शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

शाळा बंद असल्याने मुलांसाेबतच पालकांचे मानसिक आराेग्य बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काेराेना संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुले, मुली घरी बसले ...

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : काेराेना संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुले, मुली घरी बसले आहेत. दरम्यान, घरी राहून त्यांना कंटाळा आला असून मुला-मुलींचा खाेडकरपणा व चिडचिडेपणा वाढला आहे. याचा परिणामही पालकांच्या मानसिक आराेग्यावर हाेत आहे.

काेराेना संंसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असून प्राथमिक वर्ग ऑनलाइन भरत आहेत. विद्यार्थी घरीच राहत असून त्यांचे माेबाइल हाताळणे व टीव्ही पाहण्याचे प्रकार वाढले आहेत. पालकांच्या कामात व्यत्यय आणला जात असल्याने पालकही चिडचिड करीत आहेत. एकूणच शाळा बंदमुळे काही शाळकरी मुलांसाेबतच अनेक पालकांचेही मानसिक आराेग्य बिघडल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुक्त गावांमधील शाळा सुरू आहेत. मात्र, शहरातील शाळा, महाविद्यालये कधी उघडणार, ही प्रतीक्षा सर्वांना लागून आहे.

- मुलांच्या समस्या...

घरी राहावे लागत असल्याने एकलकाेंडेपणा वाढला.

चिडचिडेपणा व खाेडकरपणा वाढला.

हट्टीपणा पूर्वीपेक्षा अधिक वाढल्याचे दिसून येते.

पालकांचे म्हणणे ऐकून न घेता मनमर्जीने वागणे.

- पालकांच्या समस्या...

घरी असलेले शाळकरी मुले त्रास देत असल्याने पालकांचेही वर्तन बदलले आहे.

पालकांच्या वर्तनात चिडचिड व आक्रमकपणा वाढला आहे.

घरच्या कामात मुले हस्तक्षेप करत असल्याने आई-वडिलांवर ताणतणाव येत आहेत.

अशा कराव्या उपाययाेजना

काेराेना संकटामुळे शाळा बंद असून विद्यार्थी घरी बसले आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून दिल्यास मुले, मुलींचे वर्तन चांगले राहण्यास मदत हाेईल. गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी घरी राहत असल्याने शाळेतून मिळणाऱ्या विविध कला काैशल्यापासून ते वंचित आहेत. अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या पाल्यांना चित्रकला व विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे जेणेकरून विद्यार्थी आपल्या कामात व्यस्त राहतील. पालक व विद्यार्थी आपापल्या ठिकाणी व्यस्त राहिल्यास दाेघांचेही मानसिक आराेग्य निराेगी राहण्यास नक्कीच मदत हाेते. त्यादृष्टीने पालकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कोरोनामुळे मुलांना मित्र-मैत्रींमध्ये खेळायला जाता येत नाही. दुसरीकडे पालकांना सुद्धा आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे पालकांना शिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी मुलांना पुरवता येत नाहीत. पालक चिंचेत असल्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे पालकांनी जास्त वेळ मुलांमध्ये घालवायला हवा. मुले कुठल्या गोष्टीमध्ये रमतील ते करायला हवे. मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांच्यात जे गुण आहेत, त्याच्याबद्दल प्रोत्साहन दिले जावे. जेणेकरून मुले त्या गोष्टींमध्ये रमतील. मुलांना कौतुक आणि शाबासकीची थाप पालकांनी द्यावी, त्यामुळे मुलांचा चिडचिडेपणा कमी होईल.

- डॉ. प्रदीप जोशी, मानसोपचारतज्ज्ञ

वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली : ७६५१४

दुसरी : ७९३१३

तिसरी : ७७९१८

चौथी : ८००५०

पाचवी : ७८८२८

सहावी : ७७३११

सातवी : ७७६७७

आठवी : ७६३८५

नववी : ७६३५८

दहावी : ५८३१७