शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

कोरोनामुक्त गावांमधील शाळांच्या घंटा आज वाजणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST

चाळीसगाव : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांची टाळेबंदी हटणार असून घंटा वाजणार आहे. कोरोनामुक्त ...

चाळीसगाव : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांची टाळेबंदी हटणार असून घंटा वाजणार आहे. कोरोनामुक्त गावांमधील शाळा सरपंचांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिल्यानंतरच उघडण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील शाळा उघडण्याचा मार्ग काहीअंशी मोकळा झाला आहे. तथापि, शहरी भागातील शाळांची टाळेबंदी मात्र अजूनही कायम आहे.

जिल्हाभरात ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या १ लाख ६८ हजार ६७० विद्यार्थ्यांना शाळांची घंटा वाजण्याचे औत्सुक्य आहे.

गेल्या १६ महिन्यांपासून सार्वजनिक टाळेबंदीनंतर शाळांनाही कुलपे लागली होती. जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षदेखील ऑनलाईनच सुरू झाले. गेल्या वर्षात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शहरी व ग्रामीण भागात कुचकामी ठरल्याची शेकडो उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला गेला. १० वी व १२ वीच्या बोर्ड परीक्षा रद्द झाल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमधीलच इयत्ता आठवी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मोठी उत्सुकता आहे. ग्रामपंचायत स्तरावर ठराव झाल्यानंतरच शाळा सुरू होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

चौकट

तिसऱ्यांदा शाळांच्या घंटा वाजविण्याचा प्रयत्न

टाळेबंदीत पहिल्यांदा २७ नोव्हेंबर २०२० रोजी नववी ते १२ वीपर्यंतच्या शाळा उघडण्यात आल्या. यानंतर २७ जानेवारी २०२१ रोजी पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू केले गेले.

१. १५ एप्रिल २०२१ पासून पुन्हा लॉकडाऊन लागल्यानंतर या शाळाही बंद करण्यात आल्या.

२. कोरोना महामारीत गत १६ महिन्यांच्या काळात तिसऱ्यांदा शाळा सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे.

होतील आजपासून शाळा

१. ग्रामीण भागातील ज्या गावांत शाळा उघडली जाईल, तिथे शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी एक महिन्याआधी कोरोना रुग्ण आढळलेला असावा. गाव कोरोनामुक्त असेल, तरच शाळेची घंटा वाजेल.

२ अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे आवश्यक आहे.

३ शाळा परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी पालकांना प्रवेश दिला जाणार नाही.

४. विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून उपचार सुरू करावेत. परिसर निर्जंतुकीकरण करावा.

५. शाळा टप्प्या-टप्प्याने सुरू कराव्यात. एका बाकावर एकाच विद्यार्थ्याची बसण्याची व्यवस्था असावी.

६. वर्गात १ ते २० विद्यार्थ्यांनाच बोलवावे. शाळा सकाळ व दुपार सत्र यापैकी सोयीनुसार भरवावी. दोन बाकांमध्ये सहा फुटाचे अंतर असावे. नियमित हात धुण्यासह मास्क वापरण्याच्या सूचना द्याव्यात.

महत्त्वाची चौकट

चाळीसगावला सुरू होणार ५ शाळा

चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील एकूण ८६ पैकी ५ शाळा सुरू करण्याचे ठराव झाले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर गठित केलेल्या समितीने सर्व आढावा घेऊन पालकांच्या संमतीने शाळा सुरू करण्याचे ठराव केले आहेत. गुरुवारपासून या ५ शाळांच्या घंटा वाजणार असून कोरोनाबाबत सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्याध्यापक व शिक्षकांना दिल्या आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

चौकट

जिल्हाभरात ग्रामीण भागात १ लाख ६८ हजार ६७० विद्यार्थी

तालुकानिहाय शाळा, विद्यार्थी व शिक्षक संख्या अशी :

तालुका शाळा विद्यार्थी शिक्षक

अमळनेर ६. ९५६९ ६६९

भडगाव ३५ १०४३७ ५३५

भुसावळ ३२ ९८४८ ५०९

बोदवड १६ ५६३१ २४७

चाळीसगाव ९१ १८२३८ १०९६

चोपडा ४. १२७७८ ६३१

धरणगाव ४. ६६१८ ४३९

एरंडोल ३१ ६०११ ३६३

जळगाव ५. १३२०७ ७५५

जामनेर ५. १५८५१ ७३९

मुक्ताईनगर ३१ १०७८८ ४७३

पाचोरा ५. १५३८९ ८१३

पारोळा ४. ९२०१ ४६७

रावेर ५. १३२८२ ६४४

यावल ५. ११८१२ ६६५

७०८ १६८६७० ९०४५