शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

सत्ता भाजपची तरीही शिवसेना नगरसेवकांच्या वाॅर्डातून योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:30 IST

जळगाव : जळगाव महापालिकेत सत्ता भाजपची आहे. अमृत योजनेचा शुभारंभ ज्या वाॅर्डातून होत आहे त्या वाॅर्डात दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे ...

जळगाव : जळगाव महापालिकेत सत्ता भाजपची आहे. अमृत योजनेचा शुभारंभ ज्या वाॅर्डातून होत आहे त्या वाॅर्डात दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे आहेत. तरीही आम्ही भेदभाव न करता योजनेचा शुभारंभ करीत आहोत. सेना व भाजपचे नगरसेवक या ठिकाणी असल्याने युती असल्यासारखे वाटतेय. भविष्यात काय दडलंय हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे भविष्यात सेना व भाजपची पुन्हा युती होऊ शकते, असे सूतोवाच माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सुप्रीम काॅलनीत शनिवारी अमृत योजनेतंर्गत नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या शुभारंभावेळी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात राजकीय टोलेबाजी रंगली.

आमदार गिरीश महाजन उवाच..

१) सुप्रीम कॉलनीत शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. भाजपचा एकही नगरसेवक नाही. मनपात ६० नगरसेवक भाजपचे तर १५ नगरसेवक शिवसेनेचे आहेत. मात्र, तरीदेखील आम्ही भेदभाव न करता शिवेसना नगरसेवकांच्या वाॅर्डातून अमृतच्या पाणी पुरवठ्याचा शुभारंभ करीत आहोत. हे महाराष्ट्रातील अत्यंत आदर्श उदाहरण आहे. मात्र राज्यस्तरावर असा मोठेपणा दाखविला जात नाही.

२) जळगाव शहराच्या विकासासाठी कोरोना काळातही भाजप व शिवसेना नगरसेवक अशा सर्वांनासोबत घेऊन काम करीत आहोत.

३)आजही विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेत आम्हाला राष्ट्र‌वादी अन् काँग्रेस दिसत आहे.

४) गुलाब भाऊ जे खरे आहे, तेच आम्हाला सांगा.. काहीही बोलू नका, कारण एकदा का तुमची बॅटरी सुरू झाली की, तुम्ही आवरले जात नाहीत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील उवाच...

१) गिरीश महाजन यांनी मनपात कशा पद्धतीने सत्ता घेतली. इतका मोठा नगरसेवकांचा आकडा कसा गाठला, हे आपल्याला माहिती आहे.

२) गिरीश महाजन नसते, तर भाजपला मनपात १५ जागाही मिळाल्या नसत्या.

३) आमच्याकडे जर रसद पुरविली असती, तर आम्हीही चांगल्या जागा मिळविल्या असत्या.

४) वाघूरचे पाणी हे जामनेर मतदारसंघातून येत असले तरी ते जळगाव ग्रामीण मतदारसंघातून वाहत असते. जर आमचे पाणी तुमच्या धरणात आले नाही, तर तुमचे धरण कसे भरणार.

५)गेल्या वेळी तुमच्याकडे जलसंपदा खाते होते. म्हणजे पाणीवालेच होते. आता मी पण पाणीवालाच आहे. फरक इतकाच आहे, की तुम्ही चारी वाटे पाणी देत होते आणि आम्ही पाईपावाटे पाणी देत आहोत.

६) राज्यात सेना व भाजपची युती झाली असती तर भाजपने जळगाव महापालिकेत सत्ता आल्यानंतर आमच्यासोबत ‘लव्ह मॅरेज’ केलं असते.