शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

सत्ता भाजपची तरीही शिवसेना नगरसेवकांच्या वाॅर्डातून योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:30 IST

जळगाव : जळगाव महापालिकेत सत्ता भाजपची आहे. अमृत योजनेचा शुभारंभ ज्या वाॅर्डातून होत आहे त्या वाॅर्डात दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे ...

जळगाव : जळगाव महापालिकेत सत्ता भाजपची आहे. अमृत योजनेचा शुभारंभ ज्या वाॅर्डातून होत आहे त्या वाॅर्डात दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे आहेत. तरीही आम्ही भेदभाव न करता योजनेचा शुभारंभ करीत आहोत. सेना व भाजपचे नगरसेवक या ठिकाणी असल्याने युती असल्यासारखे वाटतेय. भविष्यात काय दडलंय हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे भविष्यात सेना व भाजपची पुन्हा युती होऊ शकते, असे सूतोवाच माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सुप्रीम काॅलनीत शनिवारी अमृत योजनेतंर्गत नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या शुभारंभावेळी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात राजकीय टोलेबाजी रंगली.

आमदार गिरीश महाजन उवाच..

१) सुप्रीम कॉलनीत शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. भाजपचा एकही नगरसेवक नाही. मनपात ६० नगरसेवक भाजपचे तर १५ नगरसेवक शिवसेनेचे आहेत. मात्र, तरीदेखील आम्ही भेदभाव न करता शिवेसना नगरसेवकांच्या वाॅर्डातून अमृतच्या पाणी पुरवठ्याचा शुभारंभ करीत आहोत. हे महाराष्ट्रातील अत्यंत आदर्श उदाहरण आहे. मात्र राज्यस्तरावर असा मोठेपणा दाखविला जात नाही.

२) जळगाव शहराच्या विकासासाठी कोरोना काळातही भाजप व शिवसेना नगरसेवक अशा सर्वांनासोबत घेऊन काम करीत आहोत.

३)आजही विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेत आम्हाला राष्ट्र‌वादी अन् काँग्रेस दिसत आहे.

४) गुलाब भाऊ जे खरे आहे, तेच आम्हाला सांगा.. काहीही बोलू नका, कारण एकदा का तुमची बॅटरी सुरू झाली की, तुम्ही आवरले जात नाहीत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील उवाच...

१) गिरीश महाजन यांनी मनपात कशा पद्धतीने सत्ता घेतली. इतका मोठा नगरसेवकांचा आकडा कसा गाठला, हे आपल्याला माहिती आहे.

२) गिरीश महाजन नसते, तर भाजपला मनपात १५ जागाही मिळाल्या नसत्या.

३) आमच्याकडे जर रसद पुरविली असती, तर आम्हीही चांगल्या जागा मिळविल्या असत्या.

४) वाघूरचे पाणी हे जामनेर मतदारसंघातून येत असले तरी ते जळगाव ग्रामीण मतदारसंघातून वाहत असते. जर आमचे पाणी तुमच्या धरणात आले नाही, तर तुमचे धरण कसे भरणार.

५)गेल्या वेळी तुमच्याकडे जलसंपदा खाते होते. म्हणजे पाणीवालेच होते. आता मी पण पाणीवालाच आहे. फरक इतकाच आहे, की तुम्ही चारी वाटे पाणी देत होते आणि आम्ही पाईपावाटे पाणी देत आहोत.

६) राज्यात सेना व भाजपची युती झाली असती तर भाजपने जळगाव महापालिकेत सत्ता आल्यानंतर आमच्यासोबत ‘लव्ह मॅरेज’ केलं असते.