शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सत्ता भाजपची तरीही शिवसेना नगरसेवकांच्या वाॅर्डातून योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:30 IST

जळगाव : जळगाव महापालिकेत सत्ता भाजपची आहे. अमृत योजनेचा शुभारंभ ज्या वाॅर्डातून होत आहे त्या वाॅर्डात दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे ...

जळगाव : जळगाव महापालिकेत सत्ता भाजपची आहे. अमृत योजनेचा शुभारंभ ज्या वाॅर्डातून होत आहे त्या वाॅर्डात दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे आहेत. तरीही आम्ही भेदभाव न करता योजनेचा शुभारंभ करीत आहोत. सेना व भाजपचे नगरसेवक या ठिकाणी असल्याने युती असल्यासारखे वाटतेय. भविष्यात काय दडलंय हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे भविष्यात सेना व भाजपची पुन्हा युती होऊ शकते, असे सूतोवाच माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सुप्रीम काॅलनीत शनिवारी अमृत योजनेतंर्गत नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या शुभारंभावेळी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात राजकीय टोलेबाजी रंगली.

आमदार गिरीश महाजन उवाच..

१) सुप्रीम कॉलनीत शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. भाजपचा एकही नगरसेवक नाही. मनपात ६० नगरसेवक भाजपचे तर १५ नगरसेवक शिवसेनेचे आहेत. मात्र, तरीदेखील आम्ही भेदभाव न करता शिवेसना नगरसेवकांच्या वाॅर्डातून अमृतच्या पाणी पुरवठ्याचा शुभारंभ करीत आहोत. हे महाराष्ट्रातील अत्यंत आदर्श उदाहरण आहे. मात्र राज्यस्तरावर असा मोठेपणा दाखविला जात नाही.

२) जळगाव शहराच्या विकासासाठी कोरोना काळातही भाजप व शिवसेना नगरसेवक अशा सर्वांनासोबत घेऊन काम करीत आहोत.

३)आजही विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेत आम्हाला राष्ट्र‌वादी अन् काँग्रेस दिसत आहे.

४) गुलाब भाऊ जे खरे आहे, तेच आम्हाला सांगा.. काहीही बोलू नका, कारण एकदा का तुमची बॅटरी सुरू झाली की, तुम्ही आवरले जात नाहीत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील उवाच...

१) गिरीश महाजन यांनी मनपात कशा पद्धतीने सत्ता घेतली. इतका मोठा नगरसेवकांचा आकडा कसा गाठला, हे आपल्याला माहिती आहे.

२) गिरीश महाजन नसते, तर भाजपला मनपात १५ जागाही मिळाल्या नसत्या.

३) आमच्याकडे जर रसद पुरविली असती, तर आम्हीही चांगल्या जागा मिळविल्या असत्या.

४) वाघूरचे पाणी हे जामनेर मतदारसंघातून येत असले तरी ते जळगाव ग्रामीण मतदारसंघातून वाहत असते. जर आमचे पाणी तुमच्या धरणात आले नाही, तर तुमचे धरण कसे भरणार.

५)गेल्या वेळी तुमच्याकडे जलसंपदा खाते होते. म्हणजे पाणीवालेच होते. आता मी पण पाणीवालाच आहे. फरक इतकाच आहे, की तुम्ही चारी वाटे पाणी देत होते आणि आम्ही पाईपावाटे पाणी देत आहोत.

६) राज्यात सेना व भाजपची युती झाली असती तर भाजपने जळगाव महापालिकेत सत्ता आल्यानंतर आमच्यासोबत ‘लव्ह मॅरेज’ केलं असते.