शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

नापिकीकरण थांबवण्यासाठी शास्त्रशुद्ध भूजल व्यवस्थापन अभ्यास ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:12 IST

जळगाव : खान्देशातील शेतजमीन नापिकीकरण थांबवण्यात आणि ग्रामीण भागातील दुष्काळ निवारणसंबंधी शास्त्रशुद्ध भूजल व्यवस्थापन अभ्यास ही काळाची गरज असल्याचे ...

जळगाव : खान्देशातील शेतजमीन नापिकीकरण थांबवण्यात आणि ग्रामीण भागातील दुष्काळ निवारणसंबंधी शास्त्रशुद्ध भूजल व्यवस्थापन अभ्यास ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र प्रशाळेतील समन्वयक डॉ.एस.एन.पाटील यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ जिऑलॉजीस्ट ॲण्ड हैड्रोजिओलॉजीस्ट(जियो-फोरम) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दुष्काळातून मुक्ततेसाठी भूविज्ञानाचे महत्त्व, या विषयावर राष्ट्रीयस्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय वाळवंट आणि दुष्काळ जागरुकता दिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या वेबिनारचे उद्‌घाटन विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे निदेशक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, हवामान शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद मुजुमदार आणि जियो फोरमचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला प्रा.बी.व्ही.पवार यांनी उद्‌घाटन करताना भूजल संवर्धन ही जनचळवळ व्हावी, असे मत व्यक्त केले.

भूविज्ञानाचा प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे

गुजरात येथील भूजल विद्यापीठातील भूशास्त्रज्ञ प्रा.महेश ठक्कर यांनी कच्छ वाळवंटात पाणी टंचाई कमी करण्यात भूशास्त्रज्ञ आणि पर्यावरणप्रेमी यांनी मोलाची भूमिका बजावली, असे सांगितले. जियो-फोरमचे उपाध्यक्ष प्रा.अशोक तेजनकर यांनी राष्ट्रीय स्तरावरील वाळवंटीकरण रोखण्यासाठी व दुष्काळातून मुक्त होण्यासाठी भूविज्ञानाचा प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे आहे, असे आवाहन केले. जियो-फोरमेच संस्थापक सचिव डॉ.पी.एस.कुलकर्णी आणि बेविनारचे उपसमन्वयक प्रा.एस.टी.इंगळे यांनी पर्यावरण संशोधनाबाबत विचार मांडले. डॉ.वि.मा.रोकडे यांनी आभार तर डॉ.एस.बी.अत्तरदे यांनी सूत्रसंचालन केले. या वेबिनारमध्ये १०७ जणांनी सहभाग घेतला.