शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता भाजपची तरीही शिवसेना नगरसेवकांच्या वाॅर्डातून योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:30 IST

जळगाव : जळगाव महापालिकेत सत्ता भाजपची आहे. अमृत योजनेचा शुभारंभ ज्या वाॅर्डातून होत आहे त्या वाॅर्डात दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे ...

जळगाव : जळगाव महापालिकेत सत्ता भाजपची आहे. अमृत योजनेचा शुभारंभ ज्या वाॅर्डातून होत आहे त्या वाॅर्डात दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे आहेत. तरीही आम्ही भेदभाव न करता योजनेचा शुभारंभ करीत आहोत. सेना व भाजपचे नगरसेवक या ठिकाणी असल्याने युती असल्यासारखे वाटतेय. भविष्यात काय दडलंय हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे भविष्यात सेना व भाजपची पुन्हा युती होऊ शकते, असे सूतोवाच माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सुप्रीम काॅलनीत शनिवारी अमृत योजनेतंर्गत नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या शुभारंभावेळी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात राजकीय टोलेबाजी रंगली.

आमदार गिरीश महाजन उवाच..

१) सुप्रीम कॉलनीत शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. भाजपचा एकही नगरसेवक नाही. मनपात ६० नगरसेवक भाजपचे तर १५ नगरसेवक शिवसेनेचे आहेत. मात्र, तरीदेखील आम्ही भेदभाव न करता शिवेसना नगरसेवकांच्या वाॅर्डातून अमृतच्या पाणी पुरवठ्याचा शुभारंभ करीत आहोत. हे महाराष्ट्रातील अत्यंत आदर्श उदाहरण आहे. मात्र राज्यस्तरावर असा मोठेपणा दाखविला जात नाही.

२) जळगाव शहराच्या विकासासाठी कोरोना काळातही भाजप व शिवसेना नगरसेवक अशा सर्वांनासोबत घेऊन काम करीत आहोत.

३)आजही विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेत आम्हाला राष्ट्र‌वादी अन् काँग्रेस दिसत आहे.

४) गुलाब भाऊ जे खरे आहे, तेच आम्हाला सांगा.. काहीही बोलू नका, कारण एकदा का तुमची बॅटरी सुरू झाली की, तुम्ही आवरले जात नाहीत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील उवाच...

१) गिरीश महाजन यांनी मनपात कशा पद्धतीने सत्ता घेतली. इतका मोठा नगरसेवकांचा आकडा कसा गाठला, हे आपल्याला माहिती आहे.

२) गिरीश महाजन नसते, तर भाजपला मनपात १५ जागाही मिळाल्या नसत्या.

३) आमच्याकडे जर रसद पुरविली असती, तर आम्हीही चांगल्या जागा मिळविल्या असत्या.

४) वाघूरचे पाणी हे जामनेर मतदारसंघातून येत असले तरी ते जळगाव ग्रामीण मतदारसंघातून वाहत असते. जर आमचे पाणी तुमच्या धरणात आले नाही, तर तुमचे धरण कसे भरणार.

५)गेल्या वेळी तुमच्याकडे जलसंपदा खाते होते. म्हणजे पाणीवालेच होते. आता मी पण पाणीवालाच आहे. फरक इतकाच आहे, की तुम्ही चारी वाटे पाणी देत होते आणि आम्ही पाईपावाटे पाणी देत आहोत.

६) राज्यात सेना व भाजपची युती झाली असती तर भाजपने जळगाव महापालिकेत सत्ता आल्यानंतर आमच्यासोबत ‘लव्ह मॅरेज’ केलं असते.