शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

शासकीय योजनेचे धान्य व्यावसायिकांच्या तराजूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:16 IST

एरंडोल : शासकीय योजनांतर्गत रेशन दुकानांवर मोठ्या प्रमाणात अन्न-धान्य मोफत किंवा माफक दरात लाभार्थ्यांना दिले जात असते, मात्र शहर ...

एरंडोल : शासकीय योजनांतर्गत रेशन दुकानांवर मोठ्या प्रमाणात अन्न-धान्य मोफत किंवा माफक दरात लाभार्थ्यांना दिले जात असते, मात्र शहर व तालुक्यातील अनेक जण हे धान्य घेऊन सरळ व्यावसायिकांना विकत असल्याचा प्रकार सुरू असून, शासकीय यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्षच होत आहे. गोरगरीब जनतेला मूळ प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. पंतप्रधान गरीब कल्याण योजना ही त्यापैकी एक योजना गोरगरिबांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा कुटुंबातील सदस्य निहाय प्रति सदस्य पाच किलो धान्य मोफत दिले जात आहे. त्यात तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ समाविष्ट आहेत.

धान्यांची दुकानदारांना विक्री

काही लाभार्थ्यांना मोफत मिळालेले धान्य किराणा दुकानदारांना दहा रुपये किलो प्रमाणे विकले जात असल्याचा अफलातून प्रकार होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. गरजू व गोरगरीब लोकांसाठी असलेल्या या योजनेची फलश्रुती जर अशा प्रकारे होत असेल तर त्याला काय म्हणावे, याबाबत संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. मोफत धान्य विकणारे लाभार्थी व विकत घेणारे व्यापारी या दोन्ही घटकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

अंत्योदयचे सहा हजारांवर कार्डधारक

एरंडोल तालुक्यात प्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत सहा हजार ६० अंत्योदय कार्डाचे सुमारे २५ हजार लाभार्थी संख्या आहे. या लाभार्थ्यांना सदस्यनिहाय मोफत धान्य स्वस्त धान्य दुकानदारांद्वारे दिले जाते. तसेच याच लाभार्थ्यांना हेच धान्य तीन रुपये किलो तांदूळ दोन रुपये किलो गहू अशा रास्त भावात स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरित केले जाते. अशाप्रकारे एका योजनेतून मोफत मिळणारे धान्य व दुसऱ्या योजनेतून रास्त भावात मिळणारे धान्य हे मिळत असल्यामुळे लाभार्थीच आता धान्य विक्रेते झाले की काय असे बोलले जात आहे. तसेच प्राधान्य कुटुंब सदस्य संख्या ८९ हजार ४२५ आहे. या सदस्यांना सुद्धा रास्त भावात गहू व तांदूळ स्वस्त धान्य दुकानामार्फत दिला जातो. लाभार्थ्यांकडून धान्य विक्री विक्रीच्या प्रकाराला आळा बसावा म्हणून धान्य विकणारे लाभार्थी व त्यांच्याकडून धान्य विकत घेणारे व्यापारी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

विशेष हेकी मोफत मिळालेले धान्य लाभार्थ्यांकडून बाहेर विकले जाते हा प्रकार उघड उघड सुरू असून, विविध स्तरांवरील लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी या सर्वांना माहिती आहे, परंतु मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? अशी स्थिती येथे आहे. विशेष म्हणजे शासकीय अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात बाहेरचे बाब आहे असे समजून दुर्लक्ष करताना दिसतात.