शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

... तर बोगस आदिवासी शोधाच!

By admin | Updated: December 17, 2015 00:18 IST

आदिवासी वाल्मिकलव्य सेना : 70 किमी पायपीट करून जिल्हाधिका:यांना निवेदन

 

धुळे : जिल्ह्यात बोगस आदिवासी जातीचे दाखले मिरवीत असले तरी ख:या आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळींवर मात्र अन्याय होत आह़े त्यामुळे प्रशासनाने बोगस आदिवासी शोधावे व ख:या आदिवासी कोळी बांधवांना जातीचे दाखले देऊन न्याय द्यावा, अन्यथा मंत्रालयावर पदयात्रा काढावी लागेल, असा इशारा आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी दिला़ 70 किमी पायपीट करून त्यांनी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांना निवेदन सादर करून वस्तुस्थिती मांडली़

पदयात्रेला सुरुवात

अनेक वर्षापासून आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला अनुसूचित जातींच्या हक्कांपासून वंचित ठेवले जात आह़े तर दुसरीकडे बोगस आदिवासींना न्याय दिला जात आह़े त्यामुळे बोगस आदिवासींचा शोध घेऊन प्रशासनाने ख:या आदिवासींना न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिंदखेडा तालुक्यातील साहूर येथून आदिवासी वाल्मीकलव्य सेनेने दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठल़े मंगळवारी पदयात्रेला सुरुवात झाली होती़

अशा आहेत मागण्या़़़

आदिवासींच्या या संघर्ष पदयात्रेला कमलाबाई कन्याशाळेजवळ पोलिसांनी थांबविल़े त्यानंतर 15 पदाधिका:यांनी जिल्हाधिका:यांना निवेदन सादर केल़े या वेळी जिल्हाधिका:यांशी चर्चा करताना शानाभाऊ सोनवणे म्हणाले की, टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र इतर आदिवासींप्रमाणे सोप्या पद्धतीने मिळावेत़ 23 जुलै 2010 ला सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जमाती कल्याण समितीने जो अहवाल सादर केला आहे, तो तत्काळ लागू करावा, केंद्रात जातपडताळणी समिती नाही, म्हणून आदिवासींना त्रासदायक ठरणारी जात पडताळणी समिती तत्काळ रद्द करावी, त्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी या दर्जाच्या स्तरावर स्वतंत्र अधिकारी उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात यावे, संविधानातील हक्क मिळावेत, आदिवासी कोळींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवणा:यांवर गुन्हे दाखल करा, तलाठींमार्फत टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळींच्या जमिनीवर 1966 चे कलम 36 व 36 अ नुसार नोंद घेण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे तंतोतंत पालन करण्यात यावे, राज्यातील काही गावांमध्ये 90 टक्के टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी जमात असताना त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत, त्या त्वरित मिळाव्यात, शासन योजनांचा लाभ आदिवासी कोळी समाजाच्या विद्याथ्र्याना सहजपणे मिळावा आणि 10 ऑगस्ट 2009 ला काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीमार व गोळीबार केला होता, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी या वेळी करण्यात आली़ एकाच राज्यात आदिवासींना दोन कायदे पाळावे लागत आहेत, असेही ते म्हणाल़े

समाजबांधवांना मार्गदर्शन

जिल्हाधिकारी कार्यालयात सोडताना संघटनेच्या पदाधिका:यांची पोलिसांशी किरकोळ शाब्दिक चकमक झाली़ परंतु अखेर 15 जणांना सोडण्यात आल़े जिल्हाधिका:यांना निवेदन सादर केल्यानंतर उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आल़े या वेळी शानाभाऊ सोनवणे यांनी जिल्हाधिका:यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट केल़े त्यानंतर संघर्ष पदयात्रेचा समारोप करण्यात आला़ या संघर्ष यात्रेत शानाभाऊ सोनवणे यांच्यासह मोहन शंखपाळ, पवन सोनवणे, संदीप तायडे, वासुदेव चित्ते, हिलाल वाघ, संजय मगरे, दादाभाऊ बि:हाडे, किशोर बागुल, प्रदीप नवसार, मोतीलाल सोनवणे, भास्कर कुवर, पीतांबर देवरे, विनायक कोळी, भैया जाधव, नितीन आखडमल, इंदूताई सोनीस, नामदेव येळवे, मोहन कोळी, ज्ञानेश्वर कोळी, राजू कोळी, वानुबाई शिरसाठ आदी उपस्थित होत़े या पाश्र्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता़