शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

भुसावळ येथे ‘संविधानासमोरील आव्हाने’वर परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 15:21 IST

भुसावळ, जि.जळगाव : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात रविवारी समाज प्रबोधिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे ‘संविधानासमोरील आव्हाने अर्थात अघोषित आणीबाणी’ या ...

ठळक मुद्देविविध क्षेत्रातील मान्यवरांनी घेतला सहभागआज देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती

भुसावळ, जि.जळगाव : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात रविवारी समाज प्रबोधिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे ‘संविधानासमोरील आव्हाने अर्थात अघोषित आणीबाणी’ या विषयावर विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यात प्रा.गौतम निकम, रवींद्र वानखेडे, सिद्धार्थ सोनवणे, भास्कर शेवाळे, मनोहर गायकवाड, उमाकांत तायडे, जितेंद्र भतोडे, संतोष सोनवणे यांनी सहभागी होत अभ्यासपूर्ण मांडणी केली.‘आज भारतात अघोषित आणीबाणी लागू झालेली असून, असुरक्षित वाटू लागले आहे, आज संसदेत कॅबिनेटची अवस्था वाईट आहे, गृहमंत्र्यांना माहिती नाही जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, अर्थमंत्र्यांना देशात निश्चलनीकरण होणार याची माहिती नाही, संरक्षण मंत्र्यांना राफेल विमान कराराची कल्पना नाही, परराष्ट्र मंत्री फक्त ट्विटर वर, सर्वेसर्वा मोदी निर्णय घेणे आणीबाणी हेच होत असते, हुकूमशाही आली आहे.चौथा स्तंभ माध्यमांनी काय दाखवावे हे आरएसएसच्या कार्यालयातून ठरविले जाते, त्यांचे न ऐकल्यास त्याला कायमचे संपविण्यात येते, गेल्या चार वर्षांपासून मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली नाही, माध्यमांची गुलामासारखी अवस्था झाली आहे, पत्रकाराांनी विरोधात आवाज उठविला तर त्याला कायमचे संपविले जाते, जगाचा पोशिंदा शेतकरी, कामगार देशोधडीला लावले, सहकार क्षेत्रा मोडून काढले. संसद फक्त शोभेची वास्तू -कालपर्यंत वर्षातून १८० दिवस संसद चालायची, आज तिथं चर्चा, वादविवाद होत नाही, प्रधानमंत्री उपस्थित राहून स्वत: उत्तर देत नाहीत, गंभीरपणे चर्चा करीत नाही. सर्वोच्च न्यायालयाची अवस्था- चार वरिष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषदेत लोकशाही धोक्यात असल्याचे सांगितले, न्यायाधीश लोहाया हत्या, पात्रता नसलेल्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नियुक्ती संविधान विरोधात आहे. मुस्लीम समाज दहशतीत जीवन जगत आहेत, निवडणूक आयोग सरकारच्या हातातील बाहुले बनवलं आहे, ईव्हीएम मशीनमुळे मोदी पंतप्रधान मंत्री, फडणवीस मुख्यमंत्री झाले, आता गुजरातमध्ये भाजपा पराजित झालेला होता. मात्र ईव्हीएममुळे विजय झाल्याचे दाखविले, ईव्हीएमचा सरकार गैरवापर करीत आहे.रिझर्व्ह बँकेची स्वायत्त सरकार संपविण्यासाठी पराकाष्ठा सुरू आहे, नोटाबंदीसंदर्भात मोदी यांची भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले आहे.गुप्तचर यंत्रणांवर आरएसएसने ताबा घेतला आहे, या यंत्रणांमार्फत विरोधकांना संपविण्यासाठी वापरले जाते.नियोजन आयोग गुंडाळण्यात आला, दारिद्र्य निर्मूलनाच्या विषयाला सोडचिठ्ठी देण्यात आली. मंत्रालय व प्रशासनात समात्तर कारभार करणारे आरएसएसचे प्रतिनिधी नेमण्यात आले, केंद्रात विधी विभागाला बाजुला करुन कायदे लिहिण्यासाठी विशेष नेमणुका करण्यात आल्या. बजेटमध्ये शिक्षण, आरोग्य व बालविकास यावरील तरतुदीत मोठी कपात करण्यात आली.जमीन संपादन कायद्यातील शेतकऱ्यांच्या हिताची कलमे वगळून जमीन अंबानी, अदानी इ सारख्या धनदांडग्या देशी, विदेशी कंपन्यांना देण्यात आल्या.अन्न सुरक्षाविधेयकाला संपविले रेशन व्यवस्था गुंडाळत आली आहे विद्यापीठ अनुदान आयोग संपविण्यात आला ,अनावश्यक हस्तक्षेप, शिष्यवृत्ती चा धोरण त्यातुन रोहित वेमुलाचा बळी,जीएसटी मार्फत देशाला वेठीस धरले, पेट्रोल व डिझेल वर जीएसटी नाही कारण याची मालकी अंबानी ची आहेसंविधान जाळणारे मोकाट मात्र संविधान रक्षणाची शपथ घेणाºया कार्यकत्यांना अटक केली जाते. या सरकारच्या कारकिर्दीत विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी शून्य आहे. नियोजन आयोग संपला, ध्येय शून्य, दहशतवाद्यांचे सहकार्य घेऊन दलित, मुस्लीम यांचे दमण करीत आहे, या सरकारने एकही हॉस्पिटल, विद्यापीठ, सायन्स इंस्टीट्युट उभारण्यात आले नाही,बेरोजगारी कमी करण्यासाठी उद्योगधंदे उभारण्यात आले नाहीतयावरून आपल्या लक्षात येइल कील देश ५० वर्षे मागे गेला आहे. १९७५ मधे आणीबाणी घोषित करण्यात आली होती, मात्र आता अघोषित आणीबाणी सुरू आहे. मौलिक अधिकाराचे दमण होत आहे, अशी भूमिकाही मान्यवरांनी व्यक्त केली.