शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

अनुसूचित जाती आरक्षणातही प्रवर्ग लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 13:41 IST

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची मागणी: समाज प्रबोधन संवाद यात्रा दाखल

ठळक मुद्देबहुजन रयत परिषदेतर्फे राज्यभरात जाणार यात्रामुलांना मिरवणुकीने शाळेत घालाआरक्षणात लोकसंख्येच्या आधारे अ, ब, क व ड प्रवर्ग लागू करावा

आॅनलाईन लोकमत, जळगाव, दि.११- अनुसूचित जातीमध्ये भटक्या विमुक्तांप्रमाणे आरक्षणात लोकसंख्येच्या आधारे अ, ब, क व ड प्रवर्ग लागू करावा, जेणे करून आरक्षणातही वंचित राहिलेल्या मातंग समाजाला योग्य न्याय व संधी मिळेल, अशी मागणी माजी मंत्री तसेच बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांनी शुक्रवारी सकाळी पद्मालय विश्रामगृहावर आयोजित पत्रपरिषदेत बोलताना केली.अण्णाभाऊ साठेजयंतीनिमित्त बहुजन रतय परिषदेतर्फे राज्यभरात काढण्यात काढलेल्या वाटेगाव ते चिरागनगर समाज प्रबोधन संवाद यात्रेचे जळगावात आगमन झाले. त्यानिमित्त या पत्रपरिषदेचे आयोजन केले होते. ढोबळे म्हणाले की, मंदाकृष्ण मादिगांनी देशभरात सुरू केलेली सामाजिक चळवळ विचारात घेऊन अनुसूचित जातीमध्ये देखील भटक्या विमुक्तांप्रमाणे अ, ब, क, ड प्रवर्ग लागू करावा अशी अवघ्या उपेक्षित पोटजातीची अपेक्षा आहे. राज्यभरात एकट्या मातंग समाजात ३०० संघटना असून दलित समाजातील प्रमुख ५ पोटजातीमध्ये अशीच मतभेदाची दारूण अवस्था आहे. अनुसूचीत जातीच्या ५९ जातीमधील ५२ उपेक्षित जाती अशा आहेत की त्यांना सवलती कशाशी खातात हे देखील माहित नाही. अशा उपेक्षित जातींना सवलतींचा प्रत्यक्ष लाभ मिळायचा असेल तर अ,ब, क, ड असा प्रवर्ग लागू करणे आवश्यक आहे. राज्यात दलित समाजाची लोकसंख्या १ कोटी ३० लाख आहे. त्यात बौद्ध समाजाची लोकसंख्या ६५ लाख आहे. त्यांना ‘अ’ वर्ग द्यावा. मातंग समाजाची लोकसंख्या २८ लाख आहे. त्यांना ‘ब’ वर्ग द्यावा. तर मोची, कोलार, चर्मकार व ढोर या चार जातींना ‘क’ वर्ग तर ११ ते १२ लाख लोकसंख्या असलेल्या उर्वरीत ५२ जातींना ‘ड’ वर्ग द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. ते म्हणाले की, मातंग समाजात तसेच अन्य मागास समाजात शिक्षण, आरोग्य, अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती या चार मुद्यांवर संवाद साधून प्रबोधन करण्यासाठी ही संवाद यात्रा काढली आहे. दररोज वाड्या, वस्त्यांवर किमान ६ सभा घेतो, कार्यकर्त्यांशी चर्चा करतो, असे सांगितले. मुलांना मिरवणुकीने शाळेत घाला ढोबळे म्हणाले की, शिक्षणाचे महत्व समजून घेतले पाहिजे. आपली मुल मिरवणुकीने पहिलीच्या शाळेत घालणे हा अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त केलेला संकल्प आहे. आरोग्य, शिक्षण, बचतगट यात पुढाकार घेण्यासाठी प्रयत्न करणे हा जयंतीनिमित्त आखलेला कार्यक्रम आहे. गावात बौद्धांची चार घर असली तरी गाव दचकून राहत. मातंग समाजाला मात्र गृहित धरल जात. नोकरी, धंदा, आरक्षणाला सवलत हवी असेल तर बौद्धांच किंवा बौद्ध धर्माच्या लोकांच अनुकरण करा, असा समाजबांधवांना सल्ला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष मोहन चव्हाण, संवाद यात्रेचे उत्तर महाराष्टÑ समन्वयक रविंद्र वाकळे, जळगावचे ज्ञानेश्वर सुरवाडे, राजस कोतवाल आदी उपस्थित होते.