शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आरटीईच्या पहिल्या फेरीसाठी २६९५ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आरटीईतंर्गत पहिल्या प्रवेश फेरीसाठी जळगाव जिल्ह्यातील २ हजार ६९५ विद्यार्थ्यांची निवड करण्‍यात आली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आरटीईतंर्गत पहिल्या प्रवेश फेरीसाठी जळगाव जिल्ह्यातील २ हजार ६९५ विद्यार्थ्यांची निवड करण्‍यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस पाठविण्‍यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्‍यात आली आहे.

आरटीईतंर्गत राखीव २५ टक्के जागांवर दरवर्षी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असतो. यंदा आरटीईची प्रवेश प्रक्रियेला ३ मार्चपासून प्रारंभ झाली. जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. ३ ते ३० मार्च या कालावधीत जळगाव जिल्ह्यातून ५ हजार ९३९ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते.

७ एप्रिलला निघाली होती सोडत

७ एप्रिल रोजी आरटीईची सोडत काढण्‍यात आली होती. मात्र, या दिवशी शिक्षण विभागाकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्‍यात आली नव्हती. गुरूवारी दुपारी ३ वाजता निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्‍यात आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील २ हजार ६९५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर १ हजार ९६५ विद्यार्थ्यांचा प्रतीक्षा यादीत समावेश आहे.

एसएमएसवर अवलंबून राहू नका

अनेकवेळा पालकांना एसएमएस प्राप्त होत नाही. त्यामुळे पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता, आरटीईच्या पोर्टलवर लॉगिन करून प्रवेशाचा तारखा पाहण्‍याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. तसेच प्रवेशासाठीच्या तारखा सुध्दा एसएमएसद्वारे कळविण्‍यात येणार आहे. तसेच प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीकडे जावू नये असेही शिक्षण विभागाने कळविले आहे.