या कृषी विभागाने फळपीक विमा कंपनीला यासंदर्भात पाठपुरावा करून केळी उत्पादकांना त्यांच्या न्यायहक्काचा संरक्षित विमा मिळून देण्यात न्यायाची भूमिका बजवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात              आहे. एकीकडे निर्यातक्षम केळी उत्पादनाचे गोडवे गायिले जात असताना,  एखाद्या गारपिटीच्या तडाख्यालाही लाजवावा असा हा एप्रिल महिन्यांच्या मध्यातील सनस्ट्रोकचा तब्बल 47 सेल्सीअंश डिग्रीच्या तापमानाचा आकाश फाडून केळीला दिला  जाणार तडाखा केळी उत्पादकांना ठिगळ  लावण्यासाठी दुरापास्त ठरल्याने शेतकरीवर्ग कमालीचा चिंताक्रांत झाला आहे.   चैत्रातच वैशाख वणवा पेटवणारी आग सूर्य  मार्च महिन्यांनंतरही आता एप्रिलच्या मध्यातच ओकू लागला आहे.   केळीला प्रतिकूल ठरणा:या 47 सेल्सिअस डिग्री तापमानाची उष्णलहर कालपासून निर्माण झाल्याने केळीच्या माहेरातच बसणारे चटके केळीची प्रचंड हानी करणारे  ठरले आहेत. केळीमालाची बेभावाने होणारी विक्री पाहता नवती केळीचे क्षेत्र साडेअकरा हजार हेक्टर्पयत येऊन ठेपले आहे.  साडेनऊ हजार हेक्टरमधील जुनारी आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.त्या तरी कांदालागवडीतून होणा:या बागांमध्ये अतिउष्ण वा अतिथंड तापमान सहन करण्याची जी सहनशक्ती असते ती मात्र ऊतीसंवंर्धीत केळीबागांमध्ये राहत नसल्याने  ऊतीसंवंर्धीत केळीबागांचे या प्रतिकूल तापमानात मोठय़ा  प्रमाणात नुकसान आहे होत असल्याचे चित्र आहे.    केळीला किमान 40 सेल्सिअस तापमानाची कमाल मर्यादा आहेत. मात्र, एप्रिलच्या मध्यातच सुरू झालेल्या या प्रतिकूल 47 सेल्सिअस तापमानामुळे केळी बागांची कमालीची अपरिमित हानी होणार आहे. ऊतीसंवंर्धीत केळीसह काही महालक्ष्मी वाणाचे केळीबागांचे घड निसटून पडणे, अपरिपक्व अवस्थेतच केळीचे खोड खाली पडून  अध्यार्तून तुटून पडणे वा थेट मुळांची खोड उखडून पडणे असे दुष्परिणाम सनस्ट्रोकच्या तडाख्यात दिसून येत आहेत.त्यामुळे लागवडीपासून ते खोड फळारूपाला येईपावेतो एखाद्या नवजात शिशुप्रमाणे केळीखोडांची काळजी घेतली तरी या अस्मानी व सुल्तानी संकटामुळे  केळी उत्पादक संकटात सापडला आहे.त्या अनुषंगाने केळी फळपीक विमा योजनेंतर्गत तापमानाच्या निकषाधारे शासनाच्या कृषी विभागाने संबंधित फळपीक विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करून निसर्गदत्त न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.                                  (वार्ताहर)