शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जाती आरक्षणातही प्रवर्ग लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 13:41 IST

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची मागणी: समाज प्रबोधन संवाद यात्रा दाखल

ठळक मुद्देबहुजन रयत परिषदेतर्फे राज्यभरात जाणार यात्रामुलांना मिरवणुकीने शाळेत घालाआरक्षणात लोकसंख्येच्या आधारे अ, ब, क व ड प्रवर्ग लागू करावा

आॅनलाईन लोकमत, जळगाव, दि.११- अनुसूचित जातीमध्ये भटक्या विमुक्तांप्रमाणे आरक्षणात लोकसंख्येच्या आधारे अ, ब, क व ड प्रवर्ग लागू करावा, जेणे करून आरक्षणातही वंचित राहिलेल्या मातंग समाजाला योग्य न्याय व संधी मिळेल, अशी मागणी माजी मंत्री तसेच बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांनी शुक्रवारी सकाळी पद्मालय विश्रामगृहावर आयोजित पत्रपरिषदेत बोलताना केली.अण्णाभाऊ साठेजयंतीनिमित्त बहुजन रतय परिषदेतर्फे राज्यभरात काढण्यात काढलेल्या वाटेगाव ते चिरागनगर समाज प्रबोधन संवाद यात्रेचे जळगावात आगमन झाले. त्यानिमित्त या पत्रपरिषदेचे आयोजन केले होते. ढोबळे म्हणाले की, मंदाकृष्ण मादिगांनी देशभरात सुरू केलेली सामाजिक चळवळ विचारात घेऊन अनुसूचित जातीमध्ये देखील भटक्या विमुक्तांप्रमाणे अ, ब, क, ड प्रवर्ग लागू करावा अशी अवघ्या उपेक्षित पोटजातीची अपेक्षा आहे. राज्यभरात एकट्या मातंग समाजात ३०० संघटना असून दलित समाजातील प्रमुख ५ पोटजातीमध्ये अशीच मतभेदाची दारूण अवस्था आहे. अनुसूचीत जातीच्या ५९ जातीमधील ५२ उपेक्षित जाती अशा आहेत की त्यांना सवलती कशाशी खातात हे देखील माहित नाही. अशा उपेक्षित जातींना सवलतींचा प्रत्यक्ष लाभ मिळायचा असेल तर अ,ब, क, ड असा प्रवर्ग लागू करणे आवश्यक आहे. राज्यात दलित समाजाची लोकसंख्या १ कोटी ३० लाख आहे. त्यात बौद्ध समाजाची लोकसंख्या ६५ लाख आहे. त्यांना ‘अ’ वर्ग द्यावा. मातंग समाजाची लोकसंख्या २८ लाख आहे. त्यांना ‘ब’ वर्ग द्यावा. तर मोची, कोलार, चर्मकार व ढोर या चार जातींना ‘क’ वर्ग तर ११ ते १२ लाख लोकसंख्या असलेल्या उर्वरीत ५२ जातींना ‘ड’ वर्ग द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. ते म्हणाले की, मातंग समाजात तसेच अन्य मागास समाजात शिक्षण, आरोग्य, अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती या चार मुद्यांवर संवाद साधून प्रबोधन करण्यासाठी ही संवाद यात्रा काढली आहे. दररोज वाड्या, वस्त्यांवर किमान ६ सभा घेतो, कार्यकर्त्यांशी चर्चा करतो, असे सांगितले. मुलांना मिरवणुकीने शाळेत घाला ढोबळे म्हणाले की, शिक्षणाचे महत्व समजून घेतले पाहिजे. आपली मुल मिरवणुकीने पहिलीच्या शाळेत घालणे हा अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त केलेला संकल्प आहे. आरोग्य, शिक्षण, बचतगट यात पुढाकार घेण्यासाठी प्रयत्न करणे हा जयंतीनिमित्त आखलेला कार्यक्रम आहे. गावात बौद्धांची चार घर असली तरी गाव दचकून राहत. मातंग समाजाला मात्र गृहित धरल जात. नोकरी, धंदा, आरक्षणाला सवलत हवी असेल तर बौद्धांच किंवा बौद्ध धर्माच्या लोकांच अनुकरण करा, असा समाजबांधवांना सल्ला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष मोहन चव्हाण, संवाद यात्रेचे उत्तर महाराष्टÑ समन्वयक रविंद्र वाकळे, जळगावचे ज्ञानेश्वर सुरवाडे, राजस कोतवाल आदी उपस्थित होते.