शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

... तर बोगस आदिवासी शोधाच!

By admin | Updated: December 17, 2015 00:18 IST

आदिवासी वाल्मिकलव्य सेना : 70 किमी पायपीट करून जिल्हाधिका:यांना निवेदन

 

धुळे : जिल्ह्यात बोगस आदिवासी जातीचे दाखले मिरवीत असले तरी ख:या आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळींवर मात्र अन्याय होत आह़े त्यामुळे प्रशासनाने बोगस आदिवासी शोधावे व ख:या आदिवासी कोळी बांधवांना जातीचे दाखले देऊन न्याय द्यावा, अन्यथा मंत्रालयावर पदयात्रा काढावी लागेल, असा इशारा आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी दिला़ 70 किमी पायपीट करून त्यांनी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांना निवेदन सादर करून वस्तुस्थिती मांडली़

पदयात्रेला सुरुवात

अनेक वर्षापासून आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला अनुसूचित जातींच्या हक्कांपासून वंचित ठेवले जात आह़े तर दुसरीकडे बोगस आदिवासींना न्याय दिला जात आह़े त्यामुळे बोगस आदिवासींचा शोध घेऊन प्रशासनाने ख:या आदिवासींना न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिंदखेडा तालुक्यातील साहूर येथून आदिवासी वाल्मीकलव्य सेनेने दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठल़े मंगळवारी पदयात्रेला सुरुवात झाली होती़

अशा आहेत मागण्या़़़

आदिवासींच्या या संघर्ष पदयात्रेला कमलाबाई कन्याशाळेजवळ पोलिसांनी थांबविल़े त्यानंतर 15 पदाधिका:यांनी जिल्हाधिका:यांना निवेदन सादर केल़े या वेळी जिल्हाधिका:यांशी चर्चा करताना शानाभाऊ सोनवणे म्हणाले की, टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र इतर आदिवासींप्रमाणे सोप्या पद्धतीने मिळावेत़ 23 जुलै 2010 ला सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जमाती कल्याण समितीने जो अहवाल सादर केला आहे, तो तत्काळ लागू करावा, केंद्रात जातपडताळणी समिती नाही, म्हणून आदिवासींना त्रासदायक ठरणारी जात पडताळणी समिती तत्काळ रद्द करावी, त्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी या दर्जाच्या स्तरावर स्वतंत्र अधिकारी उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात यावे, संविधानातील हक्क मिळावेत, आदिवासी कोळींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवणा:यांवर गुन्हे दाखल करा, तलाठींमार्फत टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळींच्या जमिनीवर 1966 चे कलम 36 व 36 अ नुसार नोंद घेण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे तंतोतंत पालन करण्यात यावे, राज्यातील काही गावांमध्ये 90 टक्के टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी जमात असताना त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत, त्या त्वरित मिळाव्यात, शासन योजनांचा लाभ आदिवासी कोळी समाजाच्या विद्याथ्र्याना सहजपणे मिळावा आणि 10 ऑगस्ट 2009 ला काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीमार व गोळीबार केला होता, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी या वेळी करण्यात आली़ एकाच राज्यात आदिवासींना दोन कायदे पाळावे लागत आहेत, असेही ते म्हणाल़े

समाजबांधवांना मार्गदर्शन

जिल्हाधिकारी कार्यालयात सोडताना संघटनेच्या पदाधिका:यांची पोलिसांशी किरकोळ शाब्दिक चकमक झाली़ परंतु अखेर 15 जणांना सोडण्यात आल़े जिल्हाधिका:यांना निवेदन सादर केल्यानंतर उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आल़े या वेळी शानाभाऊ सोनवणे यांनी जिल्हाधिका:यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट केल़े त्यानंतर संघर्ष पदयात्रेचा समारोप करण्यात आला़ या संघर्ष यात्रेत शानाभाऊ सोनवणे यांच्यासह मोहन शंखपाळ, पवन सोनवणे, संदीप तायडे, वासुदेव चित्ते, हिलाल वाघ, संजय मगरे, दादाभाऊ बि:हाडे, किशोर बागुल, प्रदीप नवसार, मोतीलाल सोनवणे, भास्कर कुवर, पीतांबर देवरे, विनायक कोळी, भैया जाधव, नितीन आखडमल, इंदूताई सोनीस, नामदेव येळवे, मोहन कोळी, ज्ञानेश्वर कोळी, राजू कोळी, वानुबाई शिरसाठ आदी उपस्थित होत़े या पाश्र्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता़