शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

हजार विद्यार्थी क्षमतेच्या वसतीगृहासाठी जळगावात जागेचा शोध घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:12 IST

सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांचे आदेश

ठळक मुद्देयोजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीतआढावा बैठकीत अधिकाºयांची झाडाझडतीकर्जमाफीचा महामंडळांच्या वसुलीवर परिणाम

आॅनलाईन लोकमत,जळगाव, दि.२९- शहर व जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतीगृहाची अडचण येत असल्याने हजार विद्यार्थी क्षमतेच्या वसतीगृहासाठी जळगावात जागा शोधण्याचे आदेश सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी दुपारी साडेचार वाजता अजिंठा विश्रामगृहावर आयोजित सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत महसूल व सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाºयांना दिले. कांबळे यांनी योजना निहाय आढावा घेत अधिकाºयांची झाडाझडती घेतली.बैठकीला आमदार सुरेश भोळे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त खुशाल गायकवाड, जि.प.च्या समाजकल्याण अधिकारी अनिता राठोड, योगेश पाटील, प्रभारी विशेष अधिकारी आर.डी.पवार,  तसेच विविध महामंडळांचे व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंत्री कांबळे यांनी समाज कल्याण विभागाच्या आर्थिक लाभाच्या योजनांचा आढावा घेताना उद्दीष्टापेक्षा कमी मागणीअर्ज आल्याचे तसेच लाभ त्याहून कमी लाभार्थ्यांना मिळाल्याचे आढळून आल्याने अधिकाºयांना धारेवर धरले. आमदार सुरेश भोळे यांनीही या अधिकाºयांकडून आपल्याला माहिती दिली जात नाही. अन्यथा अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ देता आला असता, अशी तक्रार केली. त्यावर मंत्री कांबळे यांनी जिल्हा समाजकल्याण अधिकाºयांनी सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांना विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्याची सूचना केली.वसतीगृहांची घेतली माहितीमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या वसतीगृहाची माहिती कांबळे यांनी घेतली. त्यात जिल्ह्यात एकूण १२ वसतीगृह असून १०१० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची व्यवस्था करण्याची मागणी असते. मात्र या वसतीगृहांची क्षमता केवळ ८३५ असून त्यापैकी ८०२ जागांवर प्रवेश देण्यात आले आहेत. तर उर्वरीत ३३ जागा खास बाब म्हणून भरावयाच्या आहेत, असे सांगितले. त्यावर १५० संख्येने क्षमता कमी असताना अजून इमारत भाड्याने का घेत नाहीत? अशी विचारणा केली. त्यावर स्थानिक ३ वसतीगृह असून त्यांची प्रवेश क्षमता २८० असून केवळ मंत्री कोट्यातील ६ जागा भरणे बाकी असल्याचे सांगितले. तर अमळनेरला मुलींच्या १०० क्षमतेच्या वसतीगृहाची मागणी आहे. मात्र इमारत नाही, असे सांगितले. त्यावर कांबळे यांनी अधिकारी परस्पर जागा शोधतात. महसूल विभागाचे अधिकारी, आमदार, खासदार यांना विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे अडचण येते, अशी नाराजी व्यक्त करीत जिल्हास्तरावर १००० विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह सुरू करण्यासाठी जागेची मागणी करा, तसेच महसूल विभागाने त्यासाठी जागा शोधून द्यावी, असे आदेश दिले.योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीतवसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४३ हजार ते ६० हजार रूपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र त्याची माहितीही लोकप्रतिनिधींना व जनतेला दिली जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. चार दिवसात या निर्णयाची प्रत सर्व आमदार व खासदारांना देण्याचे आदेश दिले. कांबळे म्हणाले की, शासनाच्या गोरगरिबांसाठी योजना आहेत. त्या योजनांसाठी लाभार्थी देखील आहेत. मात्र योजनांची माहितीच त्या लाभार्र्थींपर्यंत पोहोचत नाही.कर्जमाफीचा महामंडळांच्या वसुलीवर परिणामकांबळे यांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती,भटक्या जमाती विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, महाराष्टÑ राज्य अपंग वित्त विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ या मंडळांच्या कामकाजाचा व उद्यीष्यपूर्तीचा आढावा घेतला. अनेक प्रकरणे बँकांकडे प्रलंबित असल्याचे तसेच पत्र दिले तर लाभार्थीची वसुलीची हमी देण्याची मागणी बँका करीत असल्याचे गाºहाणे अधिकाºयांनी मांडले. त्यावर बँका देत नाहीत. कारण महामंडळांची पत उरलेली नाही. हमी घ्या म्हणतात तर घ्या. लाभार्थीला बजावून सांगा, अशा सूचना कांबळे यांनी दिल्या. तसेच शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा महामंडळांच्या कर्जवसुलीवर काही परिणाम झाला आहे का? याची विचारणा केली. त्यावर वसुलीवर २-३ टक्के परिणाम झाला असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.