शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

नापिकीकरण थांबवण्यासाठी शास्त्रशुद्ध भूजल व्यवस्थापन अभ्यास ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:12 IST

जळगाव : खान्देशातील शेतजमीन नापिकीकरण थांबवण्यात आणि ग्रामीण भागातील दुष्काळ निवारणसंबंधी शास्त्रशुद्ध भूजल व्यवस्थापन अभ्यास ही काळाची गरज असल्याचे ...

जळगाव : खान्देशातील शेतजमीन नापिकीकरण थांबवण्यात आणि ग्रामीण भागातील दुष्काळ निवारणसंबंधी शास्त्रशुद्ध भूजल व्यवस्थापन अभ्यास ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र प्रशाळेतील समन्वयक डॉ.एस.एन.पाटील यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ जिऑलॉजीस्ट ॲण्ड हैड्रोजिओलॉजीस्ट(जियो-फोरम) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दुष्काळातून मुक्ततेसाठी भूविज्ञानाचे महत्त्व, या विषयावर राष्ट्रीयस्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय वाळवंट आणि दुष्काळ जागरुकता दिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या वेबिनारचे उद्‌घाटन विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे निदेशक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, हवामान शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद मुजुमदार आणि जियो फोरमचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला प्रा.बी.व्ही.पवार यांनी उद्‌घाटन करताना भूजल संवर्धन ही जनचळवळ व्हावी, असे मत व्यक्त केले.

भूविज्ञानाचा प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे

गुजरात येथील भूजल विद्यापीठातील भूशास्त्रज्ञ प्रा.महेश ठक्कर यांनी कच्छ वाळवंटात पाणी टंचाई कमी करण्यात भूशास्त्रज्ञ आणि पर्यावरणप्रेमी यांनी मोलाची भूमिका बजावली, असे सांगितले. जियो-फोरमचे उपाध्यक्ष प्रा.अशोक तेजनकर यांनी राष्ट्रीय स्तरावरील वाळवंटीकरण रोखण्यासाठी व दुष्काळातून मुक्त होण्यासाठी भूविज्ञानाचा प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे आहे, असे आवाहन केले. जियो-फोरमेच संस्थापक सचिव डॉ.पी.एस.कुलकर्णी आणि बेविनारचे उपसमन्वयक प्रा.एस.टी.इंगळे यांनी पर्यावरण संशोधनाबाबत विचार मांडले. डॉ.वि.मा.रोकडे यांनी आभार तर डॉ.एस.बी.अत्तरदे यांनी सूत्रसंचालन केले. या वेबिनारमध्ये १०७ जणांनी सहभाग घेतला.