शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे विक्री नियंत्रणाची भरारी पथके नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

चोपडा : जिल्ह्यात अनधिकृत कापूस बियाण्यांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात झाला. त्यात जी भरारी पथके नियुक्त केली होती ती केवळ ...

चोपडा : जिल्ह्यात अनधिकृत कापूस बियाण्यांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात झाला. त्यात जी भरारी पथके नियुक्त केली होती ती केवळ देखावा ठरत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात फक्त दोन कारवाया झाल्या, हा अपवाद वगळता इतर भागात कुठेही कारवाई सत्र राबवलेले नसल्याची नाराजी शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे.

बियाणे व खते पुरवठासंबंधी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे नियंत्रण असते या विभागात मोहीम अधिकारी हे स्वतंत्र पद अनधिकृत बियाणे खते व कीटकनाशके विक्री व खरेदी यासंबंधी निर्माण केलेले आहे; पण या विभागाकडून कुठेही कारवाई झालेली नाही. गेल्यावर्षीदेखील असाच प्रकार यंदा कापूस बियाण्याचा लाखो रुपयांचा काळाबाजार चोपडा, यावल, रावेर मुक्ताईनगर, जामनेर, अमळनेर, पाचोरा, पारोळा तसेच चाळीसगाव या भागात अजूनही चालू आहे. असे असताना फक्त दोन-तीन कारवाया करायच्या व शांत बसायचे, अशी परिस्थिती कृषी विभागाची आहे. पन्नास अवैध कापूस बियाण्याची पाकिटे मध्यंतरी जप्त केली होती.

कोरोनाचे कारण

कृषी विभागाकडे अनेक प्रलंबित फायली असल्याचे कारण तसेच कोरोनाचे कारण पुढे करून कारवायांना टाळाटाळ करण्यात येत आहे. तालुक्यातील कृषी अधिकारी म्हणतात, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी येत नसल्यामुळे आम्हाला कोणावरच कारवाई करता येत नाही. प्रशासनावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने हे सर्व सुरू आहे. वाहनांची उपलब्धता कमी आहे. त्याची मागणी रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगरमध्ये भरपूर आहे. या बियाण्याचा पुरेसा पुरवठा करून घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे की नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

* * * * * * * * *कृषी यंत्रणेचा कानाडोळा:-

खतांच्या दरात वाढीव विक्रीची प्रकरणे आहेत; पण तक्रारीची प्रतीक्षा कृषी यंत्रणा करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. युरिया दाणेदार खते यांच्यावर लिंकिंगचे आतापासून प्रकार सुरू झाले आहेत. एका कापूस बियाणे निर्मिती कंपनीकडून लिंकिंगचे प्रकरण चालू झाले आहे. ती कंपनी बियाणे वितरकांना लिंकिंगमध्ये देत असल्यामुळे वितरक विक्रेत्यांना लिंकिंग देत आहेत व शेतकऱ्यांनाही ते बियाणे लिंकिंगमध्ये घ्यावे लागत आहे. याकडेही कृषी विभागाचा कानाडोळा आहे. कृषी विभागाने वेळीच या सर्वांवर लक्ष केंद्रित करून आळा घालावा. अशी शेतकरी संघटनेतर्फे मागणी करण्यात येत आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष संजय महाजन, उपजिल्हाध्यक्ष किरण गुजर, सचिन शिंपी चोपडा, अखिलेश पाटील भडगाव, मंगेश राजपूत अमळनेर, खुशाल सोनवणे एरंडोल, जीवन चौधरी यावल, नामदेव महाजन पाचोरा, सय्यद देशमुख जळगाव ग्रामीण, नंदलाल पाटील धानवड आदी उपस्थित होते.

——

दरवर्षी कापूस बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी शासन भरारी पथकांची नियुक्ती करते. मात्र, ही नेमकी भरारी पथके आहेत की वसुली पथके हेच कळत नाही. कारण भरारी पथके नेमून ही काळाबाजार सुरूच असल्याचे लक्षात येत आहे. याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. कृषी विभागाने लवकरात लवकर लिंकिंग करणाऱ्यांवर आळा घालावा नाही तर शेतकरी संघटना आक्रमक पावले उचलणार असल्याचे संदीप पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

-संदीप आधार पाटील,

शेतकरी संघटना माजी जिल्हाध्यक्ष जळगाव