शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

राष्ट्रवादीच्या परिसंवादात शिवसेनेच्या विरोधात सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:30 IST

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परिसंवाद यात्रा घेतली. तीन दिवसात त्यांनी जिल्हा पिंजून काढला. हजारो ...

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परिसंवाद यात्रा घेतली. तीन दिवसात त्यांनी जिल्हा पिंजून काढला. हजारो कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. त्यात त्यांनी जेथे राष्ट्रवादीचे आमदार नाही आणि मित्र पक्षांचे आमदार आहेत. त्या मतदारसंघातही बैठका घेतल्या. कार्यकर्त्यांना पक्ष वाढवण्याच्या सूचना दिल्या. त्यांचा आढावा घेतला. मात्र या दौऱ्यात सूर हा भाजप विरोधी असणे अपेक्षित होते. त्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मुख्य रोख हा भाजप पेक्षा शिवसेनेच्या विरोधातच जास्त असल्याचे या दौऱ्यात जाणवत होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी २०१९ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवावर चर्चा करताना थेट शिवसेनेवरच निशाणा साधला. जळगाव ग्रामीण हा विधानसभा मतदार संघ तसा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि शिवसेनेचे दिग्गज नेते यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे या ठिकाणी अजूनही महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि नेते यांच्यातील टशन कायम आहे. एकमेकांच्या कामांवर फुली मारणे, हेच सध्या सुरू आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. असाच काहीसा प्रकार फैजपूर ता. यावल येथील सभेत घडला. रावेर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आलेले असले तरी ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. त्याच वेळी भर सभेत मंत्री जयंत पाटील यांनी पराभूत उमेदवार रोहिणी खडसे यांना पुढच्या निवडणुकीत निवडून आणण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. फक्त भाजप नको म्हणून हे तीन पक्ष सत्तेत आले आहेत. मात्र एकमेकांच्या मतदार संघात जेथे आमदार आहेत तेथे अशा घोषणा केल्यानंतर त्याच काय पडसाद पडतात. हे येत्या काळातच समोर येईल.